शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

ठोंबरवाडीतील आदिवासी महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 00:06 IST

कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या जांबरुंग ग्रामपंचायमधील ठोंबरवाडी या आदिवासीवाडीमधील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ येत असे.

विजय मांडे कर्जत : कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या जांबरुंग ग्रामपंचायमधील ठोंबरवाडी या आदिवासीवाडीमधील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ येत असे. मात्र, येथे चार महिन्यांपूर्वी सूत्रे हाती घेतलेल्या नाममात्र शिक्षण घेतलेल्या सरपंचाने वेगळीच शक्कल लढवून त्या आदिवासीवाडीमध्ये नळाद्वारे पाणी पुरवून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविला. तेही भविष्यात विजेचा किंवा कोणताही खर्च नसलेली योजना साकारली गेली. जे निष्णात अभियंत्यांना जमले नाही ते या सरपंचाने करून दाखविल्याने सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.ठोंबरवाडी या आदिवासीवाडीची २५० लोकवस्ती आहे. त्यांच्याकरिता पाच वर्षांपूर्वी पाणी योजना तयार करण्यात आली होती, ती काही कारणाने बंद पडली. कालांतराने ती नादुरुस्त झाल्याने तेथे लांबवर उंचावर भारत निर्माण योजनेतून एक विहीर बांधण्यात आली होती. महिलांना त्या विहिरीवरून पाणी आणावे लागत असे. तर आजूबाजूला असलेल्या मुंबईकरांच्या फार्महाउसमधून मनधरणी करून पाणी आणावे लागे. पाण्यासाठी महिलांची पायपीट होत असे. कधी कधी पाणी देण्यास नकार दिल्याने पाण्यावाचूनही राहावे लागत असे.गेल्या सप्टेंबर महिन्यात थेट सरपंचपदी दत्तात्रेय पिंपरकर निवडून आले. त्यांच्याकडे ठोंबरवाडीतील आदिवासींनी पाण्यासाठी काहीतरी करा, असे साकडे घातले. पिंपरकर यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून या वाडीला पाणी कसे मिळेल? यासाठी काही करता येईल काय? या दृष्टीने विचार केला आणि त्यांना एक कल्पना सुचली. यासाठी भारत निर्माण योजनेतून बांधलेल्या उंचावर असलेल्या विहिरीचा उपयोग करण्याचे त्यांनी ठरविले. लहानपणी किल्ले करताना किंवा खेळताना उंचावर पाण्याचे भांडे ठेवून तोंडाने पाणी ओढून कारंज्या साकारण्याची साधी कल्पना त्यांनी अमलात आणण्याचे ठरविले, ती म्हणजे ‘सायपान पद्धत’ आणि ते कामाला लागले. ७५० मीटर लांबीचा एक इंची रबरी पाइप त्यांनी आणला. तो पाइप सुरुवातीला विहिरीपासून गावापर्यंत नेला. त्यानंतर तो विहिरीत टाकला व पाणी काढण्याचा प्रयत्न केला;’ परंतु पाइपमध्ये हवा असल्याने पाणी येईना. नंतर त्यांनी आपल्या विहिरीतील पंप काढून या विहिरीवर आणला व सुमारे २५० मीटरवर असलेल्या फामहाउस जवळून विजेचे कनेक्शन आणून पाइप पाण्याने भरला, त्यामुळे पाइपामधील हवा निघाली आणि पाणी वाडीपर्यंत आले. त्यांनतर त्यांनी पंप काढून टाकला व उतार असल्याने मोट्या दाबाने पाणी सुरू झाले.गावापर्यंत आलेले पाणी पाइपला बुच लावून बंद केले व नादुरुस्त असलेल्या पाणी योजनेच्या जुन्या पाइपलाइनला जोडले. जुन्या योजनेच्या स्टॅण्ड पोस्टची डागडुजी केली व पाणी सुरू केले. गावात एकूण सहा ठिकाणी ११ नळांद्वारे पाणी देण्याचा प्रयत्न केला; परंतु गाव उतारावर असल्याने सुरुवातीच्या दोन नळांना पाणी येत नव्हते. काय करावे ते सुचेना, मग त्यांनी गूगलच्या साहाय्याने जमिनीची पातळी तपासली व सुरुवातीच्या नळांची उंची कमी केली. त्यानंतर सर्वच नळांना धो धो पाणी सुरू झाले. आदिवासींचा आनंद गगनात मावेनासा झाला.>योजनेचे सर्वत्र कौतुक; अनेकांची प्रकल्पास भेटआदिवासी महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरल्याचे समाधान मात्र सरपंच दत्तात्रेय पिंपरकर यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते. तेसुद्धा केवळ सुमारे एक लाख रुपये खर्च करून. भविष्यात विजेचा अथवा कोणताही खर्च नाही, अशी योजना सुरू झाली.एखाद्या निष्णात अभियंत्यालाही लाजवेल, अशी कामगिरी जेमतेम चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या एका सरपंचाने करून दाखविली याचे कौतुक सर्वत्र होत असून, त्यांनी काय शक्कल लढवली ते पाहण्यासाठी काही जण या योजनेला भेट देत आहेत.>पाणी आणण्यासाठी आम्ही मुंबईकर फार्महाउसवाल्यांकडे जात होतो, कधी कधी पाणी मिळत नसे, तेव्हा आमच्या डोळ्यात पाणी येत असे; परंतु सरपंचांनी गावात पाणी आणून आमच्या डोक्यावरील हंडा उतरवला व अश्रूही पुसले.- पूजा मोरे, महिला ग्रामस्थ, ठोंबरवाडी>पाण्यासाठी आम्हाला वणवण करावी लागत असे, सरपंचांनी लक्ष घातल्याने आम्हाला घराजवळ पाणी मिळू लागले आहे.- मंदा ठोंबरे, महिला ग्रामस्थ, ठोंबरवाडीआमच्या महिलांना पाणी भरण्यासाठी दिवसभर पायपीट करावी लागे; परंतु सरपंचांनी पदभार घेतल्यावर पहिले आमचे पाण्याचे काम केले.- सुरेश बांगारे, ग्रामस्थ>आदिवासींचे हातावर पोट असते. दिवसभर पाणी भरण्यात गेला तर घर कसे चालणार म्हणून मी ही साधी शक्कल लढवली. त्यांच्या दारात सध्या पाणी आल्याने मला खूप समाधान मिळाले. मी केवळ माझे कर्तव्य केले आहे.- दत्तात्रेय पिंपरकर, सरपंच, जांबरुंग ग्रामपंचायत