शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

चौपदरीकरणामुळे वाहतूक मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 04:37 IST

माणगावजवळ वाहतूककोंडी; म्हसळा, महाडमध्ये पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली

माणगाव : मुंबई-गोवा हा महामार्गाचे चौपदरीकरण होत असून, त्याचाच दुसरा टप्पा इंदापूर ते कशेडी घाट याचे काम चालू झाले आहे. माणगाव तालुक्यातील इंदापूर ते वडपाले दरम्यान रस्त्याचे काम जलद गतीने सुरू झाल्याने चाकरमान्यांचा येथील परतीचा प्रवास त्रासदायक झाला. माणगाव परिसरात काही ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती.मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव शहरात नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. ही वाहतूककोंडी चालकाची नेहमीच डोकेदुखी ठरत आहे. त्यातच गणेशोत्सवाकरिता कोकणात आलेले मुंबईकर परतीचा प्रवास करताना मंगळवार व बुधवार या दोन दिवशी चालकांना माणगाव शहरांतून, तसेच लोणेरे येथे वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागला. मात्र, ही कोंडी सोडविण्याकरिता व वाहतूक पोलीस यंत्रणांनी पर्यायी मार्गाचा चालकांना वापर करावयास सांगितल्याने वाहतूककोंडी कमी झाली. तसेच माणगाव, लोणेरे व इंदापूर शहरातून डिवायडर (दुभाजक)चा वापर केल्याने वाहतूककोंडी कमी होण्यास मदत झाली. मंगळवारी ही वाहतूककोंडी खूप मोठी होती, तर बुधवारला वाहतूककोंडी तुरळक प्रमाणात होती.म्हसळेत वाहतूक वळवलीम्हसळा : म्हसळेत बाजारपेठ परिसरात नेहमीच वाहतूककोंडी होते. मात्र, माणगावकडून येणारी वाहने थेट बायपास मार्गाने तर श्रीवर्धन-बोर्ली मार्गाने येणारी वाहने (अवजड वाहन वगळून) शहरातून वळवण्यात आल्याने वाहतूककोंडी सुटण्यास मदत झाली. त्यामुळे चाकरमान्यांचा परिसरातील प्रवास सोयीस्कर झाला.महामार्गावर वाहनांची गर्दीपोलादपूर : कोकणात गेलेले चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले असून, मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर शहरातील रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी दिसून येत आहे. कशेडी महामार्ग पोलीस व पोलादपूर पोलीस यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवत महामार्गावर अधिक वाहतूककोंडी होऊ दिली नाही. मात्र, कशेडी घाटातील अपघाताची शृंखला चालू आहे. मंगळवारी झालेल्या अपघातामुळे सुमारे अर्धा तास वाहतूककोंडी झाली होती. जादा बसेस, तसेच खासगी वाहने परतीच्या प्रवासात मोठ्या प्रमाणात असल्याने वाहतूक मंद गतीने चालू असल्याचे दिसून येते. पोलादपूर बसस्थानक व महामार्गावर प्रवासी मोठ्या संख्येने वाहनांची वाट पाहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.वाहतूककोंडी टाळण्यासाठी पाचाड-निजामपूर पर्यायी मार्गमहाड : गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेले चाकरमानी महामार्गावरील माणगावसह वडखळ आदी ठिकाणच्या वाहतूककोंडीपासून सुटका होण्यासाठी महाड पाचाड-निजामपूर या पर्यायी मार्गाचा वापर करीत आहेत.गतवर्षीच्या तुलनेत यंदा या वाहतूककोंडीवर उपाययोजना करण्यात वाहतूक पोलिसांना काही प्रमाणात यश आले असले तरीही नियमितच्या या वाहतूककोंडीवर पर्याय काढण्याची आवश्यकता आहे.कोकणात दरवर्षी लाखो चाकरमानी गणेशोत्सवासाठी जातात. यंदा महामार्गावरील खड्ड्यांचे साम्राज्य, तसेच यामुळे होणारी वाहतूककोंडी या बिकट समस्येवर मात करीत चाकरमानी कोकणात सुखरूप पोचले असले तरी चाकरमान्यांचा परतीचा प्रवास मात्र खडतर असल्याचे गेल्या दोन दिवसांपासूनच्या वाहतूककोंडीवरून स्पष्ट होत आहे.या वाहतूककोंडीला पर्याय म्हणून चाकरमानी महाड, पाचाड, घरोशीवाडी, निजामपूर, पास्को,पाली, खोपोली,एक्स्प्रेस वेमार्गे मुंबई या पर्यायी मार्गाचा वापर करीत आहेत. मात्र, अवजड वाहने आणि प्रवासी बसेसना या मार्गावर बंदी करावी, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad transportरस्ते वाहतूकRaigadरायगड