शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ द्या, भाजप किसान मोर्चाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 00:18 IST

Farmer News :  शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाच्या वतीने कर्जत तहसील कार्यालय आणि तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली.

नेरळ :  शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाच्या वतीने कर्जत तहसील कार्यालय आणि तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली. तहसील कार्यालयात नायब तहसीलदार सुधाकर राठोड आणि तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांना निवेदन देण्यात आले.कर्जत तालुक्यात अवकाळी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या भात पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे तत्काळ करून त्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, याबाबत मागे भारतात जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांना एक दमडीही मिळाली नाही, याचा जाब विचारण्यासाठी किसान मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे शिष्टमंडळ भाजप किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष परशुराम म्हसे यांच्या नेतृत्वाखाली शासनाला निवेदन देण्यासाठी भेटले. कर्जत तहसीलदार कार्यालयात निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी निवेदन स्वीकारले.तहसील कार्यालयानंतर भाजप किसान मोर्चाचे कार्यकर्ते तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे गेले. त्यावेळी शेतकऱ्यांनी भरलेली रक्कम पीकविमासंबंधी असून, भविष्यात नुकसानभरपाई मिळाली नाही. प्रधानमंत्री पीकविमा योजना मध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी रक्कम विमा कंपन्यांकडे जमा केली आहे. मात्र, शेतकऱ्यांना मिळत नसेल तर याला जबाबदार महाराष्ट्र शासन, कृषी अधिकारी आणि विमा कंपनी आहेत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला.    यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल आदींसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. शासन शेतकऱ्यांची दिशाभूल करून लाभापासून वंचित ठेवून फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. भाजप किसान मोर्चा न्याय मिळवून देण्यासाठी निवेदन देत आहे. यावेळी भाजप किसान मोर्चाचे कोकण संघटक सुनील गोगटे, जिल्हा अध्यक्ष परशुराम म्हसे उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीRaigadरायगड