शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

मच्छीमार बोटीला आग, १८ खलाशांचा वाचला जीव

By निखिल म्हात्रे | Updated: February 28, 2025 16:05 IST

बोट बाहेर काढण्यासाठी लागला सहा तासांचा काळ

अलिबाग - येथील खोल समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या  बोटीला आग लागली. ९० टक्के बोट जळून खाक झाली असून या बोटमालकाचे १ कोटी ८० लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे बोटीत असलेल्या १८ खलाशांचा जीव वाचला आहे. बोट बाहेर काढण्यसाठी सहा तासांचा अधिक काळ लोटला होता. कोस्ट गार्डच्या मदतीने आग विझविण्यात आली.

शुक्रवारी पहाटे समुद्रातून मच्छीमारी करण्यासाठी एकवीरा माऊली हि बोट गेली होती, बोटीवरील खलाशी परतीचा प्रवास करीत होते. बोटीत अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग ईतकी भयावह होती की बोट पूर्ण जळून खाक झाली. बोटीला आग लागली असल्याचे कळताच आग विझविण्याचा प्रयत्न बोटीतील खलाशांनी केला होता. मात्र त्यांचे प्रयत्न असफल ठरले. आगीचे लोंढे वाढताना दिसातच बोलतील खलाशांनी समुद्रात उड्या घेतल्या व होडीतून किनार्‍यावर आले.

कोस्ट गार्डच्या मदतीने आग विझविण्यात आली मात्र बोटीतील जाळी, मच्छिमारासाठी लागणारे अवजारे जळून खाक झाली. समुद्रातील बोट किनार्‍यावर आणण्यासाठी एक एक करीत सर्व मच्छीमार बोट बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न करू लागले होते. बोटीतील यंत्र सामुग्री निकामी झाली आहे. साधारण सहा तासांच्या अथक परीश्रमानंतर बोट बाहेर काढण्यात मच्छीमारांना यश आले.

पहाटेच्या सुमारास बोटीला आग लागल्याचे आम्हाला कळताच आम्ही दुसऱ्या बोटीने घटनास्थळी पोहोचलो. तो पर्यंत बोट पूर्ण जळून खाक झाली होती. बोटीचा पाया फक्त राहिला. या बोटीला खेचत जटेटीवर आणले. या दुर्घटनेमुळे आमचे १ कोटी ८० लाखाचे नुकसान झाले आहे. एकतर अगोदर आम्ही कर्ज बाजरी आहोत, त्यात पुन्हा आता आमच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे.- राकेश गण, बोटीचे मालक.

पहाटे चारच्या सुमारास अचानक हा प्रसंग घडला आहे. त्यामधे आमच्या नाखवाची हानी झाली आहे. अनेकवेळा असे नुकसान होत असते, आमच्या मदतीला सरकार कधीच धाऊन येत नाही. आता तरी आमच्या या बांधवाला सरकारने आर्थिक मदतीचा हात पुढे करावा.- भगवान नाखवा, मच्छीमार. 

टॅग्स :alibaugअलिबागfireआग