शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

पावणेसात हजार हेक्टर शेतीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 11:54 PM

रायगडमधील फळबागांचे मोठे नुकसान : ११ हजार ४३१ घरांची पडझड; पंचनामे करण्याचे काम सुरू

निखिल म्हात्रे।लोकमत न्यूज नेटवर्करायगड : जिल्ह्यात बुधवारी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर सहा हजार ७६६.२२ हेक्टर शेती व फळबाग लागवड क्षेत्राचे नुकसान झाले. अंदाजे ११ हजार ४३१ घरांची पडझड झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली आहे. तर गोठे व इतर पडझड झाल्याची माहिती घेत त्यांचे पंचनामे करण्याचे काम शासनामार्फत सुरू आहे.

निसर्ग वादळाचे पर्व संपल्यानंतर जिल्ह्यात गुरुवारपर्यंत सतत पाऊस पडत होता. त्यामुळे जिल्ह्यातील रस्ते साफ करताना अनेक संकटांचा सामना करावा लागला. जिल्हा प्रशासनाबरोबर पोलीस प्रशासनही रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करीत नागरिकांना येण्या-जाण्यासाठी रस्ता मोकळा कररून देत होते. आपत्ती व्यवस्थापन व पोलीस विभागामार्फत आपत्ती आलेल्या ठिकाणी, योग्यरीत्या कामकाज केल्याने जीवितहानी टळली; मात्र या आपत्तीत घरे व गोठे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

निसर्ग वादळात अलिबागमधील एक, माणगावमध्ये दोन तर श्रीवर्धनमध्ये एक अशा एकूण चौघा जणांना आपला जीव गमवावा लागला. तर ३९ गुरे या वादळामुळे मृत्युमुखी पडली. जिल्ह्यातील टेलिफोन सेवा पूर्णत: खंडित झाली असून ती पूर्ववत करण्यासाठी आणखी दोन दिवस लागणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तळा तालुक्यातील १०३ शाळा, ९३ अंगणवाड्या, १४ ग्रामपंचायत कार्यालये, एक प्राथमिक आरोग्य केंद्र तर एका डॉक्टर निवासाचे नुकसान झाले आहे.

खालापूर तालुक्यात शाळा, २ शासकीय कार्यालये; माणगाव २ शाळा, २ शासकीय कार्यालये; महाड ४ शाळा, १ शासकीय गोदाम; श्रीवर्धन ३४० शासकीय कार्यालये; म्हसळा येथे २५० शाळा, १० मंदिरे तसेच १६ शासकीय कार्यालयांचे नुकसान झाले आहे. तर रायगड जिल्ह्यात १४ हजार ७०५ विद्युत खांब व तारा तुटल्या आहेत. सध्या विद्युत खांब व तारा जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून जिल्हा प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी धावून जात आहे.एक लाख ९८ हजार ३५४ झाडे जमीनदोस्तरायगड जिल्ह्यात अंदाजे एक लाख ९८ हजार ३५४ झाडे जमीनदोस्त झाली आहेत. झाडे पडण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याने जिल्ह्यात मोठी वित्तहानी झाली आहे. रस्त्यावर झाडे पडल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. मात्र जिल्हा प्रशासन व स्थानिकांच्या मदतीने रस्त्यात पडलेली झाडे बाजूला करून गावांची कनेक्टिव्हिटी होण्यास मदत झाली आहे. तर ११ हजार ४३१ घरांची पडझड झाली असून ती दुरुस्त करण्याचे काम सध्या जिल्हाभरात जोरदार सुरू आहे. एकूण ३६४ शाळा, ३६० शासकीय कार्यालये, ९३ अंगणवाड्या, १० मंदिरे, १ शासकीय गोदाम, १४ ग्रामपंच्यात कार्यालये, एक प्राथमिक आरोग्य केंद्र तर एक डॉक्टर निवास यांचे नुकसान झाले आहे.थळ परिसराची मुख्यमंत्र्यांनी के ली पाहणीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी रायगड दौऱ्यावर आले होते. निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर हा त्यांचा दौरा होता. अलिबाग तालुक्यातील थळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या परिसराची पाहणी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी दुपारी १२ च्या सुमारास केली. अलिबाग थळ येथे झाडे, विजेचे पोल पडून अतोनात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री येणार म्हणून थळ परिसरात पडलेली झाडे बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.नागोठणेत ५० लाखांचे नुकसान; पंचनाम्यासाठी ग्रामपंचायतीची मदतनागोठणे : बुधवारी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने नागोठणे शहरात ५० लाखांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी सायंकाळी रोह्याचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांनी शहराच्या विविध भागांत फिरून नुकसानीची पाहणी केली असून नुकसानीचे पंचनामे करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. पंचनामे तलाठ्यांना एकाचवेळी करणे शक्य नसल्याने नुकसानीची प्राथमिक माहिती घेण्यासाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी कार्यरत करण्यात आले.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