शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांमुळे महामार्ग ठरला उरणवासीयांसाठी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 03:24 IST

तीन लाख नागरिक वेठीस : खड्ड्यांमुळे प्रचंड वाहतूककोंडी; अपघातांचे प्रमाणही वाढले

नामदेव मोरे

नवी मुंबई : जेएनपीटी राष्ट्रीय महामार्ग उरणवासीयांसाठी डोकेदुखी बनला आहे. खड्डे, अवैध पार्किंग, अपघात व रोजच्या वाहतूककोंडीमुळे तीन लाख नागरिकांना वेठीस धरले जात आहे. महामार्गाचे काँक्रीटीकरण व दुरुस्तीची कामे धीम्या गतीने सुरू असून नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक झाल्यानंतरच शासकीय यंत्रणा जागी होणार का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

देशातील प्रमुख बंदरामध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचा समावेश होतो. १९८९ मध्ये सुरू झालेल्या जेएनपीटी बंदरामधून वर्षाला ५० लाख कंटेनर हाताळणीचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. बंदर व परिसरातून वर्षाला १ हजार कोटीपेक्षा जास्त उलाढाल होत आहे. रोज २० हजार अवजड वाहनांची या परिसरात ये - जा असल्यामुळे शासनाने ३४८ हा २८ किलोमीटरचा व ३४८ ए हा १७ किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आला आहे. उरण फाटा ते जेएनपीटी व पनवेल ते जेएनपीटी या दोन्ही मार्गाच्या रुंदीकरणाचे व काँक्रीटीकरणाचे कामही सुरू झाले आहे, परंतु धीम्या गतीने सुरू असलेले काम व शासकीय यंत्रणांच्या नियोजनशून्य कारभारामुळे या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पामबीच रोडवर किल्ले गावठाण परिसरामध्ये रोज वाहतूककोंडी होत आहे. विमानतळाची पाटी लावलेल्या ठिकाणीही स्थिती बिकट झाली आहे. या मार्गावरील जासई हे महत्त्वाचे ठिकाण असून जासई नाक्यावर रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे मोटारसायकल व इतर वाहनांचे मोठ्या प्रमाणात अपघात होऊ लागले आहेत. वाहने खड्ड्यांमध्ये आदळून त्यांचे नुकसान होत आहे. ओवळा येथेही खड्ड्यांचे प्रमाण जास्त असून वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ लागला आहे.

महामार्गावर सर्वात गंभीर स्थिती करळ फाटा येथे झाली आहे. येथील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूच्या मार्गिकेवर प्रचंड खड्डे पडले आहेत. वाहतूककोंडीमुळे पुलावरील दोन मिनिटाचे अंतर पूर्ण करायला पंधरा ते वीस मिनिटे वेळ लागत आहे. उरण शहरात जाण्याच्या मार्गावरही प्रचंड खड्डे पडले आहेत. महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. काही ठिकाणी कामे पूर्ण झाली असली तरी रोडच्या मध्येच बांधकाम व इतर साहित्य ठेवल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. रोडच्या दोन्ही बाजूला ट्रेलर उभे केले जात आहेत. काही ठिकाणी दोन लेनमध्ये ट्रेलर उभे केल्यामुळे वाहतूक ठप्प होत आहे. नवी मुंबई व पनवेलवरून उरणला जाण्यासाठी सकाळी व सायंकाळी एक ते दीड तासाचा अवधी लागत आहे. तीन लाखपेक्षा जास्त उरणकर वर्षानुवर्षे होणाऱ्या कोंडीमुळे त्रस्त असून अजून किती वर्षे त्रास सहन करायचा, असा प्रश्न उपस्थित करत आहेत. अशीच स्थिती राहिली नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक होईल, असा इशाराही प्रवासी देत आहेत. (अधिक छायाचित्र/४)उपचाराची सोय नाही२०१७ मध्ये जेएनपीटी महामार्गावर अपघातामध्ये ३३ नागरिकांचा मृत्यू झाला. ३९ गंभीर अपघात झाल्याची नोंद आहे. किरकोळ अपघातांची संख्या असंख्य आहे. या रोडवर अपघात झाल्यास जखमींना उपचारासाठी जवळ रुग्णालयच नाही. नवी मुंबई महानगरपालिका किंवा मुंबईमध्ये उपचारासाठी घेऊन जावे लागत आहे.सर्व्हिस रोड नाहीचजेएनपीटी महामार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. अपघात झाल्यानंतर किंवा इतर कारणांनी वाहतूककोंडी झाली की सर्वांनाच एक ते दोन तास रोडमध्ये अडकून राहावे लागत आहे. राष्ट्रीय महामार्गाला समांतर सर्व्हिस रोडच बनविण्यात आलेला नाही.अवजड वाहनांना बंदीअवजड वाहनांमुळे या मार्गावरील वाहतूककोंडी वाढत आहे. यामुळे सायंकाळी ५ ते रात्री १0 दरम्यान अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. यामुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळत असला तरी जोपर्यंत अवैध पार्किंग, खड्डे, रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत चक्काजामची स्थिती कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.महामार्गाचे वाहनतळात रूपांतरराष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूला ट्रेलर उभे केले जात आहेत. गतवर्षी पोलिसांनी ४,८४८ एवढ्या वाहनांवर कारवाई केली होती, परंतु रोडवर उभ्या राहणाºया वाहनांचे प्रमाण पाहिले तर एवढी कारवाई एक महिन्यामध्ये झाली पाहिजे. अवजड वाहनांमुळे महामार्गावरील समस्या गंभीर होत चालली आहे.जेएनपीटी महामार्गाच्या दुरवस्थेविषयी आम्ही जनहित याचिका दाखल केली आहे. महामार्गावरील खड्डे, अवैध पार्किंग, अपघात व इतर समस्या न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.- सुधाकर पाटील,अध्यक्ष, उरण सामाजिक संस्था

टॅग्स :highwayमहामार्गPuneपुणे