शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी चॉकलेट, हरभरे, शस्त्रास्त्रे अन्...; कठुआमध्ये हाहाकार माजवण्यासाठी दहशतवाद्यांनी काय-काय आणलं होतं
2
Dombivli MIDC Explosion डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा आग, इंडो अमाईन कंपनीत स्फोट, नागरिकांत घबराट
3
सरकार स्थापनेनंतर रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी, घेण्यात आला मोठा निर्णय
4
Sargun Mehta : "Kiss केल्याने मुलं होतात..."; अभिनेत्रीला कॉलेजमध्ये रोमान्सची वाटायची खूप भीती
5
मोठी बातमी: पवारांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; प्रवक्त्याच्या सूचक पोस्टने चर्चांना उधाण
6
रील, ४० हजार फॉलोअर्स अन् अफेअर... ५ मुलांची आई बॉयफ्रेंडसह फरार; म्हणते, नवऱ्याला कंटाळली
7
'विक्रम'वीर झाम्पा! ऑस्ट्रेलियन स्टार खेळाडूनं इतिहास रचला; असं करणारा पहिला खेळाडू ठरला
8
PHOTOS : परदेशात सचिनच्या लेकीचा बोल्ड अवतार; सारा तेंडुलकरचा घायाळ करणारा अंदाज
9
सरपंच ते आमदार... आता ओडिशाचे मुख्यमंत्री; मोहन चरण माझी यांचा राजकीय प्रवास
10
"राग येणं स्वाभाविक पण.."; कंगनाला कानशिलात लगावणाऱ्या महिलेला चिराग पासवान यांचा सल्ला
11
Rahul Gandhi : राम मंदिर बांधले तरी अयोध्येत भाजपाचा पराभव का झाला?; राहुल गांधींनी सांगितलं मोठं कारण
12
Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षी सिन्हा-जहीर इक्बाल रजिस्टर मॅरेज करणार? 23 जूनला होणार सेलिब्रेशन
13
१७ कोटी कॅश, ६८ किलो चांदी आणि सोन्याची बिस्किटं ...; मंदिरातील दानपेटीत कोट्यवधींचं दान
14
पतीच्या कायदेशीर कारवाईनंतर दलजीत कौर पुन्हा केनियाला गेली, दुसरं लग्न टिकवणार?
15
"हे 'नालायक' व्यक्तीच करू शकते", धर्माचा अपमान, अकमलचा माफीनामा पण भज्जीचा संताप कायम
16
Chandrababu Naidu Oath Ceremony : चंद्राबाबू नायडू आज चौथ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; PM नरेंद्र मोदी, अमित शाह उपस्थित राहणार
17
आमदार राजेंद्र राऊत यांच्या मध्यस्थीने मराठा आरक्षणाचा तिढा सुटण्याची शक्यता
18
पाकिस्तानने सामना जिंकला, पण मोहम्मद रिझवानच्या नावे झाला 'हा' लाजिरवाणा विक्रम
19
लग्नाच्या चर्चांवर अखेर सोनाक्षी सिन्हाने सोडलं मौन, म्हणाली- "हा माझा निर्णय आहे..."
20
प्रसिद्ध पापाराझीने केली साऊथ इंडस्ट्रीची पोलखोल; साऊथ स्टारच्या नम्र वागण्याला म्हटलं ढोंग

वणव्यामुळे वनसंपदा धोक्यात; उपाययोजनांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 12:19 AM

