शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

पाच मिनिटांतच मदतीला हजर; डायल ११२ मुळे वर्षभरात दहा हजार नागरिकांना तत्काळ सेवा

By निखिल म्हात्रे | Updated: January 5, 2024 17:25 IST

अनुचित प्रकारांची माहिती तत्काळ पोलिसांपर्यंत पोहोचण्यासाठी शासनाने ११२ ही हेल्पलाईन कार्यान्वित केली आहे.

निखिल म्हात्रे,अलिबाग : स्वत:वर होत असलेला अन्याय, सभोवताली घडत असलेल्या अनुचित प्रकारांची माहिती तत्काळ पोलिसांपर्यंत पोहोचण्यासाठी शासनाने ११२ ही हेल्पलाईन कार्यान्वित केली आहे. यावर संपर्क केल्यास दहाव्या मिनिटाला पोलिस घटनास्थळी हजर होतील असे सांगण्यात आले आहे. रायगडमध्ये ही सेवा उपयोगी पडत असल्याचे दिसत आहे. वर्षभरात १० हजार ३६१ जणांनी या हेल्पलाईनवर संपर्क केला असून पोलिसांकडून त्यांना तत्काळ मदत मिळाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मित्रांमधील भांडणे, एखाद्या ठिकाणी लागलेली आग, कौटुंबिक कलहातून मारहाण, रात्रीच्या वेळी रस्ता चुकला.. आदी प्रकराच्या तक्रारी या हेल्पलाईनवर येत आहेत. तर अवघ्या पाच मिनिटात त्यांना मदत दिली जाते, असा दावा रायगड पोलिसांनी केला आहे.जिल्ह्यात एकूण २७ पोलिस स्टेशन आहेत. या पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ मदत हवी असल्यास आता ११२ हा हेल्पलाईन संपर्क करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. मदतीसाठीचा फोन येताच काही सेकंदात हा फोन कोठून आला, हे संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना समजल्याने तेथील पोलिस नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल, महिला हेल्पलाईन, चाईल्ड हेल्पलाईन यांना एकाचवेळी त्या कॉलची माहिती दिली जात आहे. जेणेकरून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल होतात.

काॅलचे लोकेशन कळते तत्काळ :

११२ या हेल्पलाईनवर संपर्क साधल्यास तक्रारदाराचे लोकेशन लगेच कळते. विशेष यंत्रणेच्या मदतीने व वाहनांवरील जीपीएसच्या साहाय्याने काॅल नेमका कोठून आला, याचे लोकेशन कळविण्याची व्यवस्था उभी करण्यात आली आहे. त्यामुळे निर्धारीत वेळेपेक्षा लवकर मदत मिळत आहे.

कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण :

जिल्ह्याचे ‘जिओ टॅगिंग’ झाले असून ते ‘सेंट्रलाईज कंट्रोल रूम’ला फोन आल्यावर कशाप्रकारे प्रतिसाद द्यायचा, स्थानिक कंट्रोल रूमला फोन आल्यावर काय प्रक्रिया राबवायची, याबाबतची प्रशिक्षण प्रणाली निश्चित करण्यात आली आहे. त्याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे.डायल ११२ या नव्या प्रणालीमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत आहे. नागरिकांना तत्काळ मदत पोहोचत असल्याने पोलिसांची प्रतिमा देखील उंचावत आहे. मागील वर्षभरात १० हजार ३६१ नागरिकांपर्यंत अवघ्या पाच मिनिटात पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पीडितांच्या समस्या सोडविल्या आहेत. तसेच एखाद्या तक्रारदाराचे निरसन होईपर्यंत पोलिस घटनास्थळी थांबून त्यांना मदत केली आहे.- सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधीक्षक

टॅग्स :alibaugअलिबागPoliceपोलिस