शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

शेतीचे पंचनामे रखडले; सरकारी यंत्रणेत समन्वयाचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 01:18 IST

महिन्याभरापूर्वी पोशीर गावात पुराच्या पाण्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे

नेरळ : महिन्याभरापूर्वी पोशीर गावात पुराच्या पाण्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसामुळे अनेकांची शेती वाहून गेली, तर अनेकांचे शेताचे बांध फुटून नुकसान झाले आहे. याबाबत तलाठी आणि कृषी विभागाचे अधिकारी यांच्या अनेक वेळा निदर्शनास आणूनही दीड महिना उलटूनही अद्याप नुकसान झालेल्या शेतीचा पंचनामा करण्यात आलेला नाही. कृषी अधिकारी आणि महसूल विभागाचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने शेतीचे पंचनामे अद्याप करण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.कर्जत तालुक्यात १६ जुलै रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तालुक्यात अनेक शेतकºयांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी आणि महसूल विभागाकडून अनेक ठिकाणी, गावागावांत पंचनामे करण्यात आले असले तरी पोशीरमध्ये नुकसान झालेल्या शेतीचे अद्याप पंचनामे करण्यात आले नाहीत. मेहनतीने लावलेली शेती वाहून गेल्याने शेतकरी चिंतेत आहेत. नुकसान झालेल्या शेतीची भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र, कृषी व महसूल अधिकाºयांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने दोन्ही विभागांकडून शेतकºयांकडे दुर्लक्ष होत आहे.कृषी सहायक अधिकारी यांनी आठडाभरापूर्वी येऊन दोन ते तीन शेताची पाहणी केली; परंतु पंचनामे केले नाहीत. या नुकसान झालेल्या शेतीची ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी अधिकारी यांनी संयुक्त पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश असताना मात्र कृषी आणि तलाठी त्यांच्यात समन्वय नसल्याने दिसून येत आहे. नुकसान झालेल्या शेतीचे लवकरात लवकर पंचनामे करावेत आणि झालेल्या शेतीची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पोशीरमधील शेतकºयांनी केली आहे.पुराच्या पाण्याने लावलेली शेती वाहून गेली आहे. तसेच शेताच्या बांधांची मोठ्या प्रमाणात धूप झाली असून, माती शेतात आली आहे. तसेच अनेक शेतकºयांची शेती वाहून गेली असून शेताचे बांधही फुटून दगड माती शेतात आली असल्याने भात शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानाची भरपाई मिळावी.- काशिनाथ राणे, शेतकरी, पोशीरग्रामसेवक, तलाठी आणि कृषी अधिकारी यांनी मिळून हे पंचनामे करण्याचे आदेश आहेत, अनेक ठिकाणी पंचनामे झाले आहेत. बिरदोले आणि पोशीर विभागात तत्काळ पंचनामे करण्यास सांगितले जाईल.- अविनाश कोष्टी, तहसीलदार, कर्जतशेतीच्या नुकसानासंदर्भात तलाठी आणि कृषी सहायक अधिकारी यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधला असता, दोन्ही विभागाचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत, म्हणजेच कृषी विभाग आणि महसूल विभाग यांच्यात समन्वय नसल्याने पोशीरमधील शेतकºयांच्या नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे राहिले असल्याचे उघड आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRaigadरायगड