शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

शेतीचे पंचनामे रखडले; सरकारी यंत्रणेत समन्वयाचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 01:18 IST

महिन्याभरापूर्वी पोशीर गावात पुराच्या पाण्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे

नेरळ : महिन्याभरापूर्वी पोशीर गावात पुराच्या पाण्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसामुळे अनेकांची शेती वाहून गेली, तर अनेकांचे शेताचे बांध फुटून नुकसान झाले आहे. याबाबत तलाठी आणि कृषी विभागाचे अधिकारी यांच्या अनेक वेळा निदर्शनास आणूनही दीड महिना उलटूनही अद्याप नुकसान झालेल्या शेतीचा पंचनामा करण्यात आलेला नाही. कृषी अधिकारी आणि महसूल विभागाचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने शेतीचे पंचनामे अद्याप करण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.कर्जत तालुक्यात १६ जुलै रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तालुक्यात अनेक शेतकºयांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी आणि महसूल विभागाकडून अनेक ठिकाणी, गावागावांत पंचनामे करण्यात आले असले तरी पोशीरमध्ये नुकसान झालेल्या शेतीचे अद्याप पंचनामे करण्यात आले नाहीत. मेहनतीने लावलेली शेती वाहून गेल्याने शेतकरी चिंतेत आहेत. नुकसान झालेल्या शेतीची भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र, कृषी व महसूल अधिकाºयांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने दोन्ही विभागांकडून शेतकºयांकडे दुर्लक्ष होत आहे.कृषी सहायक अधिकारी यांनी आठडाभरापूर्वी येऊन दोन ते तीन शेताची पाहणी केली; परंतु पंचनामे केले नाहीत. या नुकसान झालेल्या शेतीची ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी अधिकारी यांनी संयुक्त पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश असताना मात्र कृषी आणि तलाठी त्यांच्यात समन्वय नसल्याने दिसून येत आहे. नुकसान झालेल्या शेतीचे लवकरात लवकर पंचनामे करावेत आणि झालेल्या शेतीची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पोशीरमधील शेतकºयांनी केली आहे.पुराच्या पाण्याने लावलेली शेती वाहून गेली आहे. तसेच शेताच्या बांधांची मोठ्या प्रमाणात धूप झाली असून, माती शेतात आली आहे. तसेच अनेक शेतकºयांची शेती वाहून गेली असून शेताचे बांधही फुटून दगड माती शेतात आली असल्याने भात शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानाची भरपाई मिळावी.- काशिनाथ राणे, शेतकरी, पोशीरग्रामसेवक, तलाठी आणि कृषी अधिकारी यांनी मिळून हे पंचनामे करण्याचे आदेश आहेत, अनेक ठिकाणी पंचनामे झाले आहेत. बिरदोले आणि पोशीर विभागात तत्काळ पंचनामे करण्यास सांगितले जाईल.- अविनाश कोष्टी, तहसीलदार, कर्जतशेतीच्या नुकसानासंदर्भात तलाठी आणि कृषी सहायक अधिकारी यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधला असता, दोन्ही विभागाचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत, म्हणजेच कृषी विभाग आणि महसूल विभाग यांच्यात समन्वय नसल्याने पोशीरमधील शेतकºयांच्या नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे राहिले असल्याचे उघड आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRaigadरायगड