शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

दिवेआगर किनारा पर्यटकांनी बहरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 2:10 AM

दिवाळी सुट्टीतील अखेरचा रविवार : पर्यटनासाठी श्रीवर्धन, हरिहरेश्वरला पसंती

बोर्ली पंचतन : दिवेआगर समुद्रकिनाऱ्याची भुरळ, फेसाळत्या लाटांमध्ये डुंबण्याचा आनंद व माशांवर ताव मारण्यासाठी पुणे, मुंबई, औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर तसेच देशभरातून पर्यटक दिवेआगर, श्रीवर्धन व हरिहरेश्वर बीचला नेहमीच पसंती देतात. दिवाळीच्या सुट्टीतील शेवटच्या शनिवार-रविवार दिवेआगर समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलून गेला होता.

पावसाळा संपल्यानंतर दिवाळी हा पर्यटनाच्या दृष्टीने नवीन हंगामाची सुरुवात होत असते. श्रीवर्धन तालुक्यातील सुवर्ण गणेशाच्या दिवेआगर, श्रीमंत बाळाजी पेशव्यांचे स्मारक व भारतामध्ये दक्षिण काशी म्हणून सुप्रसिद्ध हरिहरेश्वर तीर्थक्षेत्र आदी पर्यटनस्थळे, तसेच समुद्रकिनारे गेल्या १५ दिवसांपासून ओस पडले होते; परंतु गेल्या दोन दिवसांपासून या ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे समुद्रकिनारे फुलून गेले आहेत.पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी अनेक जण कुटुंबसहलीवर आले आहेत तर काही तरुण-तरुणी आपल्या मित्र-मैत्रिणींसह श्रीवर्धन तालुक्यामध्ये दाखल झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये दिवेआगर समुद्रकिनारा चांगलाच बहरला आहे. मागील १५ दिवसांमध्ये ग्राहक नसल्याने नाराज झालेले हॉटेल व्यावसायिक घरगुती खानावळ यांना दिलासा मिळाला आहे.दिवेआगर समुद्रकिनारा रायगड जिल्ह्यातील सुरक्षित समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. या ठिकाणी प्रकट झालेल्या सुवर्ण गणेशामुळे श्रीवर्धनच नव्हे तर रायगड जिल्हा पर्यटनदृष्ट्या जगाच्या नकाशावर चमकू लागला आहे. नव्याने बांधण्यात आलेले दिवेआगर येथील सुवर्ण गणेशमंदिर, पुरातन मूर्ती असलेले रूपनारायण, सुंदर नारायण, उत्तरेश्वर मंदिर पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी आवर्जून पर्यटक महाराष्ट्रातून येत असतात. सध्या पर्यटनाचा काळ पुन्हा सुरू झाला असून दिवेआगर समुद्रकिनारा पर्यटकांनी बहरून गेला आहे. 

टॅग्स :Raigadरायगडtourismपर्यटन