शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

व्यंगमुक्तीमुळे १५९ जणांचे आयुष्य बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 11:47 PM

विद्रूपता आणणाऱ्या जखमा, हाता-पायांतील वाकडेपणा आदी शारीरिक समस्यांवर ‘प्लास्टिक सर्जरी’करून आयुष्य पुन्हा एकदा नव्याने फुलविता येऊ शकते;

- जयंत धुळपअलिबाग : दुभंगलेले ओठ आणि टाळू, भाजल्याने शरीराच्या दर्शनी भागांवर आणि विशेषत: चेहऱ्यांवर निर्माण झालेले व्रण आणि विद्रूपता आणणाऱ्या जखमा, हाता-पायांतील वाकडेपणा आदी शारीरिक समस्यांवर ‘प्लास्टिक सर्जरी’करून आयुष्य पुन्हा एकदा नव्याने फुलविता येऊ शकते; परंतु ही शस्त्रक्रिया मोठी खर्चिक आणि मुंबई-पुण्या सारख्या शहरातील रुग्णालयातच उपलब्ध असल्याने अल्प उत्पन्नगटातील गरीब माणूस या शस्त्रक्रिया करवून घेण्याचा विचारही करू शकत नाही.ग्रामीण भागातील लोकांमधील व्यंगांची समस्या, मूळ अलिबाग तालुक्यातील सारळ येथील रहिवासी आणि जागतिक कीर्तीचे प्लास्टिक सर्जरीतज्ज्ञ डॉ. नितीन मोकल यांनी जाणली आणि अलिबाग परिसरातच अशा व्यक्तींवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय मोकल यांनी घेतला.डॉ. नितीन मोकल हे मुंबईतील नामांकित बॉम्बे, वाडिया, सुश्रुषा, जी.टी. रुग्णालयासह परदेशातील विविध रुग्णालयांत शस्त्रक्रिया करतात. अलिबागच्या ग्रामीण भागात या शस्त्रक्रिया कुठे कराव्या, हा प्रश्न असतानाच अलिबाग जवळच्या कार्लेखिंड येथील प्रयास रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रवींद्र म्हात्रे यांनी आपले आॅपरेशन थिएटर व संपूर्ण रुग्णालय कर्मचाऱ्यांसह मोफत उपलब्ध करून देण्याचे सामाजिक उत्तरदायित्व निभावले. केवळ प्लास्टिक सर्जरीतज्ज्ञ डॉ. नितीन मोकल यांनी येऊन शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते कारण या शस्त्रक्रिया करण्याकरिता अन्य शाखांचे डॉक्टर्स गरजेचे असतात, त्याकरिता अलिबागमधील ज्येष्ठ सर्जन डॉ. एस. एन. तिवारी, भूलतज्ज्ञ डॉ. संचिव शेटकार, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत वाजे, बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र चांदोरकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. विनायक पाटील, डॉ. रवींद्र म्हात्रे, भूलतज्ज्ञ डॉ. सुजाता मोकल, डॉ. शैलेश पालकर यांनी आपली वैद्यकीय साधनसामुग्री व औषधांसह या शस्त्रक्रिया शिबिरात विनामानधन सहभागी होण्याची तयारी दाखवली. त्यामुळे जवळपास १५९ जणांवर ही यशस्वी मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.पहिले संपूर्ण मोफत व्यंगमुक्ती शिबिर प्रयास रुग्णालयात २००९ मध्ये झाले आणि त्यात ग्रामीण भागातील २३ स्त्री-पुरुषांना व्यंगमुक्ती पूर्णत: मोफत प्राप्त होऊन त्यांचे आयुष्य खºया अर्थाने फुलले. त्यानंतर २०१३ मध्ये ३७, २०१६ मध्ये ५३ आणि गेल्या दोन दिवसात झालेल्या शस्त्रक्रिया शिबिरात ४0 ग्रामीण व्यंगग्रस्तांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आणि त्यांच्या आयुष्यात आनंद फुलल्याची माहिती प्लास्टिक सर्जरीतज्ज्ञ डॉ. नितीन मोकल यांनी दिली आहे.>जन्मत: व्यंगयुक्त अपत्ये जन्मास येऊ नये, याकरिता नवविवाहित दाम्पत्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. विवाहानंतर गर्भधारणा व अपत्यप्राप्ती या पूर्वीच्या काळात उभयतांंनी आरोग्य विषयक दक्षता सुयोग्य प्रकारे घेतली पाहिजे. आपल्या शरीरास गरजेच्या नसलेल्या गोष्टी आहार वा व्यसनांतून आपल्या शरीरात जाणार नाहीत याची दक्षता घेतल्यास नवजात अपत्यांतील व्यंग टाळता येऊ शकते.- डॉ. नितीन मोकल, प्लास्टिक सर्जरीतज्ज्ञ