शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

खड्ड्यांमुळे महामार्ग ठरला उरणवासीयांसाठी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 03:24 IST

तीन लाख नागरिक वेठीस : खड्ड्यांमुळे प्रचंड वाहतूककोंडी; अपघातांचे प्रमाणही वाढले

नामदेव मोरे

नवी मुंबई : जेएनपीटी राष्ट्रीय महामार्ग उरणवासीयांसाठी डोकेदुखी बनला आहे. खड्डे, अवैध पार्किंग, अपघात व रोजच्या वाहतूककोंडीमुळे तीन लाख नागरिकांना वेठीस धरले जात आहे. महामार्गाचे काँक्रीटीकरण व दुरुस्तीची कामे धीम्या गतीने सुरू असून नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक झाल्यानंतरच शासकीय यंत्रणा जागी होणार का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

देशातील प्रमुख बंदरामध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचा समावेश होतो. १९८९ मध्ये सुरू झालेल्या जेएनपीटी बंदरामधून वर्षाला ५० लाख कंटेनर हाताळणीचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. बंदर व परिसरातून वर्षाला १ हजार कोटीपेक्षा जास्त उलाढाल होत आहे. रोज २० हजार अवजड वाहनांची या परिसरात ये - जा असल्यामुळे शासनाने ३४८ हा २८ किलोमीटरचा व ३४८ ए हा १७ किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आला आहे. उरण फाटा ते जेएनपीटी व पनवेल ते जेएनपीटी या दोन्ही मार्गाच्या रुंदीकरणाचे व काँक्रीटीकरणाचे कामही सुरू झाले आहे, परंतु धीम्या गतीने सुरू असलेले काम व शासकीय यंत्रणांच्या नियोजनशून्य कारभारामुळे या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पामबीच रोडवर किल्ले गावठाण परिसरामध्ये रोज वाहतूककोंडी होत आहे. विमानतळाची पाटी लावलेल्या ठिकाणीही स्थिती बिकट झाली आहे. या मार्गावरील जासई हे महत्त्वाचे ठिकाण असून जासई नाक्यावर रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे मोटारसायकल व इतर वाहनांचे मोठ्या प्रमाणात अपघात होऊ लागले आहेत. वाहने खड्ड्यांमध्ये आदळून त्यांचे नुकसान होत आहे. ओवळा येथेही खड्ड्यांचे प्रमाण जास्त असून वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ लागला आहे.

महामार्गावर सर्वात गंभीर स्थिती करळ फाटा येथे झाली आहे. येथील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूच्या मार्गिकेवर प्रचंड खड्डे पडले आहेत. वाहतूककोंडीमुळे पुलावरील दोन मिनिटाचे अंतर पूर्ण करायला पंधरा ते वीस मिनिटे वेळ लागत आहे. उरण शहरात जाण्याच्या मार्गावरही प्रचंड खड्डे पडले आहेत. महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. काही ठिकाणी कामे पूर्ण झाली असली तरी रोडच्या मध्येच बांधकाम व इतर साहित्य ठेवल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. रोडच्या दोन्ही बाजूला ट्रेलर उभे केले जात आहेत. काही ठिकाणी दोन लेनमध्ये ट्रेलर उभे केल्यामुळे वाहतूक ठप्प होत आहे. नवी मुंबई व पनवेलवरून उरणला जाण्यासाठी सकाळी व सायंकाळी एक ते दीड तासाचा अवधी लागत आहे. तीन लाखपेक्षा जास्त उरणकर वर्षानुवर्षे होणाऱ्या कोंडीमुळे त्रस्त असून अजून किती वर्षे त्रास सहन करायचा, असा प्रश्न उपस्थित करत आहेत. अशीच स्थिती राहिली नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक होईल, असा इशाराही प्रवासी देत आहेत. (अधिक छायाचित्र/४)उपचाराची सोय नाही२०१७ मध्ये जेएनपीटी महामार्गावर अपघातामध्ये ३३ नागरिकांचा मृत्यू झाला. ३९ गंभीर अपघात झाल्याची नोंद आहे. किरकोळ अपघातांची संख्या असंख्य आहे. या रोडवर अपघात झाल्यास जखमींना उपचारासाठी जवळ रुग्णालयच नाही. नवी मुंबई महानगरपालिका किंवा मुंबईमध्ये उपचारासाठी घेऊन जावे लागत आहे.सर्व्हिस रोड नाहीचजेएनपीटी महामार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. अपघात झाल्यानंतर किंवा इतर कारणांनी वाहतूककोंडी झाली की सर्वांनाच एक ते दोन तास रोडमध्ये अडकून राहावे लागत आहे. राष्ट्रीय महामार्गाला समांतर सर्व्हिस रोडच बनविण्यात आलेला नाही.अवजड वाहनांना बंदीअवजड वाहनांमुळे या मार्गावरील वाहतूककोंडी वाढत आहे. यामुळे सायंकाळी ५ ते रात्री १0 दरम्यान अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. यामुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळत असला तरी जोपर्यंत अवैध पार्किंग, खड्डे, रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत चक्काजामची स्थिती कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.महामार्गाचे वाहनतळात रूपांतरराष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूला ट्रेलर उभे केले जात आहेत. गतवर्षी पोलिसांनी ४,८४८ एवढ्या वाहनांवर कारवाई केली होती, परंतु रोडवर उभ्या राहणाºया वाहनांचे प्रमाण पाहिले तर एवढी कारवाई एक महिन्यामध्ये झाली पाहिजे. अवजड वाहनांमुळे महामार्गावरील समस्या गंभीर होत चालली आहे.जेएनपीटी महामार्गाच्या दुरवस्थेविषयी आम्ही जनहित याचिका दाखल केली आहे. महामार्गावरील खड्डे, अवैध पार्किंग, अपघात व इतर समस्या न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.- सुधाकर पाटील,अध्यक्ष, उरण सामाजिक संस्था

टॅग्स :highwayमहामार्गPuneपुणे