शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

वनहक्काचे ११२६ दावे केले अमान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:07 IST

रायगड जिल्हा प्रशासनाने १८ हजार ७०३ वनहक्क दाव्यांपैकी सहा हजार ३२६ वनहक्क दावे मान्य करत तब्बल एक हजार १२६ वन हक्क दावे अमान्य केले आहेत.

- आविष्कार देसाई अलिबाग : रायगड जिल्हा प्रशासनाने १८ हजार ७०३ वनहक्क दाव्यांपैकी सहा हजार ३२६ वनहक्क दावे मान्य करत तब्बल एक हजार १२६ वन हक्क दावे अमान्य केले आहेत. त्यामुळे आता ज्यांचे दावे फेटाळण्यात आले आहेत त्यांना न्यायालयात जाण्यावाचून पर्याय राहिलेला नसल्याचे चित्र आहे. प्रशासनाच्या भूमिकेबाबत लवकरच दिशा ठरवण्यासाठी सामाजिक संघटनांना पुढाकार घ्यावा लागणार आहे. वनवासी अनुसूचित जमाती व पारंपरिक वननिवासींकरिता वनहक्क कायदा करण्यात आला होता.ज्यांचे वास्तव्य पिढ्यानपिढ्या जंगलात असतानाही त्यांच्या हक्कांची कोणत्याही प्रकारची नोंद घेतली गेली नाही अथवा अधिकारांना मान्यता दिली गेली नाही. असे वनहक्क न्याय्यपणे नोंदवून त्याचे अभिलेख तयार करण्याची रचना निर्माण करुन त्यासाठी आवश्यक अशा विविध पुराव्यांचे स्वरूप सुनिश्चित करण्याची हमी या कायद्यामुळे निर्माण झाली आहे. वनहक्कांमध्ये संसाधनाचे शाश्वत वापरासाठीचे अधिकार व जबाबदारी यांचा समावेश होतो. तसेच वापराच्या क्षेत्रातील जैवविविधतेचे संरक्षण व पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन करण्याचे अधिकार गाव समाजाला देऊन वनव्याप्त क्षेत्रांची विकास प्रक्रिया मजबूत केली आहे. त्याचवेळी त्यामध्ये सहभागी असलेल्या स्थानिक जनतेची उपजीविका व अन्न सुरक्षा यांची खात्री या कायद्याने प्राप्त झाली आहे.वनजमिनींवर अतिक्रमण वाढत असल्याने सरकारने प्रशासनाच्या माध्यमातून कारवाईला सुरुवात केली होती. त्यामध्ये खरोखरच आदिवासी आहेत. ते सुद्धा भरडले जात होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करताना आधी आपल्या दरबारी वनहक्क दावे दाखल करुन घेतले होते. जिल्ह्याच्या विविध ग्रामसभांमध्ये १८ हजार ७०३ वनहक्क दावे दाखल करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा स्तरावर सहा हजार ३२६ दावे मान्य करताना एक हजार १२६ दावे अमान्य केले आहेत.जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या अधिकाराप्रमाणे ते देतील तो निर्णय अंतिम राहणार आहे. त्यामुळे ज्यांचे दावे फेटाळले आहेत त्यांना आता थेट न्यायालयातच दाद मागावी लागणार असल्याचे दिसून येते. अमान्य केलेल्या दाव्यातील किती प्रकरणे खरी आणि किती खोटी आहेत हे सांगणे कठीण असल्याचे बोलले जाते.प्रशासनाने नक्की कोणत्या गावातील दावे फेटाळले आहेत त्याची कारणे काय हे अहवाल पाहिल्या शिवाय सांगता येणार नाही, असे आदिवासींसाठी कार्य करणाºया सर्वहरा जनआंदोलनाच्या उल्का महाजन यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.>वन हक्क लाभार्थ्यांना होणारे फायदेआदिवासींचे स्थलांतर थांबवून त्यांच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त.वनहक्क लाभार्थ्यांच्या नोंदी सात बारावर इतर अधिकारात फेरफार नोंदीद्वारे घेण्यात येत आहेत. त्यामुळे वनहक्क लाभार्थ्यांना बँक कर्ज घेता येत आहे. सरकारच्या विविध योजनांचे फायदे घेता येत आहेत.रायगड जिल्ह्याचे मुंबईनजीकचे स्थान तसेच जिल्ह्यास सुमारे २४० किमीचा समुद्रकिनारा लाभल्यामुळे जिल्ह्यात शेतीपूरक उद्योग वाढीस अनुकूल वातावरण तयार झाले आहे.जिल्ह्यात विविध महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे सुरु आहेत. त्यासाठी सुमारे १० हजार हेक्टर जमीन संपादन करण्यात येणार आहे. वनहक्क कायद्यांतर्गत वाटप वनजमिनींचे भूसंपादन झाल्यास आदिवासीच्या उपजीविकेचे हक्क प्रस्थापित झाल्यास त्यांना भूसंपदान मोबदला मिळण्यास मदत होणार आहे.