शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग काय अमित शाह येताहेत का इंडिया आघाडीत?, आम्ही त्यांना पंतप्रधान करतो : संजय राऊत
2
Amit Shah : Video - "तीन टप्प्यात भाजपाने किती जागा जिंकल्या?"; अमित शाह यांची 'भविष्यवाणी'
3
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
4
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
5
देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्राला 'उबाठा'चीही मान्यता; भाजपाचा हल्लाबोल 
6
भारतामध्ये ६५ वर्षांत हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली, अहवालावरून खळबळ, भाजपा-कांग्रेसचे आरोप प्रत्यारोप   
7
WhatsApp कॉल आता आणखी सोपे होणार! नवीन फीचर कॉल मॅनेजमेंटला सुपरफास्ट बनवणार
8
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ! दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडी मोठं पाऊल उचलणार
9
देसी सुपरस्टार मनोज वाजपेयींच्या 'भैय्याजी'चा अ‍ॅक्शनपॅक ट्रेलर भेटीला
10
अक्षय्य तृतीया: कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे, आद्य समाजसुधारक, संत महात्मा बसवेश्वरांची जयंती
11
IPL 2024: लखनौच्या फ्रँचायझीने पोलिसांचे १० कोटी रूपये थकवले; एका सामन्याची फी आहे...
12
दमदार इंजिन अन् शानदार मायलेज; लॉन्च झाली नवीन मारुती Swift, जाणून घ्या किंमत...
13
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल
14
KL Rahul ला झापणाऱ्या संजीव गोएंका यांनी MS Dhoni लाही अचानक कर्णधारपदावरून हटवले होते... 
15
"बेटा, लायकीपेक्षा मोठं घे", शाहरुख खानने राजकुमार रावला घर घेताना दिला होता सल्ला
16
Go Digit IPO : १५ मे पासून खुला होतोय 'हा' IPO, ग्रे मार्केटमध्ये तुफान तेजी; Virat Kohli ची आहे गुंतवणूक
17
अक्षय्य तृतीया: ‘असे’ कसे करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, अद्भूत योग, महत्त्व अन् मान्यता
18
धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ
19
Jupiter Wagons Share Price : रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; ८ रुपयांवरुन ४०० पार, नफा वाढला
20
...आता महाराष्ट्राचा शाप काय असतो तो मोदीजींनी अनुभवावा; उद्धव ठाकरेंचा इशारा

उधाणाचे पाणी २३०० एकर शेतीत, १३०० शेतकरी कुटुंबेचिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 1:22 AM

खारभूमी विकास खात्याच्या पेण तालुक्यातील जुई-अब्बास खारभूमी योजनेमधील खारढोंबी व खारमाचेला गावांजवळील समुद्र भरती संरक्षक बंधारे (बाहेरकाठे) गेल्या तीन दिवसांपासून फुटून उधाणाच्या भरती

