शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

रायगडमधील ९० ग्रा.पं.चा निवडणूक कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 1:07 AM

मार्च २०१९ मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या सुमारे २६४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे.

पेण : मार्च २०१९ मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या सुमारे २६४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. २४ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मतदान या ग्रामपंचायतीसाठी होणार असून बुधवारी २३ जानेवारीपासून संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.राज्यभरातील सहा प्रशासकीय विभागातील कोकण, नाशिक, पुणे औरंगाबाद, अमरावती व नागपूर या विभागातील ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे. सर्वाधिक कोकण विभागातील १३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायतींसाठी थेट सरपंच निवडद्वारे होणारी ही निवडणूक येणाºया लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक ठरणाºया आहेत. पेणमधील पाच मोठ्या ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश असल्याने राजकीय रणांगण तापणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमात २५ जानेवारीला निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे, निवडणूक उमेदवारी अर्ज मागविण्याचा व सादर करण्याची तारीख ४ ते ९ फेब्रुवारी २०१९ या दिवसात सकाळी १० ते दु. ३ वाजेपर्यंत आहे. उमेदवारी अर्जाची छाननी ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजलेपासून छाननी संपेपर्यंत, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख १३ फेब्रुवारी रोजी दु. ३ वाजेपर्यंत आहे. याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप दु. ३ वाजल्यानंतर होईल. मतदान २४ फेब्रुवारी रोजी रविवार सकाळी ७.३० ते ५.३० वाजेपर्यंत होणार आहे. निवडणुकीचा निकाल २५ फेब्रुवारी रोजी संबंधित ग्रामपंचायतीच्या तालुक्याच्या ठिकाणी जाहीर होईल.पेणमधील पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकानिवडणूक होणाºया राज्याच्या प्रशासकीय सहा विभागातील कोकणातील सर्वाधिक १३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. सर्वाधिक रायगडमधील ९० ग्रामपंचायत, रत्नागिरी ४० तर सिंधुदुर्ग १ अशाप्रकारे सहभाग आहे. पेण तालुक्यातील मोठ्या संख्येने मतदार असलेल्या वढाव, उंबर्डे, शिर्की, कांदळे व शिहू या पाच ग्रामपंचायतीमध्ये २४ फेब्रुवारी रोजी मतदान होत असल्याने पेण अंतोरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपाठोपाठ या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय हालचालींचा वेग वाढला आहे.जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायतींसाठी थेट सरपंच निवडद्वारे होणारी ही निवडणूक येणाºया लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक आहे.