जनजागृतीसाठी मोहीम राबविण्याची आवश्यकता

पोलादपूर : हिवाळ्याच्या मध्यावर व उन्हाळ्याच्या सत्रात ठिकठिकाणी वणवा लावण्यात येत आहे. या वणवा संस्कृतीमुळे नैसर्गिक वनसंपदा धोक्यात येत असून वणवा विरोधी मोहीम बारगळली असल्याचे पुन्हा दिसून आले. पोलादपूर वनविभाग याबाबत सुस्त असल्याचे दिसून येत आहे.दरवर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटी जाणीवपूर्वक आंबेनळी व कशेडी घाटात मोठ्या प्रमाणावर वणवे लावले जातात. त्यामुळे तालुक्यातील वनसंपदा, पशू, पक्षी यांच्या कित्येक जाती नष्ट होऊ लागल्या आहेत. तसेच आयुर्वेदिक औषधी वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. काही दिवसांपूर्वी रात्री ११ च्या सुमारास साखर कामथे मार्गावरील रस्त्यालगत वणवा लावण्यात आला होता. या वणव्याच्या भक्ष्यस्थानी झाड आल्याने बुंधा जळून ते रस्त्यावर पडल्याने सदरचा मार्ग बंद झाला होता.तालुक्यातील वणव्याचे सातत्य कायम राहिले असून गुरुवारी सायंकाळी पुन्हा चरई येथील महादेवाच्या डोंगरावर अज्ञाताने वणवा लावल्याने डोंगरावरचे सुकलेले गवत, झाडाची पाने जळून खाक झाली आहेत. महाशिवरात्रीला या डोंगरावर मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी होत असते. सदरचा वणवा रात्री उशिरा शमला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.गेल्या काही वर्षांपासून वणव्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. कोकणातील भूमीला सीतामाईचा शाप व उ:शाप असल्याचे सांगितले जात असून सदरची भूमी जळो व पुन्हा बहरो अशी आख्यायिका आजही बुजुर्ग मंडळी सांगत आहेत. मात्र सातत्याने लावल्या जाणाऱ्या वणव्याच्या भक्ष्यस्थानी वनसंपदा, झाडे, सरपटणारे प्राणी सापडत असल्याने सदरचे प्रकार थांबवावे यासाठी वणवा विरोध कायदा केला गेला. मात्र याची अंमलबजावणी हवी तशी झाली नसल्याने व कायद्याचे भय उरले नसल्याने वणव्याच्या प्रकारांत वाढ होताना दिसून येत आहे. १९२७ च्या वणवाविरोधी कायद्यामध्ये बदल होत गेले आहेत. सुधारित कायद्यात २ वर्षे शिक्षा व ५ हजार रुपये दंड करण्यात आला आहे.महाडसह पोलादपूर तालुक्यात ठिकठिकाणी वणवे लावण्यात येत असल्याने डोंगरच्या डोंगर उजाड होत आहेत. काही वर्षांपूर्वी कशेडी घाट परिसरात भरदुपारी वणवा लावल्याने प्रवासीवर्गाला उन्हाच्या चटक्यांसह वणव्याची धग बसली होती, तर गावागावात लावण्यात येणाºया वनव्याच्या भक्ष्यस्थानी गुरांचा गोठा, वनराई आल्याच्या घटना घडल्या होत्या.पोलादपूर तालुक्यातील साखर कामथे मार्गावर अज्ञाताने लावलेल्या वणव्यात रस्त्यालगत असणारे झाड आल्याने झाडाचा बुंधा जळून सदरचे झाड मुख्य रहदारीच्या मार्गावर पडले होते. या मार्गावरून पोलादपूरकडे येणाºया वाहनचालकाने काही सहकाऱ्यांच्या मदतीने सदरचे झाड बाजूला करत एक बाजू चालू केली. रात्री उशिरा काही ग्रामस्थांनी सदरचा वणवा विझविण्याचा प्रयत्न केला.जंगलात फिरणारे गुराखी व इतर लोक विडी, सिगारेट, आगकाडीचे थोटूक तसेच फेकतात. मध गोळा करणारे टेंभे घेऊन जातात आणि काम झाल्यावर तसेच फेकतात. पीक चांगले यावे म्हणून वणवे लावले जातात. जमिनीवर पडलेल्या पानांचा त्रास होतो म्हणून त्याला आग लावली जाते. गवत पेटवले तर नवीन गवत चांगले येईल, असा गैरसमज आहे. त्याकरिता ते गवत पेटवून देतात. जंगलालगत शेती असेल तर तेथेही सुपीक पिकांसाठी जमीन साफ केली जाते. त्यासाठी लावलेली आग पसरत जाऊन जंगलापर्यंत पोहोचते आणि वणवा भडकतो.कसे पेटतात वणवे?कोरड्या पानगळीच्या जंगलात सर्वदूर पानांचा थर साचतो. गवतही वाळलेले असते. त्यात वातावरणातील कोरडेपण भर टाकते. काही तरी निमित्त घडते आणि वणवा लागतो. हे निमित्त नैसर्गिक असते, तसेच मानवनिर्मितही.नैसर्गिकरीत्या जंगलाला लागणाºया आगीचे प्रमाण केवळ १५ टक्के आहे, तर मानवनिर्मित आगीचे प्रमाण ८५ टक्के आहे. साधारणत: मार्च हा सर्वाधिक वणव्यांचा महिना असतो. या महिन्यात एकूण वणव्यांच्या ४६ ते ६६ टक्के वणवे लागतात. हे प्रमाण एप्रिलमध्ये कमी होते.