जयंत धुळपअलिबाग : खारभूमी विकास खात्याच्या पेण तालुक्यातील जुई-अब्बास खारभूमी योजनेमधील खारढोंबी व खारमाचेला गावांजवळील समुद्र भरती संरक्षक बंधारे (बाहेरकाठे) गेल्या तीन दिवसांपासून फुटून उधाणाच्या भरतीचे खारे पाणी माचेला, चीर्बी, खारघाट, जांभेळा, ढोंबी, खारपाले, म्हैसबाड, देवळी, जुई अब्बास, आनंद नगर या तब्बल दहा गावांतील सुमारे २३०० एकरांत भातशेतीमध्ये घुसले. यामुळे १३०० शेतकरी कुटुंबांच्या हातातोंडाशी आलेल्या नव्या भात पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. ही शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती साकव ग्रामविकास संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.पूर्वीच्या निप्पॅन डेन्रो इस्पात तर आताच्या जेएसडब्ल्यू स्टील लि. या कंपनीने आपल्या प्रकल्प विस्तारासाठी मोठ्या प्रमाणात जमीन भूसंपादन केली आहे. हे करताना पर्यावरणाचा व बाजूच्या भौगोलिक परिस्थितीचा कोणताही विचार न करता, येथील पूर्वपार असणारे पाणी वाहून जाण्याचे मार्ग मातीचा भराव करून बुजविले आहेत. त्यामुळे भरती आणि ओहटीचे प्रवाह त्याचबरोबर पावसाळ्यात डोंगर माथ्यावरून येणारे पाणी वाहून जाणारे मार्ग बंद झाल्याने खारढोंबी, माचेला येथे समुद्र भरती संरक्षक बंधारे (बाहेरकाठे) व जुई अब्बास गावाच्या दोन उघाड्या पूर्णपणे फुटून हजारो एकर भातशेतीत समुद्राचे हे खारे पाणी घुसून शेतात कापून ठेवलेले भात वाहून जावून मोठे नुकसान झाले असल्याचे शिवकर यांनी सांगितले.जेएसडब्ल्यू स्टील लि. या कंपनीने केलेल्या या भरावामुळे निर्माण झालेल्या समस्या आणि धोक्याच्या छायेत आलेली शेकडो एकर भातशेती या संदर्भात पेण उप विभागीय महसूल अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या कार्यालयासमोर गेल्या २३ मे २०१७ रोजी या सर्व गावांतील शेतकºयांचे उपोषण आंदोलन झाले होते. त्यावेळी पेण उप विभागीय महसूल अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी शेतकरी, जेएसडब्ल्यू कंपनीचे अधिकारी अरु ण शिर्के, खारभूमी विभागाचे अधिकारी, कृषी अधिकारी व पेण तहसीलदार अजय पाटणे यांची संयुक्त बैठक होऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे व फुटलेले बांध (खांडी)बांधून देण्याचे आदेश जेएसडब्ल्यू कंपनीला दिले होते. परंतु उप विभागीय महसूल अधिकाºयांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पंचनामे व फुटलेले बांध (खांडी) बांधून देण्याच्या कामाची अंमलबजावणी कंपनीकडून झाली नाही. अखेर उधाणाचे खारे पाणी धरमतर खाडीमधून येवून तयार व कापून ठेवलेल्या भात शेतीत घुसून हा कटू प्रसंग शेतकºयांवर ओढवला आहे.अन्यथा शेतकºयांना भातशेतीऐवजी मीठ पिकवावे लागेल१तुटलेले बाहेरकाठे जर लवकर बांधले नाही तर याच फुटलेल्या बांधांचे आकारमान वाढत राहील व दिवसेंदिवस खारे पाणी अधिक प्रमाणात भातशेतीत घुसण्याची प्रक्रि या सतत घडत राहून शेतकºयांना भातशेतीऐवजी मीठ पिकवावे लागेल, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे शिवकर यांनी स्पष्ट करुन, बाहेरकाठे युद्धपातळीवर बांधून देण्याची नैतिक जबाबदारी शासनाची असून या कामाकरिता खारभूमी खात्याला विशेष निधी उपलब्ध करुन देणे अत्यावश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली.२२३ मे २०१७ रोजी पेण उप विभागीय महसूल अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे व कंपनीच्या वतीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सामाजिक भावनेने हे काम केले पाहिजे. अन्यथा भूसंपादनासाठी माती भराव करून उभारलेल्या कारखान्याला गडगंज नफा होईल व शेतकरी मात्र उद्ध्वस्त होईल याचा कंपनीने व शासनाने विचार करावा, असे आवाहन बाधित शेतकºयांच्या वतीने त्यांनी केले आहे.पंचनामे करण्याचे तहसीलदारांचे आदेशसामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर, खार डोंगर मेहनत आघाडीचे प्रमुख पांडुरंग तुरे आणि खारपाले-जोळे, जुई-अब्बास-जोळे पंचक्र ोशी शेतकरी मंडळ यांनी या संदर्भात पेण उप विभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड व पेण तहसीलदार अजय पाटणे व खारभूमी विकास खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी पाहणी करावी अशी मागणी केली.त्यास अनुसरुन बुधवारी खारभूमी विकास खात्याच्या उप अभियंता सोनल गायकवाड, शाखा अभियंता सुभाष निंबाळकर व शाखा अभियंता दीपक आजगावकर व खारपाले, गडाब, जुई येथील शेतकरी लक्ष्मण केणी, माणिक गावंड, हरिश्चंद्र तांडेल, काका म्हात्रे व जेएसडब्ल्यू कंपनीचे अधिकारी यांनी धरमतर खाडी मार्गे बोटीने जाऊन प्रत्यक्ष समुद्र भरती संरक्षक बंधारे (बाहेरकाठे) फुटलेल्या ठिकाणांची पाहणी केली.पंचनामे करण्याचे आदेश तत्काळ देण्यात आले आहेत. दोन दिवसांत पंचनामे करण्याचे काम होईल, त्यावेळी नेमक्या नुकसानीची परिस्थिती स्पष्ट होईल. पंचनामे प्राप्त होताच अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल अशी माहिती पेण तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली आहे.

टॅग्स :Raigadरायगड