शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

दमदार पावसामुळे भात लावणीच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 11:52 PM

नदी, नाले, ओढे दुथडी भरून : शेतात पाणी साचल्याने उत्पन्नात वाढ होण्याची बळीराजाला अपेक्षा

रोहा : काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रोहा तालुक्यात पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे भात लावणीची खोळंबलेली कामे पुन्हा सुरू झाली आहेत. दमदार पाऊस बरसू लागल्याने भात लावणीच्या कामाने चांगलाच वेग घेतला आहे. पावसामुळे नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहू लागले असून शेतात लावणीसाठी आवश्यक मुबलक पाणी साठू लागले आहे. त्यामुळे यंदा उत्पन्न येण्याची अपेक्षा बळीराजाला आहे.

पावसाळी हंगामात भात लावणीसाठी मुबलक पाणी मिळाले तर भाताचे पीक चांगले येते. यंदा पावसाचे प्रमाण व एकंदरच परिस्थिती अनुकूल असल्याने चांगले पीक येण्याची शक्यता शेतकरीवर्गातून होत आहे. यंदा मे महिन्यात लग्नाचे मुहूर्त कमी होते, त्यामुळे शेतीच्या मशागतीची व पावसाळी भात लागवड करायची राबांची तयारी यासाठी शेतकरीवर्गाला पुरेसा अवधी मिळाला, तर रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावरच पेरणीची कामे पूर्ण करण्यात आली. जूनच्या पहिल्याच आठवड्यात मोसमी पावसाने सुरुवात केल्याने पेरलेले राब वर आल्याने आता भाताची रोपे लागवडी योग्य झाली आहेत, त्यामुळे सध्या तालुक्यात ठिकठिकाणी बळीराजा भात लागवडीच्या कामाला लागल्याचे चित्र आहे. भातशेती लागवड करीत असताना इतर घटकांचे भाव गगनाला भिडले असल्याने भातशेती पिकविणे परवडत नाही. अशा स्थितीत शेतकरीवर्ग इतर मजूर न घेता घरच्या घरी कामे करून जास्तीत जास्त आर्थिक बचत कशी होईल, हीच विचारसरणी अमलात आणून कामे करताना दिसत आहेत.

यंदा पाऊस चांगला झाला असल्याने भातशेती लागवडीसाठी एकंदरच परिस्थिती पूरक आहे. लावणीसाठी शेतात पाणीही आहे. त्यामुळे रोहा विभागातील शेतकरी लावणीत मग्न आहेत. यंदा चांगले पीक पदरात पडेल आणि त्यातून चांगले उत्पन्नही मिळेल, अशी आशा आहे.- नंदकुमार मरवडे, शेतकरी, चिल्हे रोहा

टॅग्स :Raigadरायगड