शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

मृत्युनंतर रक्ताच्या नात्यानेही त्यांना नाकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 00:35 IST

म्हसळ्यातील गोविंद जाधव यांची व्यथा

निखिल म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग : मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक, ग्रामस्थ एकत्रित येऊन मृत व्यक्तीची प्रेतयात्रा काढून स्मशानभूमीत अंत्यविधी करतात. त्यानंतर, त्याचे उत्तरकार्य, दशकार्य केले जाते. मात्र, कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेला ना नातेवाईक, ना ग्रामस्थ रुग्णालयातील आरोग्यसेवकच अंत्यविधी करतात. कोरोना रुग्णाचे नातेवाईकही मृत्यूनंतर त्याची अवहेलना करतात. अशीच काहीशी परिस्थिती म्हसळा तालुक्यातील केलटे बौद्धवाडी येथे पाहायला मिळाली. 

येथील गोविंद जाधव यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यानंतर, गावातील लोक अंत्यसंस्कारासाठी पुढे आले नाहीत, पण त्यांच्या सख्या दोन मुलांनीही वडिलांचे दहन करण्यास नकार दिला. अखेर म्हसळा पोलीस, तहसील कर्मचारी, पत्रकार आणि रुग्णवाहिका चालकाने जाधव यांचा अंत्यविधी केला.कोरोनाच्या भीतीने मुलांसह ग्रामस्थांचा नकार म्हसळा तालुक्यातील केलटे बौद्धवाडी येथील गोविंद कृष्णा जाधव (७६) कोरोनाग्रस्त झाले होते. गोविंद जाधव घरीच कोरोनावर उपचार घेत होते. ३० एप्रिल, २०२१ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाने मृत्यू झाल्याने पुढचा अंत्यविधी करण्यासाठी नातेवाईक, ग्रामस्थांनी नकार दिला. जाधव यांच्या दोन संख्या मुलांनीही वडिलांच्या अंत्यविधीला नकार दिला. त्यामुळे गोविंद जाधव यांचा अंत्यविधी करण्याचा मोठा पेच प्रसंग उभा राहिला. याबाबत म्हसळा पोलिसांना कळताच, पोलीस उपनिरीक्षक उद्धव सुर्वे यांनी पुढाकार घेऊन संतोष चव्हाण, सूर्यकांत यांना त्वरित घटनास्थळी पाठविले. त्याच्यासोबत म्हसळा तहसील कार्यालयाचे सर्कल दत्ता करचे, पत्रकार नीलेश कोकचा आणि रुग्णवाहिका चालक शरद नांदगावकर, भरत चव्हाण हेही आले. शरद नांदगावकर यांनी सर्वांना पीपीई किटची उपलब्धता करून दिली. त्यानंतर, या सर्वांनी तिरडी बांधून जाधव यांची २ किमी स्मशानभूमीपर्यंत खांद्यावर अंत्ययात्रा काढून जाधव यांना अग्नी दिला.

५ माणसांना परवानगी, पण मृतांच्या नशिबी तेही नाही कोरोनाने मृत पावलेल्या जाधव यांच्या अंत्यविधीला ग्रामस्थांसह स्वतःच्या मुलांनीही नकार दिला. असे असले, तरी पोलीस, महसूल प्रशासन, पत्रकार, रुग्णवाहिका चालक यांनी माणुसकी दाखवून एक सत्कार्य केले. मात्र, अशी वेळ पुन्हा कोणावर येऊ नये, याबाबत प्रशासनाने जनजागृती करणे गरजेचे आहे.

घरातून एक माणूस जाणे हे कधीही सहन होणारे नाही. आज आधारच गेला असल्याने, आम्ही काही वेळ धक्क्यात होतो. काय करायचे काहीच सुचत नव्हते. अशातच गावकऱ्यांनीही हात वर केल्यावर आमची भीती अधिकच वाढली होती. - मृताचे नातेवाईक

कोरोनामुळे हसत्या-खेळत्या घरातील एका व्यक्तीचा जीव जाणे यापेक्षा दुसरं दु:ख नाही. आज आमच्या कुटुंबावर जी वेळ आली आहे, ती पुन्हा कोणावरही येऊ नये.- मृताचे नातेवाईक

 

टॅग्स :Raigadरायगड