शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

आरोग्याचा प्रश्न गंभीर : खंडाळा गावात नळाच्या पाण्यात जिवंत मासे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 1:01 AM

आरोग्याचा प्रश्न गंभीर : पाणी संकटामुळे ग्रामस्थ संतप्त

निखिल म्हात्रे 

अलिबाग : तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायत हद्दीत नळाच्या पाण्यातून कचरा, शेवाळ असे प्रकार आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. मात्र, अलिबाग तालुक्यातील खंडाळा गावात नळातून चक्क छोटी जिवंत कोळंबी (मासे) येत असल्याने खळबळ उडाली आहे. येथील ग्रामस्थांना पंधरा दिवसांनी पाणी पिण्यासाठी मिळते. त्यातच असे मासेमिश्रित पाणी आल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढील काही दिवसांमध्ये उन्हाच्या तीव्र झळा जाणवणार असल्याने पाणी संकट अजून गहिरे होणार असल्याने ग्रामस्थ चिंताग्रस्त आहेत.

खंडाळा ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक गेली अनेक वर्षे पाण्याच्या समस्येने ग्रासलेले आहेत. येथील ग्रामस्थांना १० ते १५ दिवसांनी एकदा एमआयडीसीचे पाणी ग्रामपंचायतीमार्फत दिले जाते. नळाद्वारे आलेले पाणी ग्रामस्थांना साठवून ठेवावे लागत आहे. मात्र, आता तर नळाद्वारे येणाऱ्या पाण्यामधून जिवंत छोटी कोळंबी (मासे) येण्यास सुरु वात झाल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शुक्रवारी १० दिवसांनी पाणी आल्याने महिलांनी पाणी भरण्यास सुरु वात केली. मात्र पाण्यात कोळंबी दिसल्यांने पाणी पुढील १० दिवस कसे साठवून ठेवायचे, असा प्रश्न महिलांना सतावत आहे.दरम्यान, पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.महिन्यातून फक्त दोन वेळा पाणीच्महिन्यातून फक्त दोन वेळा आम्हाला पिण्याचे पाणी मिळते.च्त्या पाण्यातही आता किडे, मुंग्या, मासळी असल्याने आमच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.च्जिल्हा प्रशासनाने ही गंभीर बाब लक्षात घेऊन खंडाळा गावातील ग्रामस्थांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा.च्प्रशासनाने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये अन्यथा आम्हाला ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.विकत पाणी घेण्याची पाळी : खंडाळा ग्रामपंचायतीची पाणी समस्या सोडविण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा योजना राबवण्यात आली होती. या योजनेत कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचा आरोप झाला होता. पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचारामुळे खंडाळा ग्रामस्थ आजही तहानलेलेच आहेत. ग्रामस्थांना पायपीट करून बाहेरून पाणी विकत आणावे लागत आहे. ग्रामस्थांची ही समस्या ना प्रशासन सोडवत आहे ना लोकप्रतिनिधी. यामुळे नागरिक संतापलेले आहेत. उन्हाळ्यात पाणी समस्या चांगलेच डोके वर काढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. 

टॅग्स :Raigadरायगड