शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिक हवालदिल; परतीचा पाऊस अन् खराब रस्त्यांचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 22:50 IST

खराब रस्ते आणि निवडणुकीच्या हंगामामुळे संख्या रोडावली

अलिबाग : दिवाळी सणानिमित्त शाळा महाविद्यालयांना सुट्टी पडल्या की, पर्यटक हे हमखास रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे वळतात. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून अधूनमधून बरसणारा परतीचा पाऊस, क्यार चक्रिवादळाचा धसका, विधानसभा निवडणुकीची धामधूम आणि जिल्ह्यातील खराब रस्त्यांमुळे पर्यटकांची संख्या रोडावल्याचे दिसून येते. पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे पर्यटनाचा हंगाम वाया जाणार असल्याने व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालयांच्या सहलींवरच आता त्यांच्या व्यवसायाची मदार राहणार आहे.

रायगड जिल्ह्याची ओळख पर्यटनाचा जिल्हा अशी झाली आहे. जिल्ह्यातील अलिबाग आणि मुरुड तालुक्यांमध्ये सर्वाधिक पर्यटक दाखल होत असतात. त्याचप्रमाणे श्रीवर्धन, माथेरान या ठिकाणीही पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. धार्मिक, ऐतिहासिक, समुद्र पर्यटन असे विविध पर्याय पर्यटकांसाठी येथे उपलब्ध आहेत. रायगड जिल्हा मुंबई, पुण्यापासून जवळ असल्यामुळे तसेच वाहतुकीचे उत्तम पर्याय उपलब्ध असल्याने जिल्ह्यात पर्यटकांचा तसा वर्षभर राबता असतो. पावसाच्या हंगामामध्ये फारसे पर्यटक या ठिकाणी फिरकत नाहीत. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय म्हणावा तसा जोर धरत नाही. त्यामुळे त्यांचे अर्थव्यस्थेचे गणित काही प्रमाणात कोलमडून पडते. पावसाळ्यामध्ये वर्षासहलीचा बेत आखलेला असतो. मात्र, यंदाच्या पावासाळी हंगामात रस्त्यांची पुन्हा एकदा दैना उडाल्याने पर्यटकांनी या ठिकाणी येण्याचे टाळले होते.

तसेच गेल्या आठ दिवसांपासून परतीचा पाऊस, क्यार चक्रिवादळाची टांगती तलवार असल्याने पर्यटक या ठिकाणी येण्यास धजावल्याचे दिसत नाहीत. त्याचप्रमाणे गेल्या महिनाभरापासून राज्य हे विधानसभा निवडणुकीच्या मूडमध्ये होते. तसेच रायगड जिल्ह्यातील रस्त्यांची पुन्हा पुरती दैना उडालेली असल्याने खड्ड्यातील रस्त्यांवरून प्रवास करणे पर्यटकांनी टाळले आहे. त्याचाही विपरित परिणाम पर्यटन हंगामावर काही प्रमाणात झाल्याचा पर्यटन व्यावसायिकांचा सूर आहे. दिवाळीमध्ये शाळा, महाविद्यालयांना किमान १५ दिवस सुट्टी असते. त्यामुळे फिरण्यासाठीचे प्लॅनिंग केले जाते. दिवाळीनिमित्त असलेल्या सलग सरकारी सुट्टींमुळे काही प्रमाणात पर्यटक आता हळूहळू दाखल होत असल्याचे दिसत आहे. अलिबाग, वरसोली, आक्षी, नागाव, किहीम, मांडवा, काशिद, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर तसेच माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची संख्या आता दिसू लागली आहे.गेल्या हंगामाच्या तुलनेमध्ये ती तब्बल ६० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. समुद्रकिनारी मनोरंजनाची साधणे पुरवणाऱ्या व्यावसायिकांनीही याला दुजोरा दिला आहे.

शाळा, महाविद्यालयाच्या सहलीवरच आमची मदार- भगतगेल्या वर्षी पर्यटनाचा चांगला हंगाम गेला होता. मात्र, आता खराब रस्ते, परतीचा पाऊस, क्यार चक्रिवादळाचे सावट आणि नुकत्याच आटोपलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे व्यवसायाला गती मिळाली नाही, असे बोट व्यावसायिक प्रकाश भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शनिवार आणि रविवार अशा सुट्टी असल्याने काही प्रमाणात पर्यटक आले आहेत. मात्र, त्यामुळे हंगामात झालेले नुकसान भरून निघणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. दिवाळीच्या सुट्टी संपल्या की लगेच शाळा, महाविद्यालय यांच्या सहली मोठ्या संख्येने दाखल होतात. त्यावरच आता आमची मदार राहणार असल्याचे भगत यांनी सांगितले.

टॅग्स :tourismपर्यटनRainपाऊस