शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

रसायनीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 3:22 AM

रसायनी येथील आठपेक्षा जास्त गावांची १६०० एकर जमीन भारत सरकारने १९६० मध्ये संपादित केली आहे. यातील काही जमीन कंपनीने वापरात आणली तर काही जमीन शिल्लक असून तेथे गेल्या साठ वर्षे शेतक-यांची वहिवाट असून शेतलागवड केली जाते.

मोहोपाडा : रसायनी येथील आठपेक्षा जास्त गावांची १६०० एकर जमीन भारत सरकारने १९६० मध्ये संपादित केली आहे. यातील काही जमीन कंपनीने वापरात आणली तर काही जमीन शिल्लक असून तेथे गेल्या साठ वर्षे शेतक-यांची वहिवाट असून शेतलागवड केली जाते. कंपनीने वापर न केलेली जमीन मूळ मालक शेतकºयांना परत देता येणार नाही अशी भूमिका सरकारने घेतल्याने शुक्रवारी २३ मार्चपासून रसायनी एचओसी गेटजवळ धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आता नाही तर कधीच नाही या आशयाखाली रसायनीतील वेगवेगळ्या भागातून शेतकरी एकवटून त्यांनी चांभार्लीहून मोहोपाडा मार्गे रॅली काढली. ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’ अशी घोषणा देत रॅली एचओसीजवळ आली.यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकºयांची रॅली एचओसी गेटसमोर येवून पदाधिकाºयांनी आपापल्या भाषणातून मार्गदर्शन केले. शेतकºयांच्या मागणीबाबत बारा वर्षांत सरकार स्तरावर अनेकदा चर्चा झाल्या आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ११ आॅक्टोबर २०१७ रोजी मंत्रालयात रसायनीतील प्रकल्पग्रस्त शेतकºयांची एचओसीबाबत बैठक बोलावली होती. यावेळी शेतकºयांनी कंपनीची जमीन विकण्यास विरोध केला होता. त्यावेळी सरकारने दिलेले आश्वासन न पाळल्याने या परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या वतीने समीर खाने यांनी सांगितले. रसायनी परिसरातील १९६० साली भूसंपादित जमीन विक्र ी करण्यास देण्यात आलेली परवानगी रद्द करावी व शेतकºयांच्या वहिवाटीतील जमिनी परत मिळाव्यात, शासनाने शिल्लक जमीन ही मूळ मालकाला परत देता येणार नाही ही एनओसी रद्द करून २०१३ च्या कायद्याची अंमलबजावणी न केल्यास मंगळवार २७ मार्चपासून बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा शेतकºयांनी दिला. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी, परिसरातील ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य ,आजी-माजी सभापती व सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

टॅग्स :Farmerशेतकरी