शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिक हवालदिल; परतीचा पाऊस अन् खराब रस्त्यांचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 22:50 IST

खराब रस्ते आणि निवडणुकीच्या हंगामामुळे संख्या रोडावली

अलिबाग : दिवाळी सणानिमित्त शाळा महाविद्यालयांना सुट्टी पडल्या की, पर्यटक हे हमखास रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे वळतात. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून अधूनमधून बरसणारा परतीचा पाऊस, क्यार चक्रिवादळाचा धसका, विधानसभा निवडणुकीची धामधूम आणि जिल्ह्यातील खराब रस्त्यांमुळे पर्यटकांची संख्या रोडावल्याचे दिसून येते. पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे पर्यटनाचा हंगाम वाया जाणार असल्याने व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालयांच्या सहलींवरच आता त्यांच्या व्यवसायाची मदार राहणार आहे.

रायगड जिल्ह्याची ओळख पर्यटनाचा जिल्हा अशी झाली आहे. जिल्ह्यातील अलिबाग आणि मुरुड तालुक्यांमध्ये सर्वाधिक पर्यटक दाखल होत असतात. त्याचप्रमाणे श्रीवर्धन, माथेरान या ठिकाणीही पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. धार्मिक, ऐतिहासिक, समुद्र पर्यटन असे विविध पर्याय पर्यटकांसाठी येथे उपलब्ध आहेत. रायगड जिल्हा मुंबई, पुण्यापासून जवळ असल्यामुळे तसेच वाहतुकीचे उत्तम पर्याय उपलब्ध असल्याने जिल्ह्यात पर्यटकांचा तसा वर्षभर राबता असतो. पावसाच्या हंगामामध्ये फारसे पर्यटक या ठिकाणी फिरकत नाहीत. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय म्हणावा तसा जोर धरत नाही. त्यामुळे त्यांचे अर्थव्यस्थेचे गणित काही प्रमाणात कोलमडून पडते. पावसाळ्यामध्ये वर्षासहलीचा बेत आखलेला असतो. मात्र, यंदाच्या पावासाळी हंगामात रस्त्यांची पुन्हा एकदा दैना उडाल्याने पर्यटकांनी या ठिकाणी येण्याचे टाळले होते.

तसेच गेल्या आठ दिवसांपासून परतीचा पाऊस, क्यार चक्रिवादळाची टांगती तलवार असल्याने पर्यटक या ठिकाणी येण्यास धजावल्याचे दिसत नाहीत. त्याचप्रमाणे गेल्या महिनाभरापासून राज्य हे विधानसभा निवडणुकीच्या मूडमध्ये होते. तसेच रायगड जिल्ह्यातील रस्त्यांची पुन्हा पुरती दैना उडालेली असल्याने खड्ड्यातील रस्त्यांवरून प्रवास करणे पर्यटकांनी टाळले आहे. त्याचाही विपरित परिणाम पर्यटन हंगामावर काही प्रमाणात झाल्याचा पर्यटन व्यावसायिकांचा सूर आहे. दिवाळीमध्ये शाळा, महाविद्यालयांना किमान १५ दिवस सुट्टी असते. त्यामुळे फिरण्यासाठीचे प्लॅनिंग केले जाते. दिवाळीनिमित्त असलेल्या सलग सरकारी सुट्टींमुळे काही प्रमाणात पर्यटक आता हळूहळू दाखल होत असल्याचे दिसत आहे. अलिबाग, वरसोली, आक्षी, नागाव, किहीम, मांडवा, काशिद, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर तसेच माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची संख्या आता दिसू लागली आहे.गेल्या हंगामाच्या तुलनेमध्ये ती तब्बल ६० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. समुद्रकिनारी मनोरंजनाची साधणे पुरवणाऱ्या व्यावसायिकांनीही याला दुजोरा दिला आहे.

शाळा, महाविद्यालयाच्या सहलीवरच आमची मदार- भगतगेल्या वर्षी पर्यटनाचा चांगला हंगाम गेला होता. मात्र, आता खराब रस्ते, परतीचा पाऊस, क्यार चक्रिवादळाचे सावट आणि नुकत्याच आटोपलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे व्यवसायाला गती मिळाली नाही, असे बोट व्यावसायिक प्रकाश भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शनिवार आणि रविवार अशा सुट्टी असल्याने काही प्रमाणात पर्यटक आले आहेत. मात्र, त्यामुळे हंगामात झालेले नुकसान भरून निघणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. दिवाळीच्या सुट्टी संपल्या की लगेच शाळा, महाविद्यालय यांच्या सहली मोठ्या संख्येने दाखल होतात. त्यावरच आता आमची मदार राहणार असल्याचे भगत यांनी सांगितले.

टॅग्स :tourismपर्यटनRainपाऊस