शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

शेतीचे पंचनामे रखडले; सरकारी यंत्रणेत समन्वयाचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 01:18 IST

महिन्याभरापूर्वी पोशीर गावात पुराच्या पाण्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे

नेरळ : महिन्याभरापूर्वी पोशीर गावात पुराच्या पाण्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसामुळे अनेकांची शेती वाहून गेली, तर अनेकांचे शेताचे बांध फुटून नुकसान झाले आहे. याबाबत तलाठी आणि कृषी विभागाचे अधिकारी यांच्या अनेक वेळा निदर्शनास आणूनही दीड महिना उलटूनही अद्याप नुकसान झालेल्या शेतीचा पंचनामा करण्यात आलेला नाही. कृषी अधिकारी आणि महसूल विभागाचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने शेतीचे पंचनामे अद्याप करण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.कर्जत तालुक्यात १६ जुलै रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तालुक्यात अनेक शेतकºयांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी आणि महसूल विभागाकडून अनेक ठिकाणी, गावागावांत पंचनामे करण्यात आले असले तरी पोशीरमध्ये नुकसान झालेल्या शेतीचे अद्याप पंचनामे करण्यात आले नाहीत. मेहनतीने लावलेली शेती वाहून गेल्याने शेतकरी चिंतेत आहेत. नुकसान झालेल्या शेतीची भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र, कृषी व महसूल अधिकाºयांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने दोन्ही विभागांकडून शेतकºयांकडे दुर्लक्ष होत आहे.कृषी सहायक अधिकारी यांनी आठडाभरापूर्वी येऊन दोन ते तीन शेताची पाहणी केली; परंतु पंचनामे केले नाहीत. या नुकसान झालेल्या शेतीची ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी अधिकारी यांनी संयुक्त पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश असताना मात्र कृषी आणि तलाठी त्यांच्यात समन्वय नसल्याने दिसून येत आहे. नुकसान झालेल्या शेतीचे लवकरात लवकर पंचनामे करावेत आणि झालेल्या शेतीची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पोशीरमधील शेतकºयांनी केली आहे.पुराच्या पाण्याने लावलेली शेती वाहून गेली आहे. तसेच शेताच्या बांधांची मोठ्या प्रमाणात धूप झाली असून, माती शेतात आली आहे. तसेच अनेक शेतकºयांची शेती वाहून गेली असून शेताचे बांधही फुटून दगड माती शेतात आली असल्याने भात शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानाची भरपाई मिळावी.- काशिनाथ राणे, शेतकरी, पोशीरग्रामसेवक, तलाठी आणि कृषी अधिकारी यांनी मिळून हे पंचनामे करण्याचे आदेश आहेत, अनेक ठिकाणी पंचनामे झाले आहेत. बिरदोले आणि पोशीर विभागात तत्काळ पंचनामे करण्यास सांगितले जाईल.- अविनाश कोष्टी, तहसीलदार, कर्जतशेतीच्या नुकसानासंदर्भात तलाठी आणि कृषी सहायक अधिकारी यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधला असता, दोन्ही विभागाचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत, म्हणजेच कृषी विभाग आणि महसूल विभाग यांच्यात समन्वय नसल्याने पोशीरमधील शेतकºयांच्या नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे राहिले असल्याचे उघड आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRaigadरायगड