शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

कोलते-मोकाशी गावात धरण असूनही पाणीटंचाई; मात्र वॉटर पार्कला हजारो लीटर पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 23:48 IST

सरपंचाने दिले तहसीलदारांना निवेदन; गावातून जाणाऱ्या जलवाहिन्या तोडण्याचा इशारा

मोहोपाडा : कलोते मोकाशी या गावातच लघु पाटबंधारे विभागाचे धरण आहे. धरणात मुबलक पाणी असले तरी ते परिसरातील वॉटर पार्कला दिले जात असल्याने गावाबरोबर ग्रामपंचायत हद्दीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

कमी पाऊस पडल्याने पाणीटंचाई सुरू झाली, असे सर्वत्र चित्र निर्माण झाले आहे, काही ठिकाणी योग्य प्रकारे नियोजन नसल्याने तीव्र पाणीटंचाई सुरू आहे. येथील वॉटर पार्कला पाणीपुरवठा करू नये, असा ठराव ग्रामपंचायत कलोतेपासून पंचायत समितीमध्येही करण्यात आला आहे. पाणीपुरवठा करणाºया जलवाहिन्या ज्या गावातून जातात, त्या ग्रामपंचायतींनीपाणीपुरवठा खंडित करावा, असा ठराव केला होता. मात्र, वरिष्ठ पातळीवर झालेल्या निर्णयामुळे गावांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. कलोते धरणाच्या पाझर पाण्यावर ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील पाणीपुरवठा योजना आहेत. मात्र, वॉटर पार्कला धरणातून पाणी उचलण्याची परवानगी आहे. आता पाणी न सोडल्याने नदी व नाले कोरडे पडू लागल्या आहेत. नदीला पाणी सोडल्यास वॉटर पार्कला वितरित होणाºया पाण्यावर परिणाम होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप जाधव यांनी सांगितले. कलोते रयती या गावात पाणीच जात नसल्याने तिथे ग्रुप ग्रामपंचायत कलोते मार्फत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे ग्रामविकास अधिकारी गिरासे यांनी सांगितले. या धरणाच्या पाण्यावर पाच योजना अवलंबून आहेत. या बाबत शुक्रवारी ग्रामपंचायतच्या सरपंच रेश्मा ठोंबरे यांनी उपसरपंच गणेश पवार, सर्व सदस्य यांच्यासह तहसीलदार इरेश चप्पलवार यांची भेट घेऊन वॉटर पार्कचा पाणीपुरवठा खंडित करण्याचे पत्र दिले. ग्रामस्थांनी पाणीपुरवठा खंडित केल्यास त्याला जबाबदार ग्रामपंचायत नसणार, असे या वेळी नमूद करण्यात आले. ग्रुप ग्रामपंचायत कलोते यांनी पाणी सोडण्याबाबत विनंती पत्र दिल्यास पाणी सोडण्याबाबत कार्यवाही करू, अशी माहिती या वेळी सहायक अभियंता चव्हाण यांनी दिली.

वनवे ग्रामस्थांच्या श्रमदानातून विहिरीची स्वच्छताराज्यातील पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. विहिरी आणि तलावांनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन्मैलांची पायपीट करावी लागत आहे. खालापूर तालुक्यातील वनवे गावातही पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. विहिरीने तळ गाठल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

गावातील नागरिकांनी ‘जल है तो कल है’ या जनजागृती करणाºया संदेशातून बोध घेत मुख्य विहिरीची साफसफाईसाठी केली. सरकारी निधीची वाट न पहाता गावातील महिला आणि पुरुषांनी एकत्र येत श्रमदानातून गावातील पाण्याचा मुख्यस्रोत असणाºया विहिरीतून गाळ, कचरा काढून स्वच्छता केली.गावातील पुरुषांनी विहिरीत उतरून संपूर्ण गाळ काढला, तर महिलांनी विहीर परिसरातील झाडीझुडपे साफ केली.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईDamधरणwater parkवॉटर पार्क