शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

कोलते-मोकाशी गावात धरण असूनही पाणीटंचाई; मात्र वॉटर पार्कला हजारो लीटर पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 23:48 IST

सरपंचाने दिले तहसीलदारांना निवेदन; गावातून जाणाऱ्या जलवाहिन्या तोडण्याचा इशारा

मोहोपाडा : कलोते मोकाशी या गावातच लघु पाटबंधारे विभागाचे धरण आहे. धरणात मुबलक पाणी असले तरी ते परिसरातील वॉटर पार्कला दिले जात असल्याने गावाबरोबर ग्रामपंचायत हद्दीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

कमी पाऊस पडल्याने पाणीटंचाई सुरू झाली, असे सर्वत्र चित्र निर्माण झाले आहे, काही ठिकाणी योग्य प्रकारे नियोजन नसल्याने तीव्र पाणीटंचाई सुरू आहे. येथील वॉटर पार्कला पाणीपुरवठा करू नये, असा ठराव ग्रामपंचायत कलोतेपासून पंचायत समितीमध्येही करण्यात आला आहे. पाणीपुरवठा करणाºया जलवाहिन्या ज्या गावातून जातात, त्या ग्रामपंचायतींनीपाणीपुरवठा खंडित करावा, असा ठराव केला होता. मात्र, वरिष्ठ पातळीवर झालेल्या निर्णयामुळे गावांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. कलोते धरणाच्या पाझर पाण्यावर ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील पाणीपुरवठा योजना आहेत. मात्र, वॉटर पार्कला धरणातून पाणी उचलण्याची परवानगी आहे. आता पाणी न सोडल्याने नदी व नाले कोरडे पडू लागल्या आहेत. नदीला पाणी सोडल्यास वॉटर पार्कला वितरित होणाºया पाण्यावर परिणाम होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप जाधव यांनी सांगितले. कलोते रयती या गावात पाणीच जात नसल्याने तिथे ग्रुप ग्रामपंचायत कलोते मार्फत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे ग्रामविकास अधिकारी गिरासे यांनी सांगितले. या धरणाच्या पाण्यावर पाच योजना अवलंबून आहेत. या बाबत शुक्रवारी ग्रामपंचायतच्या सरपंच रेश्मा ठोंबरे यांनी उपसरपंच गणेश पवार, सर्व सदस्य यांच्यासह तहसीलदार इरेश चप्पलवार यांची भेट घेऊन वॉटर पार्कचा पाणीपुरवठा खंडित करण्याचे पत्र दिले. ग्रामस्थांनी पाणीपुरवठा खंडित केल्यास त्याला जबाबदार ग्रामपंचायत नसणार, असे या वेळी नमूद करण्यात आले. ग्रुप ग्रामपंचायत कलोते यांनी पाणी सोडण्याबाबत विनंती पत्र दिल्यास पाणी सोडण्याबाबत कार्यवाही करू, अशी माहिती या वेळी सहायक अभियंता चव्हाण यांनी दिली.

वनवे ग्रामस्थांच्या श्रमदानातून विहिरीची स्वच्छताराज्यातील पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. विहिरी आणि तलावांनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन्मैलांची पायपीट करावी लागत आहे. खालापूर तालुक्यातील वनवे गावातही पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. विहिरीने तळ गाठल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

गावातील नागरिकांनी ‘जल है तो कल है’ या जनजागृती करणाºया संदेशातून बोध घेत मुख्य विहिरीची साफसफाईसाठी केली. सरकारी निधीची वाट न पहाता गावातील महिला आणि पुरुषांनी एकत्र येत श्रमदानातून गावातील पाण्याचा मुख्यस्रोत असणाºया विहिरीतून गाळ, कचरा काढून स्वच्छता केली.गावातील पुरुषांनी विहिरीत उतरून संपूर्ण गाळ काढला, तर महिलांनी विहीर परिसरातील झाडीझुडपे साफ केली.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईDamधरणwater parkवॉटर पार्क