शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
3
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
5
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
6
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
7
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
8
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
9
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
10
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
11
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
12
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
13
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
14
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
15
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
16
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
17
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
18
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
19
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
20
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील

तोंडसुरे शाळा भरते कोसळलेल्या इमारतीत

By admin | Updated: August 13, 2016 04:03 IST

तालुक्यातील आयएसओ मानांकित व रायगड जिल्हा परिषदेने आदर्श पुरस्कार देऊन गौरव केलेली प्राथमिक तोंडसुरे शाळेची इमारत २८ जून २०१६ रोजी मुसळधार पावसात कोसळली.

म्हसळा : तालुक्यातील आयएसओ मानांकित व रायगड जिल्हा परिषदेने आदर्श पुरस्कार देऊन गौरव केलेली प्राथमिक तोंडसुरे शाळेची इमारत २८ जून २०१६ रोजी मुसळधार पावसात कोसळली. त्यावेळी तीनपैकी दोन वर्गखोल्यांचे नुकसान झाले असून एका वर्गखोलीच्या भिंतीला तडे गेले आहेत. पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने कोसळलेल्या इमारतीमध्येच शाळा भरवली जात आहे. इमारत कोसळून एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असतानाही रायगड जिल्हा परिषदेने नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध केला नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.म्हसळा तालुक्यातील प्राथमिक शाळेची इमारत १९६१ मध्ये बांधण्यात आली. सद्यस्थितीत शाळेमध्ये पहिली ते सातवीचे वर्ग भरत असून ५१ विद्यार्थी शिकत आहेत. शालेय व्यवस्थापन समिती, तीन गाव समिती व शिक्षकवृंद यांनी अथक परिश्रम घेऊन शैक्षणिक दर्जासोबतच शाळेची सुसज्ज इमारत व विविध सोयी-सुविधांनी परिपूर्ण केल्याने शाळेला तीन वर्षांपूर्वी आयएसओ मानांकन व रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार मिळवण्यात यश आले. १९६१ मध्ये शाळेचे बांधकाम चिखल - मातीमध्ये करण्यात आले असल्याने ५५ वर्षे जुन्या इमारतीला भार सोसवत नसल्याने कमकुवत झाली होती. इमारतीची डागडुजी करणे ग्रामस्थांच्या आवाक्याबाहेर असल्याने गेली पाच वर्षे ग्रामस्थ शाळेला नवीन इमारत मिळावी यासाठी रायगड जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करीत आहेत. सन २०१३ व २०१४ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता श्रीवर्धन यांनी इमारत धोकादायक असल्याचे रायगड जिल्हा परिषदेला कळवले. मात्र जिल्हा परिषदेच्या उदासीन भूमिकेमुळे अखेर २८ जून २०१६ रोजी शाळेची इमारत कोसळली. इमारत कोसळल्याने जिल्हा परिषद आतातरी गांभीर्याने लक्ष देईल अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती. मात्र पदरी निराशा पडल्याने व पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने कोसळलेल्या इमारतीमधील भिंतीला तडे गेलेल्या एका वर्गखोलीत सहावी व सातवीचे वर्गातील विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. जीव मुठीत घेऊनच शिक्षक शिकवत आहे. (वार्ताहर)तड्यांमुळे पिलर व भिंतीतील अंतरात वाढतड्यांमुळे पिलर व भिंत यामधील अंतर वाढत असून दयनीय अवस्था आहे. आपला पाल्य धोकादायक इमारतीच्या शाळेत शिकत असल्याने पालक दिवसातून अनेक वेळा फेरी मारून चौकशी करीत आहेत. शाळेत दर्जेदार शिक्षण मिळते, शाळेचे शिक्षकही चांगले आहेत.मात्र रायगड जिल्हा परिषदेच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य संकटात सापडले आहे असा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. गेली पाच वर्षे ग्रामस्थ शाळेला नवीन इमारत मिळावी यासाठी रायगड जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र याची दखल घेतली जात नाही.