शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

माथेरानमध्ये चार दुकाने भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 6:17 AM

माथेरान येथील मुख्य बाजारपेठेतील महात्मा गांधी रोडवर पहाटे लागलेल्या  आगीत चार दुकाने जळून खाक झाली. या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी  तीन ते चार तास लागले असून, या आगीत जवळपास ७0 ते ८0 लाखांच्या  आसपास दुकानातील मालाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ठळक मुद्देमुख्य बाजारपेठेत आग दुकानदारांचे ७0 ते ८0 लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : येथील मुख्य बाजारपेठेतील महात्मा गांधी रोडवर पहाटे लागलेल्या  आगीत चार दुकाने जळून खाक झाली. या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी  तीन ते चार तास लागले असून, या आगीत जवळपास ७0 ते ८0 लाखांच्या  आसपास दुकानातील मालाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून,  दुकानांना लागूनच असलेल्या घरातील रोकड, दागिने, टीव्ही, फ्रीज या सार ख्या किमती वस्तू या आगीत भस्मसात झाल्याने येथील दुकानदारांचे मोठय़ा  प्रमाणात नुकसान झाले आहे.या वेळी हीना चिक्की मार्ट, निहाल एजन्सी, के.जी.एन. बेकरी, दिलावर बेकरी  या दुकानांची आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला; परंतु कर्जत व  खोपोली येथील अग्निबंब वाहन मोठे असल्याने घाटातून वर आणण्यास श क्य नसल्याने तसेच वेळेत पोहोचू शकत नसल्याने, माथेरान नगरपरिषदेच्या  अग्निबंब गाडीच्या साहाय्याने पाणीपुरवठा केंद्र येथून तीन ते चार फेर्‍या  पाण्याच्या, तसेच शेजारील केतकर हॉटेलमालक प्रमोद नायक व मिस्टी  रीसॉर्टचे अल्ताफ शेख यांनी आपल्याकडील संपूर्ण पाणी आग  विझविण्यासाठी उपलब्ध करून दिल्यामुळे तसेच स्थानिक तरु ण व काही  लोक प्रतिनिधींनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी मदतकार्य केले. या  वेळी आग विझविण्यासाठी स्थानिक तरु ण सीताराम कुंभार, भास्कर शिंदे,  किरण चौधरी, कुलदीप जाधव, नासीर शारवान, माजी नगरसेवक प्रकाश सु तार तसेच इतर रहिवाशांनी आगीवर नियंत्रण आणले.या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी,  नगरसेविका वर्षा रॉड्रिक्स, पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर, गटनेते प्रसाद  सावंत यांनी धाव घेतली. या वेळी स्थानिक तरु णांनी आपल्या जीवाची परवा  न करता, आग आटोक्यात आणल्यामुळे या दुकानांना लागून असलेली दुसरी  दुकाने व घरे वाचली; परंतु या घटनेमुळे खान कुटुंबीय आपली राहते घर,  दुकाने जळल्यामुळे होत्याचे नव्हते झाल्याने माथेरान नगरपरिषद व  नागरिकांकडे व्यवसाय करण्यासाठी दुकाने व घरासाठी दया, याचना करत  सहकार्याची अपेक्षा करीत आहेत. या आगीचे अद्याप कारण समजले नसून स्थानिकांच्या मदतीने आगीवर  नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला असून, माथेरानमध्ये या आ पत्तीजनक घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न प्रशासनाने, आपत्कालीन  कक्ष, ग्राम सुरक्षा दल, अग्निशमन दल कार्यान्वित करणे गरजेचे आहे, असे  स्थानिकांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :fireआग