शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
5
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
6
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
7
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
8
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
9
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
10
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
11
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
12
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
13
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
14
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
15
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार
16
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
17
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
18
जन्मभर विसरणार नाही असा धडा भारतास शिकवू; सिंधू जल करार स्थगितीमुळे पाकच्या धमक्या वाढल्या
19
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
20
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा

तोंडसुरे शाळा भरते कोसळलेल्या इमारतीत

By admin | Updated: August 13, 2016 04:03 IST

तालुक्यातील आयएसओ मानांकित व रायगड जिल्हा परिषदेने आदर्श पुरस्कार देऊन गौरव केलेली प्राथमिक तोंडसुरे शाळेची इमारत २८ जून २०१६ रोजी मुसळधार पावसात कोसळली.

म्हसळा : तालुक्यातील आयएसओ मानांकित व रायगड जिल्हा परिषदेने आदर्श पुरस्कार देऊन गौरव केलेली प्राथमिक तोंडसुरे शाळेची इमारत २८ जून २०१६ रोजी मुसळधार पावसात कोसळली. त्यावेळी तीनपैकी दोन वर्गखोल्यांचे नुकसान झाले असून एका वर्गखोलीच्या भिंतीला तडे गेले आहेत. पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने कोसळलेल्या इमारतीमध्येच शाळा भरवली जात आहे. इमारत कोसळून एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असतानाही रायगड जिल्हा परिषदेने नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध केला नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.म्हसळा तालुक्यातील प्राथमिक शाळेची इमारत १९६१ मध्ये बांधण्यात आली. सद्यस्थितीत शाळेमध्ये पहिली ते सातवीचे वर्ग भरत असून ५१ विद्यार्थी शिकत आहेत. शालेय व्यवस्थापन समिती, तीन गाव समिती व शिक्षकवृंद यांनी अथक परिश्रम घेऊन शैक्षणिक दर्जासोबतच शाळेची सुसज्ज इमारत व विविध सोयी-सुविधांनी परिपूर्ण केल्याने शाळेला तीन वर्षांपूर्वी आयएसओ मानांकन व रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार मिळवण्यात यश आले. १९६१ मध्ये शाळेचे बांधकाम चिखल - मातीमध्ये करण्यात आले असल्याने ५५ वर्षे जुन्या इमारतीला भार सोसवत नसल्याने कमकुवत झाली होती. इमारतीची डागडुजी करणे ग्रामस्थांच्या आवाक्याबाहेर असल्याने गेली पाच वर्षे ग्रामस्थ शाळेला नवीन इमारत मिळावी यासाठी रायगड जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करीत आहेत. सन २०१३ व २०१४ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता श्रीवर्धन यांनी इमारत धोकादायक असल्याचे रायगड जिल्हा परिषदेला कळवले. मात्र जिल्हा परिषदेच्या उदासीन भूमिकेमुळे अखेर २८ जून २०१६ रोजी शाळेची इमारत कोसळली. इमारत कोसळल्याने जिल्हा परिषद आतातरी गांभीर्याने लक्ष देईल अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती. मात्र पदरी निराशा पडल्याने व पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने कोसळलेल्या इमारतीमधील भिंतीला तडे गेलेल्या एका वर्गखोलीत सहावी व सातवीचे वर्गातील विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. जीव मुठीत घेऊनच शिक्षक शिकवत आहे. (वार्ताहर)तड्यांमुळे पिलर व भिंतीतील अंतरात वाढतड्यांमुळे पिलर व भिंत यामधील अंतर वाढत असून दयनीय अवस्था आहे. आपला पाल्य धोकादायक इमारतीच्या शाळेत शिकत असल्याने पालक दिवसातून अनेक वेळा फेरी मारून चौकशी करीत आहेत. शाळेत दर्जेदार शिक्षण मिळते, शाळेचे शिक्षकही चांगले आहेत.मात्र रायगड जिल्हा परिषदेच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य संकटात सापडले आहे असा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. गेली पाच वर्षे ग्रामस्थ शाळेला नवीन इमारत मिळावी यासाठी रायगड जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र याची दखल घेतली जात नाही.