शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

आर्थिक संकटातून झाली कुटुंबाची मुक्तता, आर्थिक स्थैर्याचा मोकळा श्वास, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 3:37 AM

शेताची बांधबंदिस्ती करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेतले. फेडण्याचे प्रयत्न सुरू होते; पण अतिवृष्टीमुळे शेताची केलेली बांधबंदिस्तीही वाहून गेली. पिकाचे नुकसान झाले. सोसायटीचे घेतलेले कर्ज फेडण्यासाठी समस्या निर्माण झाली.

अलिबाग : शेताची बांधबंदिस्ती करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेतले. फेडण्याचे प्रयत्न सुरू होते; पण अतिवृष्टीमुळे शेताची केलेली बांधबंदिस्तीही वाहून गेली. पिकाचे नुकसान झाले. सोसायटीचे घेतलेले कर्ज फेडण्यासाठी समस्या निर्माण झाली. कर्जाच्या बोजामुळे कुटुंबावर आर्थिक संकट ओढवल्याची परिस्थिती निर्माण झाली, अशा वेळी शासन मदतीला धावून आले, कर्जमाफी झाली आणि शासनाच्या निर्णयामुळे संपूर्ण कुटुंबाची आर्थिक संकटातून मुक्तता झाली, असे सारळ येथील शेतकरी मधुकर पाटील यांनी सांगितले. शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमुळे जिल्ह्यातील १० हजार ९४० शेतकºयांना १९ कोटी ६१ लाख ९ हजार ८४६ रु पयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. त्यातील मधुकर पाटील हे एक. आज त्यांचे कुटुंब कर्जमुक्ती आणि आर्थिक स्थैर्याचा मोकळा श्वास घेत आहे.अलिबाग सारळ येथील शेतकरी मधुकर पाटील यांनी त्यांच्या १ एकर शेतीमध्ये ओम-३ व जया ही भाताची बियाणी पेरली होती. शेताच्या बांधबंदिस्तीसाठी त्यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या हाशिवरे शाखेतून सन २०१५-१६मध्ये दोन लाख ७० हजार रु पये इतके कर्ज घेतले होते; पण निसर्गाची अवकृपा झाली. अतिवृष्टीमुळे बांधबंदिस्ती वाहून गेली, त्यामुळे शेतामध्ये पेरलेली भाताची बियाणी कुजली, अपेक्षित उत्पादन बुडाले, त्यामुळे पाटील यांना मोठे आर्थिक नुकसान झाले. भाताचे पीक वाया गेले. एकीकडे कर्जाचा बोजा आणि दुसरीकडे अपेक्षित उत्पादन न झाल्याने कुटुंबाची आर्थिक स्थिती खचली आणि सोबत मनोधैर्यही; परंतु जिद्दीने या स्थितीचा सामना सुरू होता. कर्जफेडीचे प्रयत्न सुरू होते.नुकताच महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकºयांना कर्जमाफीचा निर्णय घेतला. या योजनेंतर्गत १ एप्रिल, २००९ ते ३० जून, २०१६ अखेर थकबाकीदार शेतकºयांना १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत कर्जमाफी व १ लाख ५० हजार रुपयांवरील शेतकºयांना एक वेळ समझोता योजना लागू केली. तसेच २०१५-१६, २०१६-१७ या वर्षांत ज्या शेतकºयांनी कर्जाची नियमितपणे परतफेड केली, अशा शेतकºयांना २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषित केले. यामध्ये शेतकºयांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मंजूर करण्यात आला व तो शेतकºयांच्या कर्जखात्यात (कर्जमाफी) व बचत खात्यात (प्रोत्साहनपर) वर्ग करण्यात आला.- मधुकर पाटील यांनी त्यांच्या दोन लाख ७० हजारांपैकी ४८ हजार रु पये कर्ज फेडणे बाकी होते. शासनाने हा कर्जमाफीचा निर्णय घेतल्याने त्यांचे उर्वरित ४८ हजार रु पये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. शासनाने हा एक चांगला निर्णय घेतला.या ऐतिहासिक निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना एक दिलासा मिळाला असून, आर्थिक संकटातून कुटुंबाला हातभार लागला आहे. आता हे कुटुंब नव्या उमेदीने आपल्या काळ्या आईची सेवा करण्यास सज्ज झाले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी