शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक झालेल्यांचे दारिद्र्य कायमचे संपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:23 AM

छत्रपती शिवाजी महाराजांसमोर जो नतमस्तक झाला, त्याचे दारिद्र्यपण कायमचे संपल्याचे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक आणि व्याख्याते अमोल मिटकरी यांनी रविवारी किल्ले रायगडवर बोलताना केले.

महाड : छत्रपती शिवाजी महाराजांसमोर जो नतमस्तक झाला, त्याचे दारिद्र्यपण कायमचे संपल्याचे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक आणि व्याख्याते अमोल मिटकरी यांनी रविवारी किल्ले रायगडवर बोलताना केले.अखिल भारतीय शाक्त शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने किल्ले रायगडवर रविवारी छत्रपती शिवरायांच्या शाक्त राज्याभिषेक दिन कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्र माला रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, पीएनपी शिक्षण संस्थेच्या संचालक चित्रलेखा पाटील, सौरभ खेडेकर, सुधीर भोसले, सुदर्शन तारक आदि मान्यवर या कार्यक्र माला उपस्थित होते. कार्यक्र माचे अध्यक्षस्थान अर्जुन तणपुरे यांनी भूषविले. या कार्यक्र मात रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे आणि चित्रलेखा पाटील यांचा हिरकणी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अमोल मिटकरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे खºया अर्थाने रयतेचे राजे होते. ही भूमी परशुरामाची नाही तर शिवप्रभूंची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही तांत्रिक अथवा वैदिकतेचे समर्थन केले नाही. बुवाबाजी, रामरहिमसारखी प्रकरणे यावर मिटकरी यांनी कडक शब्दांमध्ये हल्ला चढविला.आज शिवाजी महाराज असते तर रामरहिमचे हातपाय तोडून त्याचा गडावरून कडेलोट केला असता.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांनी आपल्या भाषणामध्ये, लहान वयामध्ये हिरकणी पुरस्कार मिळाल्याने भविष्यात आपली जबाबदारी अधिकच वाढली असल्याचे सांगितले. राजकीय वारसा आणि वडिलांचे मार्गदर्शन महत्त्वाचे असते. माता ही राजमातांसारखी आणि पुत्र हा शिवाजीराजांसारखा असावा. त्याचप्रमाणे राजमातांच्या विचारांचेही अनुकरण करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. हिरकणी पुरस्काराने मिळालेल्या आत्मविश्वासाच्या बळावर आगामी काळात रायगडमधील जनता आणि महिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण कटिबध्द असल्याची ग्वाही त्यांनी दिली. अध्यक्षीय भाषणात अर्जुन तनपुरे यांनी छ. शिवाजी महाराज हे क्र ांतिकारी राजे होते असे सांगत, त्यांनी एका ध्येयाने प्रेरित होऊन स्वराज्याची स्थापना केल्याचे सांगितले.पीएनपीच्या संचालिका चित्रलेखा पाटील यांनी समाजामध्ये आजही पूर्ण समानता आलेली नसल्याची खंत व्यक्त केली. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि रमाबाई आंबेडकर यांनी जीवनात केलेला संघर्ष आणि महात्मा फुले यांच्या विचारांच्या पार्श्वभूमीवर आज महिला सक्षमपणे विविध क्षेत्रात पुढे आल्या आहेत असे त्या म्हणाल्या. महिलांचे उच्चशिक्षण आणि स्त्री भ्रूण हत्येच्या प्रकारांबाबत अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत ही त्यांनी यावेळेस व्यक्त केले. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश सचिव सौरभ खेडेकर यांनी आपल्या भाषणात शाक्त राज्याभिषेक सोहळ्याचे वर्तमान स्थितीतील महत्व विषद केले. सर्व संघटनांच्या वतीने करण्यात आलेला आजचा हा कार्यक्र म भविष्यात अधिक व्यापक प्रमाणावर करण्याचा मनोदय व्यक्त के ला.प्रारंभी मेघडंबरी येथे छत्रपती शिवराय आणि राजमाता जिजाऊंचे पूजन करण्यात आले. त्यानंतर धारातीर्थी पडलेल्या सैनिकांना मानवंदना देण्यात आली. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड यांच्यासह इतर समविचारी कक्ष, संघटना यांनी या कार्यक्र माचे आयोजन केले होते.