शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पावसामुळे आंबा हंगाम महिनाभर लांबणीवर, अद्याप मोहोरही नाही, शेतकरी चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 01:26 IST

राज्यातील शेतकरी ओल्या दुष्काळामुळे त्रस्त झाले आहेत. लांबलेल्या पावसाचा फटका कांदा व इतर पिकांप्रमाणे कोकणातील हापूस आंब्यालाही बसला आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : राज्यातील शेतकरी ओल्या दुष्काळामुळे त्रस्त झाले आहेत. लांबलेल्या पावसाचा फटका कांदा व इतर पिकांप्रमाणे कोकणातील हापूस आंब्यालाही बसला आहे. नोव्हेंबर संपला तरी अद्याप मोहोर न आल्याने शेतकरी चिंतेत आहेत. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मोहर येण्यास सुरुवात होईल व एप्रिलमध्येच मार्केटमध्ये मुबलक आंबा उपलब्ध होईल, असा अंदाज शेतकऱ्यांसह व्यापा-यांनी व्यक्त केला आहे.देशातील सर्वाधिक आंबा उत्पादन भारतामध्ये होते व देशातील सर्वाधिक महाराष्ट्रात.कोकणातील हापूसला देशाच्या विविध भागासह विदेशातही चांगली मागणी आहे. फक्त मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रत्येक वर्षी ७०० ते ८०० कोटी रुपयांची उलाढाल या व्यवसायामध्ये होत आहे. मुंबईत कोकणसह कर्नाटक व इतर ठिकाणावरूनही आंबा विक्रीसाठी येत असतो. मागील काही वर्षांत आंब्याची निर्यातही चांगली होऊ लागली आहे. गतवर्षी ४६,५१० टन आंब्याची निर्यात होऊन तब्बल ४०६ कोटी रुपयांची उलाढाल झाली.एक लाख पाच हजार टन आमरसाची निर्यात झाली असून, त्यामधून ६५७ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. गतवर्षी आंबा हंगाम उत्तम झाला होता; परंतु या वर्षी मात्र पावसामुळे पीक किती येणार या विषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. प्रत्येक वर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीला कोकणात आंब्याला मोहोर येण्यास सुरुवात होते. या वर्षी नोव्हेंबर संपत आला तरी मोहर आलेला नाही. डिसेंबरच्या दुस-या आठवड्यामध्ये मोहोर येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पावसाळा लांबल्यामुळे ही स्थिती निर्माण झालेली आहे.रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगडमध्येही आंब्याला मोहोर आलेला नाही. यापूर्वी हवामानाचा फटका एक वेळी एखाद्या जिल्ह्यास बसायचा; परंतु या वर्षी आंबा उत्पादन होणाºया संपूर्ण पट्ट्यात कुठेच मोहोर आलेला नाही. जानेवारी अखेरपासून मुंबईत आंब्याची थोडी आवक सुरू होते. मार्चमध्ये सर्वसामान्य नागरिकांना परवडेल, अशा दरामध्ये आंबा उपलब्ध होतो; पण या वर्षी मार्चअखेरीस आंबा येण्यास सुरुवात होईल व सर्वसामान्यांना एप्रिलपर्यंत वाट पाहवी लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मोहोर किती येणार यावर हंगाम कसा होईल ते सांगता येईल, अशी माहितीही व्यापाºयांनी दिली आहे.पावसाचा कालावधी लांबल्याचा फटका आंबा हंगामावरही होणार आहे. अद्याप कोकणात आंब्याला मोहोरही आलेला नाही. यामुळे एक महिना हंगाम उशिरा सुरू होणार आहे.- संजय पानसरे,व्यापारी प्रतिनिधी,एपीएमसीरत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये कुठेच अद्याप आंब्याला मोहोर आलेला नाही. डिसेंबरच्या दुसºया आठवड्यामध्ये मोहोर येईल, असा अंदाज आहे. या वर्षी मार्च अखेरीस आंबा प्रत्यक्ष मार्केटमध्ये येण्यास सुरुवात होईल. मोहोर कसा येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.- सचिन लांजेकर,शेतकरी, रत्नागिरीमालवीचा हापूस मार्केटमध्येमुंबईमध्ये १२ नोव्हेंबरला मालवी हापूसची पहिली पेटी विक्रीसाठी आली होती. २०११ मध्ये कोकणातील हापूसचे बियाणे मालवीमध्ये नेण्यात आले व तेथे उत्पादन सुरू करण्यात आले आहे.नोव्हेंबरमध्येच आला होता आंबागतवर्षी आंबा हंगाम चांगला झाला होता. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५ नोव्हेंबरलाच हापूसची पहिली पेटी विक्रीसाठी आली होती. १९ जानेवारीपासून नियमित आवक सुरू झाली होती. या वर्षी मात्र नियमित आवक मार्चमध्येच सुरू होईल, असा अंदाज आहे.

टॅग्स :MangoआंबाkonkanकोकणMaharashtraमहाराष्ट्र