शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिक हवालदिल; परतीचा पाऊस अन् खराब रस्त्यांचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 22:50 IST

खराब रस्ते आणि निवडणुकीच्या हंगामामुळे संख्या रोडावली

अलिबाग : दिवाळी सणानिमित्त शाळा महाविद्यालयांना सुट्टी पडल्या की, पर्यटक हे हमखास रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे वळतात. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून अधूनमधून बरसणारा परतीचा पाऊस, क्यार चक्रिवादळाचा धसका, विधानसभा निवडणुकीची धामधूम आणि जिल्ह्यातील खराब रस्त्यांमुळे पर्यटकांची संख्या रोडावल्याचे दिसून येते. पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे पर्यटनाचा हंगाम वाया जाणार असल्याने व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालयांच्या सहलींवरच आता त्यांच्या व्यवसायाची मदार राहणार आहे.

रायगड जिल्ह्याची ओळख पर्यटनाचा जिल्हा अशी झाली आहे. जिल्ह्यातील अलिबाग आणि मुरुड तालुक्यांमध्ये सर्वाधिक पर्यटक दाखल होत असतात. त्याचप्रमाणे श्रीवर्धन, माथेरान या ठिकाणीही पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. धार्मिक, ऐतिहासिक, समुद्र पर्यटन असे विविध पर्याय पर्यटकांसाठी येथे उपलब्ध आहेत. रायगड जिल्हा मुंबई, पुण्यापासून जवळ असल्यामुळे तसेच वाहतुकीचे उत्तम पर्याय उपलब्ध असल्याने जिल्ह्यात पर्यटकांचा तसा वर्षभर राबता असतो. पावसाच्या हंगामामध्ये फारसे पर्यटक या ठिकाणी फिरकत नाहीत. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय म्हणावा तसा जोर धरत नाही. त्यामुळे त्यांचे अर्थव्यस्थेचे गणित काही प्रमाणात कोलमडून पडते. पावसाळ्यामध्ये वर्षासहलीचा बेत आखलेला असतो. मात्र, यंदाच्या पावासाळी हंगामात रस्त्यांची पुन्हा एकदा दैना उडाल्याने पर्यटकांनी या ठिकाणी येण्याचे टाळले होते.

तसेच गेल्या आठ दिवसांपासून परतीचा पाऊस, क्यार चक्रिवादळाची टांगती तलवार असल्याने पर्यटक या ठिकाणी येण्यास धजावल्याचे दिसत नाहीत. त्याचप्रमाणे गेल्या महिनाभरापासून राज्य हे विधानसभा निवडणुकीच्या मूडमध्ये होते. तसेच रायगड जिल्ह्यातील रस्त्यांची पुन्हा पुरती दैना उडालेली असल्याने खड्ड्यातील रस्त्यांवरून प्रवास करणे पर्यटकांनी टाळले आहे. त्याचाही विपरित परिणाम पर्यटन हंगामावर काही प्रमाणात झाल्याचा पर्यटन व्यावसायिकांचा सूर आहे. दिवाळीमध्ये शाळा, महाविद्यालयांना किमान १५ दिवस सुट्टी असते. त्यामुळे फिरण्यासाठीचे प्लॅनिंग केले जाते. दिवाळीनिमित्त असलेल्या सलग सरकारी सुट्टींमुळे काही प्रमाणात पर्यटक आता हळूहळू दाखल होत असल्याचे दिसत आहे. अलिबाग, वरसोली, आक्षी, नागाव, किहीम, मांडवा, काशिद, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर तसेच माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची संख्या आता दिसू लागली आहे.गेल्या हंगामाच्या तुलनेमध्ये ती तब्बल ६० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. समुद्रकिनारी मनोरंजनाची साधणे पुरवणाऱ्या व्यावसायिकांनीही याला दुजोरा दिला आहे.

शाळा, महाविद्यालयाच्या सहलीवरच आमची मदार- भगतगेल्या वर्षी पर्यटनाचा चांगला हंगाम गेला होता. मात्र, आता खराब रस्ते, परतीचा पाऊस, क्यार चक्रिवादळाचे सावट आणि नुकत्याच आटोपलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे व्यवसायाला गती मिळाली नाही, असे बोट व्यावसायिक प्रकाश भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शनिवार आणि रविवार अशा सुट्टी असल्याने काही प्रमाणात पर्यटक आले आहेत. मात्र, त्यामुळे हंगामात झालेले नुकसान भरून निघणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. दिवाळीच्या सुट्टी संपल्या की लगेच शाळा, महाविद्यालय यांच्या सहली मोठ्या संख्येने दाखल होतात. त्यावरच आता आमची मदार राहणार असल्याचे भगत यांनी सांगितले.

टॅग्स :tourismपर्यटनRainपाऊस