शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक झालेल्यांचे दारिद्र्य कायमचे संपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:24 IST

छत्रपती शिवाजी महाराजांसमोर जो नतमस्तक झाला, त्याचे दारिद्र्यपण कायमचे संपल्याचे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक आणि व्याख्याते अमोल मिटकरी यांनी रविवारी किल्ले रायगडवर बोलताना केले.

महाड : छत्रपती शिवाजी महाराजांसमोर जो नतमस्तक झाला, त्याचे दारिद्र्यपण कायमचे संपल्याचे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक आणि व्याख्याते अमोल मिटकरी यांनी रविवारी किल्ले रायगडवर बोलताना केले.अखिल भारतीय शाक्त शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने किल्ले रायगडवर रविवारी छत्रपती शिवरायांच्या शाक्त राज्याभिषेक दिन कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्र माला रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, पीएनपी शिक्षण संस्थेच्या संचालक चित्रलेखा पाटील, सौरभ खेडेकर, सुधीर भोसले, सुदर्शन तारक आदि मान्यवर या कार्यक्र माला उपस्थित होते. कार्यक्र माचे अध्यक्षस्थान अर्जुन तणपुरे यांनी भूषविले. या कार्यक्र मात रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे आणि चित्रलेखा पाटील यांचा हिरकणी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अमोल मिटकरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे खºया अर्थाने रयतेचे राजे होते. ही भूमी परशुरामाची नाही तर शिवप्रभूंची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही तांत्रिक अथवा वैदिकतेचे समर्थन केले नाही. बुवाबाजी, रामरहिमसारखी प्रकरणे यावर मिटकरी यांनी कडक शब्दांमध्ये हल्ला चढविला.आज शिवाजी महाराज असते तर रामरहिमचे हातपाय तोडून त्याचा गडावरून कडेलोट केला असता.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांनी आपल्या भाषणामध्ये, लहान वयामध्ये हिरकणी पुरस्कार मिळाल्याने भविष्यात आपली जबाबदारी अधिकच वाढली असल्याचे सांगितले. राजकीय वारसा आणि वडिलांचे मार्गदर्शन महत्त्वाचे असते. माता ही राजमातांसारखी आणि पुत्र हा शिवाजीराजांसारखा असावा. त्याचप्रमाणे राजमातांच्या विचारांचेही अनुकरण करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. हिरकणी पुरस्काराने मिळालेल्या आत्मविश्वासाच्या बळावर आगामी काळात रायगडमधील जनता आणि महिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण कटिबध्द असल्याची ग्वाही त्यांनी दिली. अध्यक्षीय भाषणात अर्जुन तनपुरे यांनी छ. शिवाजी महाराज हे क्र ांतिकारी राजे होते असे सांगत, त्यांनी एका ध्येयाने प्रेरित होऊन स्वराज्याची स्थापना केल्याचे सांगितले.पीएनपीच्या संचालिका चित्रलेखा पाटील यांनी समाजामध्ये आजही पूर्ण समानता आलेली नसल्याची खंत व्यक्त केली. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि रमाबाई आंबेडकर यांनी जीवनात केलेला संघर्ष आणि महात्मा फुले यांच्या विचारांच्या पार्श्वभूमीवर आज महिला सक्षमपणे विविध क्षेत्रात पुढे आल्या आहेत असे त्या म्हणाल्या. महिलांचे उच्चशिक्षण आणि स्त्री भ्रूण हत्येच्या प्रकारांबाबत अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत ही त्यांनी यावेळेस व्यक्त केले. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश सचिव सौरभ खेडेकर यांनी आपल्या भाषणात शाक्त राज्याभिषेक सोहळ्याचे वर्तमान स्थितीतील महत्व विषद केले. सर्व संघटनांच्या वतीने करण्यात आलेला आजचा हा कार्यक्र म भविष्यात अधिक व्यापक प्रमाणावर करण्याचा मनोदय व्यक्त के ला.प्रारंभी मेघडंबरी येथे छत्रपती शिवराय आणि राजमाता जिजाऊंचे पूजन करण्यात आले. त्यानंतर धारातीर्थी पडलेल्या सैनिकांना मानवंदना देण्यात आली. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड यांच्यासह इतर समविचारी कक्ष, संघटना यांनी या कार्यक्र माचे आयोजन केले होते.