शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
4
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
5
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
6
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
8
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
9
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
10
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
11
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
12
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
13
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
14
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
15
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
16
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
17
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
18
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
19
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
20
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
Daily Top 2Weekly Top 5

घोणसे घाट धोकादायक, बांधकाम खात्याचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 03:38 IST

मुंबई-दिघी महामार्गावरील घोणसे घाट पावसाळ्यात प्रवासीवाहतुकीसाठी धोकादायक बनत आहे. घोणसे घाटाच्या दरड संरक्षक भिंतीचे दगड अतिवृष्टीमुळे निखळण्यास सुरु वात झाली आहे. बांधकाम खात्याने याकडे वेळीच लक्ष न दिल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

श्रीवर्धन - मुंबई-दिघी महामार्गावरील घोणसे घाट पावसाळ्यात प्रवासीवाहतुकीसाठी धोकादायक बनत आहे. घोणसे घाटाच्या दरड संरक्षक भिंतीचे दगड अतिवृष्टीमुळे निखळण्यास सुरु वात झाली आहे. बांधकाम खात्याने याकडे वेळीच लक्ष न दिल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.म्हसळा शहराचे प्रवेशद्वार असलेला घोणसे घाटात अपघातांची मालिका नेहमीच सुरू असते, यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. ठाणे दिवेआगार एसटीच्या अपघातानंतर पूर्वीचा केळेवाडीचा तीव्र वळण रस्ता बदलून त्याऐवजी दुसऱ्या पर्यायी रस्त्याची निर्मिती करण्यात आली.सध्या वापरात असलेला मुख्य रस्त्याच्या वळणावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पर्यायी मार्गाची निर्मिती करताना दरड संरक्षणासाठी दगडाची भिंत रस्त्याच्या डाव्या बाजूला बांधण्यात आली होती. मात्र, त्या भिंतीचे अनेक लहान-मोठे दगड निळखत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.घोणसे घाट वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त व महत्त्वाचा आहे. श्रीवर्धन तालुक्यात प्रवेश करण्यासाठी घोणसे घाटाशिवाय पर्याय नाही. श्रीवर्धन तालुक्यात पर्यटन व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील हरिहरेश्वर, दिवेआगार व श्रीवर्धनकडे वीकेण्डला पर्यटकांचा ओघ सदैव असतो. त्यासोबत दक्षिण काशी असलेल्या हरिहरेश्वरला भाविकांची गर्दी वाढतच आहे, त्यामुळे घोणसे घाट लाखो लोकांच्या जीवितांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.घोणसे घाटात अपघात प्रवण क्षेत्राचे नामनिर्देशन करणारे फलक क्वचित ठिकाणी निदर्शनास येतात. म्हसळ्याकडे जाताना घाटातील लोखंडाचे संरक्षक कठडे तुटलेले आहेत. घाटातील मुख्य वळणावर सभोवतालच्या डोंगरमाथ्यावरील पाणी झिरपताना दिसते. वेळीच दखल न घेतल्यास मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही. संरक्षक भिंतीचे दगड बसवल्यास दरड कोसळण्याचा धोका कमी करण्यासाठी मदत होईल. श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यात या आठवड्यात पावसाने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक रस्ते, घरे, महावितरणाचे खांब जमीनदोस्त झाले आहेत. विविध ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत.माणगाव ते म्हसळा २७ कि.मी.चे अंतर आहे. घोणसे घाटाची लांबी अंदाजे एक कि.मी. आहे. घाटाच्या उजव्या बाजूस खोल दरी आहे. सध्या माणगाव ते दिघी या महामार्गाचे काम प्रगतिपथावर आहे.सदरचे काम चांदोरे गावाच्या हद्दीपर्यंत होत आले आहे. घोणसे घाटातील रस्त्याची झालेली वाताहत लवकर दूर व्हावी व दरड संरक्षक उपाययोजना लवकर करण्यात याव्यात, अशी मागणी चालक तसेच स्थानिकांकडून करण्यात येत आहे.घोणसा घाटाची परिस्थिती अतिशय वाईट आहे. वळणावरील रस्ता खचला आहे. दरड संरक्षक भिंतीचे दगड निखळले आहेत. संबंधित बांधकाम विभागाने वेळीच लक्ष न दिल्यास, मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जनहितासाठी आंदोलन करण्यात येईल.- नाझीम हसवारे,अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादीघोणसे घाटातील वळण रस्त्यावरील खड्ड्यांनी जीव मेटाकुटीला येत आहे. घोणसे घाट तालुक्यातील सर्वात अवघड वळणाचा घाट आहे, त्यामुळे चालकांना नेहमीच सतर्क राहावे लागते. या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्यांच्यासाठी घाटातील वळणे, रस्ते नवखे असल्याने अपघात वाढले आहेत.- संदीप गुरव, चालक, एसटी महामंडळघोणसे घाटातील रस्ता अतिशय खराब झाला आहे, त्यामुळे अपघाताची दाट शक्यता आहे. दरड कोसळल्यास सर्व वाहतूक ठप्प होईल.- अभय कळमकर, वाहनचालकघोणसे घाटात सर्व चालकांना सावकाश चालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. घोणसे घाटातील मुख्य वळण रस्ता अतिशय खड्डेमय झाला आहे. त्याची लवकर दुरु स्ती होणे अपेक्षित आहे.- सुधा विचारे,वाहतूक नियंत्रक, म्हसळा 

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या