शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

शेतकरी हवालदिल : पावसाचा भात पिकाला फटका , महाड तालुक्यात पंचनामे करण्याची नागरिकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:43 IST

सध्या महाड तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. गेल्या १५ दिवसांपासून दुपारनंतर विजेच्या कडकडाटासह तसेच सोसाट्याचा

दासगाव : सध्या महाड तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. गेल्या १५ दिवसांपासून दुपारनंतर विजेच्या कडकडाटासह तसेच सोसाट्याचा वाºयासह संपूर्ण महाड तालुक्यात जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. सध्या भात शेती कापणीसाठी तयार होत असताना सततच्या पाऊस, वाºयामुळे ही शेती जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे इतर नुकसानीसोबत या पावसामुळे भातशेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.गेल्या १५ दिवसांपासून महाड तालुक्यात वादळी वारा तसेच विजेचा गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. परतीच्या या पावसाने नागरिकांना हैराण करून सोडले आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये दर दिवशी विजेच्या तडाख्यामुळे चार ते पाच तास वीज गायब राहते, तर दर दिवशी या वादळी पावसामुळे अनेक गावांमध्ये घरांचे छप्पर उडणे, घरांवर झाड कोसळणे तसेच घरांवर वीज कोसळणे हे सुरूच आहे. अशा परिस्थितीला सामोरे जात असताना मात्र मोठा प्रश्न शेतकºयांसमोर उभा राहिला आहे. या पावसामुळे गौरीच्या सणामध्ये पसवून आॅक्टोबरअखेर कापणीसाठी तयार होणारी भात शेती मात्र जमीनदोस्त झाली आहे.दरवर्षीप्रमाणे यंदा परतीच्या पावसाने महाड तालुक्याला विजेच्या गडगडाटासह झोडपून काढले आहे. तसेच दर दिवस सुटणाºया सोसाट्याच्या वाºयामुळे महाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांचे छप्पर, कौले तसेच झाड घरांवर कोसळणे, विजेच्या तारांवर कोसळणे हे सुरूच आहे.सध्याच्या परिस्थितीत महाड तालुक्यातील नागरिक या परतीच्या पावसाने हैराण झाले आहेत. यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस