शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

तहानलेल्या प्राण्यांसाठी भिवघरच्या तरुणांची धडपड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 2:03 AM

उन्हाळ्याची धग दिवसेंदिवस वाढत जात असताना जंगलातील पशूपक्ष्यांचे काय हाल होत असतील, याची कल्पना आपल्याला येत असेल. महाड तालुक्यातील भिवघर गावातील तरुणांनी मात्र या प्रश्नांवर गेली अनेक वर्षे सातत्याने काम सुरूच ठेवले आहे.

बिरवाडी : उन्हाळ्याची धग दिवसेंदिवस वाढत जात असताना जंगलातील पशूपक्ष्यांचे काय हाल होत असतील, याची कल्पना आपल्याला येत असेल. महाड तालुक्यातील भिवघर गावातील तरुणांनी मात्र या प्रश्नांवर गेली अनेक वर्षे सातत्याने काम सुरूच ठेवले आहे. आपल्या गावात वणवा पेटू न देणाऱ्या भिवघरचे किशोर पवार अनेक लहान-थोर ग्रामस्थ सध्या जंगलात पाण्याचे नैसर्गिक कुंभ भरत आहेत. पाणीटंचाईची झळ ग्रामीण भागातील लोकवस्तीला बसत असल्याने ही बाब लक्षात घेऊन जंगल परिसरातील पाणीसाठा पावसाळ्यापर्यंत उपलब्ध राहावा, याकरिता कृत्रिमरीत्या पाणी उपलब्ध करून देण्याचा निसर्गप्रेमी तरुणांकडून प्रयत्न सुरू आहे.‘पर्यावरणासाठी एक धाव’ अशा पद्धतीचे उपक्रम राबवून सर्वसामान्यांमध्ये जनजागृतीसोबतच ही चळवळ फक्त कागदावरती न ठेवता गेली सात वर्षे सातत्याने आपल्या गावात वणवा रोखणारे भिवघरचे किशोर पवार आणि वनप्रेमी मंडळाच्या सर्व सदस्यांनी यंदाही जंगलातील पशूपक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात गुंग आहेत. जंगलातील नैसर्गिक पाणी साठवण्याच्या जागा सध्या कोरडे झाल्याने त्यात गावातून कॅनमधून पाणी नेऊन ते भरून ठेवण्याचे काम गेले महिनाभर सुरू आहे. गावात येणारा वणवा रोखल्याने गेल्या सात वर्षांत या भिवघरच्या जंगलात मोरासह अनेक पक्षी आणि माकडे, भेकरासह अनेक वन्यजीव वाढले आहेत; पण उन्हाळ्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष झाल्याने त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करणे आपले पहिले कर्तव्य समजून भिवघरचे ग्रामस्थ हे काम करीत आहेत. आपले जंगल वाचवून वाढणाºया वन्यजीवांची काळजी घेण्यात भिवघरचे ग्रामस्थ गुंग असल्याने तालुक्यात हा एक चर्चेचा विषय ठरला आहे.महाड तालुक्यातील जंगल परिसरामध्ये शिकाऱ्यांनी लावलेल्या तारांच्या सापळ्यामध्ये अडकून बिबट्या मृत्युमुखी पडल्याच्या घटना वारंवार घडत आहेत, तसेच कोळसा निर्मितीकरिता वणवा लावून जंगले उद्ध्वस्त केली जात आहेत, अशा परिस्थितीत निसर्गप्रेमी संस्थांकडून प्राण्यांकरिता कृत्रिम पाणीसाठे उपलब्ध करून वणवामुक्त अभियान राबवून जंगल संवर्धनासाठी टाकले जाणारे पाऊल पर्यावरणासाठी लाभदायक ठरणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.

टॅग्स :Raigadरायगड