शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याच्या पैशाची प्रतिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2023 16:16 IST

आंब्याचे 14 हजार हेक्टर क्षेत्र असून उत्पादनक्षम क्षेत्र 12 हजार 500 हेक्टर आहे.

निखील म्हात्रे

लोकमत न्युज नेटवर्कअलिबाग - अवकाळी पाऊस व हवामान बदलामुळे गतवर्षी हजारो हेक्टर आंबा पिकाचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना फळपिक विमा मिळण्याची आशा होती. मात्र दिवाळी आली तरीही शेतकऱ्यांना ही भरपाई मिळालेली नसल्याने त्यांच्याच कमालीची नाराजी आहे.रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग, रोहा, मुरूड, श्रीवर्धन,माणगांव, म्हसळा या तालुक्यात मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड केली जाते.

आंब्याचे 14 हजार हेक्टर क्षेत्र असून उत्पादनक्षम क्षेत्र 12 हजार 500 हेक्टर आहे. भात शेतीखालोखाल फळबागांच्या उत्पादनाकडे पाहिले जाते. जिल्ह्यात वीस हजारपेक्षा अधिक आंबा उत्पादक शेतकरी आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळावे म्हणून सरकारने प्रधानमंत्री फळ पिकविमा योजना सुुरू केली आहे. दरवर्षी हेक्टरी 29 हजार 400 रुपये विम्याचा हप्ता शेतकऱ्यांकडून घेतला जात आहे. गेल्या वर्षी अवकाळी पावसासह बदलत्या हवामानामुळे आंबा उत्पादनाचे प्रचंड नुकसान झाले. सात हजार 850 शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला. सुमारे चार हजार हेक्टरपेक्षा अधिक आंबा पिकाचे नुकसान झाले.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी सात हजार 456 शेतकऱ्यांनी फळ पीक विम्यासाठी नोंदणी केली. परंतु आजतागायत या शेतकऱ्यांना त्यांच्या विम्याचे पैसे सरकारकडून मिळाले नाहीत, अशी माहिती समोर येत आहे. केंद्राकडून सबसिडी मिळण्यास दिरंगाई झाल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी विम्याच्या प्रतिक्षेत आहेत. सरकारने दिवाळीपूर्वी विम्याचे पैसे खात्या जमा होतील असे आश्वासन दिले. मात्र दिवाळी सुरू होऊनदेखील विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही. त्यामुळे सरकारचे आश्वासन पोकळ ठरल्याचे समोर आले आहे.फळ पिक विम्याचे निकष रायगड जिल्ह्यासाठी चुकीचे आहेत. विम्याचा प्रिमिअम चौपट केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात 56 हजार आंबा उत्पादक असतानाही फक्त दहा टक्के आंबा उत्पादक शेतकरी विमा भरतात. झालेल्या नुकसानीची भरपाई पदरी पडत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे.- चंद्रकांत मोकल, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघफळ पीक विम्याचा हप्ता हेक्टरी 29 हजार 400 आहे. जिल्ह्यातील सात हजार 456 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 28 शेतकऱ्यांचे अर्ज फेटाळल्यात आले आहे. त्यामुळे सात हजार 428 अर्ज पात्र ठरले आहेत. केंद्र सरकारकडून सबसिडी आली नव्हती. परंतु दिवाळीच्या दोन दिवस अगोदर विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील.- शरद कबाडे, जिल्हा समन्वयक.गेल्यावर्षी बदलत्या हवामानाबरोबरच अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे प्रचंड नुकसान झाले. सुमारे तीन लाखपेक्षा अधिक फटका बसला. फळ पिक विम्याची प्रतिक्षा गेल्या वर्षभरापासून आहे. अजूनपर्यंत विम्याचे पैसे मिळाले नाहीत.- मनोज पाटील, आंबा उत्पादक शेतकरी

टॅग्स :Farmerशेतकरी