शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

तोंडसुरे शाळा भरते कोसळलेल्या इमारतीत

By admin | Updated: August 13, 2016 04:03 IST

तालुक्यातील आयएसओ मानांकित व रायगड जिल्हा परिषदेने आदर्श पुरस्कार देऊन गौरव केलेली प्राथमिक तोंडसुरे शाळेची इमारत २८ जून २०१६ रोजी मुसळधार पावसात कोसळली.

म्हसळा : तालुक्यातील आयएसओ मानांकित व रायगड जिल्हा परिषदेने आदर्श पुरस्कार देऊन गौरव केलेली प्राथमिक तोंडसुरे शाळेची इमारत २८ जून २०१६ रोजी मुसळधार पावसात कोसळली. त्यावेळी तीनपैकी दोन वर्गखोल्यांचे नुकसान झाले असून एका वर्गखोलीच्या भिंतीला तडे गेले आहेत. पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने कोसळलेल्या इमारतीमध्येच शाळा भरवली जात आहे. इमारत कोसळून एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असतानाही रायगड जिल्हा परिषदेने नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध केला नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.म्हसळा तालुक्यातील प्राथमिक शाळेची इमारत १९६१ मध्ये बांधण्यात आली. सद्यस्थितीत शाळेमध्ये पहिली ते सातवीचे वर्ग भरत असून ५१ विद्यार्थी शिकत आहेत. शालेय व्यवस्थापन समिती, तीन गाव समिती व शिक्षकवृंद यांनी अथक परिश्रम घेऊन शैक्षणिक दर्जासोबतच शाळेची सुसज्ज इमारत व विविध सोयी-सुविधांनी परिपूर्ण केल्याने शाळेला तीन वर्षांपूर्वी आयएसओ मानांकन व रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार मिळवण्यात यश आले. १९६१ मध्ये शाळेचे बांधकाम चिखल - मातीमध्ये करण्यात आले असल्याने ५५ वर्षे जुन्या इमारतीला भार सोसवत नसल्याने कमकुवत झाली होती. इमारतीची डागडुजी करणे ग्रामस्थांच्या आवाक्याबाहेर असल्याने गेली पाच वर्षे ग्रामस्थ शाळेला नवीन इमारत मिळावी यासाठी रायगड जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करीत आहेत. सन २०१३ व २०१४ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता श्रीवर्धन यांनी इमारत धोकादायक असल्याचे रायगड जिल्हा परिषदेला कळवले. मात्र जिल्हा परिषदेच्या उदासीन भूमिकेमुळे अखेर २८ जून २०१६ रोजी शाळेची इमारत कोसळली. इमारत कोसळल्याने जिल्हा परिषद आतातरी गांभीर्याने लक्ष देईल अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती. मात्र पदरी निराशा पडल्याने व पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने कोसळलेल्या इमारतीमधील भिंतीला तडे गेलेल्या एका वर्गखोलीत सहावी व सातवीचे वर्गातील विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. जीव मुठीत घेऊनच शिक्षक शिकवत आहे. (वार्ताहर)तड्यांमुळे पिलर व भिंतीतील अंतरात वाढतड्यांमुळे पिलर व भिंत यामधील अंतर वाढत असून दयनीय अवस्था आहे. आपला पाल्य धोकादायक इमारतीच्या शाळेत शिकत असल्याने पालक दिवसातून अनेक वेळा फेरी मारून चौकशी करीत आहेत. शाळेत दर्जेदार शिक्षण मिळते, शाळेचे शिक्षकही चांगले आहेत.मात्र रायगड जिल्हा परिषदेच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य संकटात सापडले आहे असा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. गेली पाच वर्षे ग्रामस्थ शाळेला नवीन इमारत मिळावी यासाठी रायगड जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र याची दखल घेतली जात नाही.