शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
3
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
4
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
5
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
6
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
7
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
8
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
9
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
10
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
11
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
12
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
13
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
14
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
15
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
16
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
17
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
18
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
19
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
20
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
Daily Top 2Weekly Top 5

पाच मिनिटांतच मदतीला हजर; डायल ११२ मुळे वर्षभरात दहा हजार नागरिकांना तत्काळ सेवा

By निखिल म्हात्रे | Updated: January 5, 2024 17:25 IST

अनुचित प्रकारांची माहिती तत्काळ पोलिसांपर्यंत पोहोचण्यासाठी शासनाने ११२ ही हेल्पलाईन कार्यान्वित केली आहे.

निखिल म्हात्रे,अलिबाग : स्वत:वर होत असलेला अन्याय, सभोवताली घडत असलेल्या अनुचित प्रकारांची माहिती तत्काळ पोलिसांपर्यंत पोहोचण्यासाठी शासनाने ११२ ही हेल्पलाईन कार्यान्वित केली आहे. यावर संपर्क केल्यास दहाव्या मिनिटाला पोलिस घटनास्थळी हजर होतील असे सांगण्यात आले आहे. रायगडमध्ये ही सेवा उपयोगी पडत असल्याचे दिसत आहे. वर्षभरात १० हजार ३६१ जणांनी या हेल्पलाईनवर संपर्क केला असून पोलिसांकडून त्यांना तत्काळ मदत मिळाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मित्रांमधील भांडणे, एखाद्या ठिकाणी लागलेली आग, कौटुंबिक कलहातून मारहाण, रात्रीच्या वेळी रस्ता चुकला.. आदी प्रकराच्या तक्रारी या हेल्पलाईनवर येत आहेत. तर अवघ्या पाच मिनिटात त्यांना मदत दिली जाते, असा दावा रायगड पोलिसांनी केला आहे.जिल्ह्यात एकूण २७ पोलिस स्टेशन आहेत. या पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ मदत हवी असल्यास आता ११२ हा हेल्पलाईन संपर्क करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. मदतीसाठीचा फोन येताच काही सेकंदात हा फोन कोठून आला, हे संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना समजल्याने तेथील पोलिस नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल, महिला हेल्पलाईन, चाईल्ड हेल्पलाईन यांना एकाचवेळी त्या कॉलची माहिती दिली जात आहे. जेणेकरून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल होतात.

काॅलचे लोकेशन कळते तत्काळ :

११२ या हेल्पलाईनवर संपर्क साधल्यास तक्रारदाराचे लोकेशन लगेच कळते. विशेष यंत्रणेच्या मदतीने व वाहनांवरील जीपीएसच्या साहाय्याने काॅल नेमका कोठून आला, याचे लोकेशन कळविण्याची व्यवस्था उभी करण्यात आली आहे. त्यामुळे निर्धारीत वेळेपेक्षा लवकर मदत मिळत आहे.

कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण :

जिल्ह्याचे ‘जिओ टॅगिंग’ झाले असून ते ‘सेंट्रलाईज कंट्रोल रूम’ला फोन आल्यावर कशाप्रकारे प्रतिसाद द्यायचा, स्थानिक कंट्रोल रूमला फोन आल्यावर काय प्रक्रिया राबवायची, याबाबतची प्रशिक्षण प्रणाली निश्चित करण्यात आली आहे. त्याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे.डायल ११२ या नव्या प्रणालीमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत आहे. नागरिकांना तत्काळ मदत पोहोचत असल्याने पोलिसांची प्रतिमा देखील उंचावत आहे. मागील वर्षभरात १० हजार ३६१ नागरिकांपर्यंत अवघ्या पाच मिनिटात पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पीडितांच्या समस्या सोडविल्या आहेत. तसेच एखाद्या तक्रारदाराचे निरसन होईपर्यंत पोलिस घटनास्थळी थांबून त्यांना मदत केली आहे.- सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधीक्षक

टॅग्स :alibaugअलिबागPoliceपोलिस