शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
2
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
3
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
4
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
5
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
6
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
7
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
8
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
9
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
10
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
11
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
12
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
13
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
14
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
15
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
16
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
17
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
18
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
19
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
20
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत

पोलादपूर तालुक्यामध्ये भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:51 AM

पुरवठा विभागाकडून ४५ प्रस्ताव मंजूर; १० गावे, ३५ वाड्यांना चार टँकरने पाणीपुरवठा

- प्रकाश कदम पोलादपूर : रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईने डोके वर काढण्यास सुरु वात केली आहे. पाणीटंचाईची भीषणता वाढल्याने पोलादपूर तालुक्यातील दहा गावे आणि ३५ वाड्यांना टंचाईची झळ बसत असल्याने नागरिकांची तहान भागवण्यासाठी उपाययोजना म्हणून प्रशासनाने चार टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. एकूण ६५ वाड्या व गावे यांचे प्रस्ताव पोलादपूर पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडे आले असून, ४५ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. चार टँकरने सुरळीत पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडून प्राप्त झाली आहे.तापमान वाढल्याने तालुक्यातील नदीपात्र कोरडे झाले आहेत. ढवळी, कामथी, घोडवळी, सावित्री या मुख्य नद्या पावसाच्या हंगामात दुथडी भरून वाहत असतात, तर उन्हाळ्यात नद्यांची पात्र ओस पडत असल्याने, त्याचप्रमाणे साठवण टाक्या, कूपनलिका याची अवस्था असून नसल्यासारखी झाल्याने तालुक्यातील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने पाऊस पडतो. मात्र, पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने सर्व पाणी समुद्राला जाऊन मिळते. जिल्ह्यात मोठी धरणे निर्माण करण्यात सरकार आणि प्रशासनाला अपयश आले आहे. त्याचप्रमाणे अस्तित्वात असलेल्या धरणांची योग्य ती डागडुजी करण्यात न आल्यानेही पाण्याची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे प्रलंबित धरणाचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे.टंचाईग्रस्त गाव-वाड्याचांभारगणी बु., ओंबळी तामसडे, गोळेगणी गावठाण, तुटवली, साडेकोंड, किनेश्वर गावठाण, कुंभळवने, कालवलीतील कापडे खुर्द राखेचाकोंड, परसुळे, किनेश्वरवाडी, ओंबळी धनगरवाडी, कुडपण शेलारवाडी आदींचा सामावेश आहे.महामार्गालगतच्या गावांमध्ये पाणीटंचाईमुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामात काही विहिरी बाधित झाल्या असल्याने, त्याच विहिरींचे पुनर्वसन गावाजवळ किंवा मुख्य विहिरीच्या आसपास करणे गरजेचे आहे. महाड तालुक्यातील महामार्गालगत वसलेल्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, त्याचप्रमाणे किल्ले रायगडच्या पायथाशी असलेल्या गावांना पाणीटंचाई भासत असून, महिलांसह ग्रामस्थ दूरवरून पाणी आणत असल्याचे चित्र दिसत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई