शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

पाच मिनिटांतच मदतीला हजर; डायल ११२ मुळे वर्षभरात दहा हजार नागरिकांना तत्काळ सेवा

By निखिल म्हात्रे | Updated: January 5, 2024 17:25 IST

अनुचित प्रकारांची माहिती तत्काळ पोलिसांपर्यंत पोहोचण्यासाठी शासनाने ११२ ही हेल्पलाईन कार्यान्वित केली आहे.

निखिल म्हात्रे,अलिबाग : स्वत:वर होत असलेला अन्याय, सभोवताली घडत असलेल्या अनुचित प्रकारांची माहिती तत्काळ पोलिसांपर्यंत पोहोचण्यासाठी शासनाने ११२ ही हेल्पलाईन कार्यान्वित केली आहे. यावर संपर्क केल्यास दहाव्या मिनिटाला पोलिस घटनास्थळी हजर होतील असे सांगण्यात आले आहे. रायगडमध्ये ही सेवा उपयोगी पडत असल्याचे दिसत आहे. वर्षभरात १० हजार ३६१ जणांनी या हेल्पलाईनवर संपर्क केला असून पोलिसांकडून त्यांना तत्काळ मदत मिळाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मित्रांमधील भांडणे, एखाद्या ठिकाणी लागलेली आग, कौटुंबिक कलहातून मारहाण, रात्रीच्या वेळी रस्ता चुकला.. आदी प्रकराच्या तक्रारी या हेल्पलाईनवर येत आहेत. तर अवघ्या पाच मिनिटात त्यांना मदत दिली जाते, असा दावा रायगड पोलिसांनी केला आहे.जिल्ह्यात एकूण २७ पोलिस स्टेशन आहेत. या पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ मदत हवी असल्यास आता ११२ हा हेल्पलाईन संपर्क करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. मदतीसाठीचा फोन येताच काही सेकंदात हा फोन कोठून आला, हे संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना समजल्याने तेथील पोलिस नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल, महिला हेल्पलाईन, चाईल्ड हेल्पलाईन यांना एकाचवेळी त्या कॉलची माहिती दिली जात आहे. जेणेकरून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल होतात.

काॅलचे लोकेशन कळते तत्काळ :

११२ या हेल्पलाईनवर संपर्क साधल्यास तक्रारदाराचे लोकेशन लगेच कळते. विशेष यंत्रणेच्या मदतीने व वाहनांवरील जीपीएसच्या साहाय्याने काॅल नेमका कोठून आला, याचे लोकेशन कळविण्याची व्यवस्था उभी करण्यात आली आहे. त्यामुळे निर्धारीत वेळेपेक्षा लवकर मदत मिळत आहे.

कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण :

जिल्ह्याचे ‘जिओ टॅगिंग’ झाले असून ते ‘सेंट्रलाईज कंट्रोल रूम’ला फोन आल्यावर कशाप्रकारे प्रतिसाद द्यायचा, स्थानिक कंट्रोल रूमला फोन आल्यावर काय प्रक्रिया राबवायची, याबाबतची प्रशिक्षण प्रणाली निश्चित करण्यात आली आहे. त्याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे.डायल ११२ या नव्या प्रणालीमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत आहे. नागरिकांना तत्काळ मदत पोहोचत असल्याने पोलिसांची प्रतिमा देखील उंचावत आहे. मागील वर्षभरात १० हजार ३६१ नागरिकांपर्यंत अवघ्या पाच मिनिटात पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पीडितांच्या समस्या सोडविल्या आहेत. तसेच एखाद्या तक्रारदाराचे निरसन होईपर्यंत पोलिस घटनास्थळी थांबून त्यांना मदत केली आहे.- सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधीक्षक

टॅग्स :alibaugअलिबागPoliceपोलिस