शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

बाळगंगाच्या बांधावर शेतकऱ्यांसोबत चर्चा; पुनर्वसन प्राधिकरणाच्या उपाध्यक्षांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 00:57 IST

पेण तालुक्यातील रखडलेल्या बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांबरोबर धरणाच्या बांधावर चर्चा करून पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या.

वडखळ : पेण तालुक्यातील रखडलेल्या बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांबरोबर धरणाच्या बांधावर चर्चा करून पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या.या वेळी स्थानिक आमदार धैर्यशील पाटील यांसह जलसधांरण विभागाच्या राजभोज, प्रातांधिकारी प्रतिमा पुदलवाड, अविनाश पाटील, शिवाजी पाटील, सुनील जाधव, भूमाता सघंटनेच्या कमल सावंत, शंकर धोंडे-पाटीलसह अनेक धरणग्रत शेतकरी उपस्थित होते.पेण तालुक्यातील वरसई विभागात जलसंधारण विभागामार्फत होऊ घातलेल्या सिडकोसाठीचे बाळगंगा धरण हे वेगवेगळ्या कारणाने नेहमीच चर्चेत राहिले आहे. निविदा प्रक्रि या, ठेकेदारी, प्रस्तावित रक्कम ते मंजूर रक्कम हे नेहमीच वादाचे विषय असले तरी धरणामध्ये बाधित होणारे शेतकरी, शेतजमीन, गावे, शेती यांच्या पुनर्वसनाबाबतीत अनेक मुद्दे प्रलंबित आहेत. चुकीच्या पद्धतीने पुनर्वसन धोरण राबविले जात असल्याने अनेक शेतकरी हवालदिल झालेत. अखेर पुनर्वसनाचे पुढील धोरण ठरवायला पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी थेट धरणाला भेट देऊन धरणाच्या बाधांवरच शेतकºयांशी चर्चा केली.रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पूर्व भागात खोपोली-अलिबाग रस्त्यालगत असलेल्या वरसई परिसरातील सहा ग्रामपंचायतींमधील नऊ गावे १३ वाड्यांमधील १४०० हेक्टरवर साकारणाºया या प्रकल्पातील ३४४३ कुटुबांच्या घरांचे, शेतजमिनीसह वेगवेगळ्या प्रस्तावित जागांबाबत शासनाच्या वेगवेगळ्या विभागांमार्फत करण्यात आलेले मूल्यांकन, सीमांकन करण्यात आले आहे. मात्र ते चुकीच्या पद्धतीने राबविले गेल्याने २००९ पासून हा प्रकल्प सुरू होऊनही अपूर्णावस्थेत आहे. याच शेतकºयांशी यांच्या पुनर्वसनाबाबत मंत्रालय तसेच संबंधित विभागातील मंत्र्यांकडे बैठाकांचे सत्र मागील एका वर्षापासून चालूच होते; परंतु थेट शेतकºयांशी चर्चा करण्यासाठी पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष व भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी धरणाला भेट देत बाधांवरच शेतकºयांशी चर्चा केली.प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींना सरसकट भाव द्यावा, पुनर्वसन धोरणात बदल करून या सिडको वापरणार असलेल्या पाण्याचा सेस प्रकल्पग्रस्तांना मिळावा.- आ. धैर्यशील पाटीलमालमत्तेचे योग्य मूल्यांकन व मोजणी झाली नसल्याची प्रकल्पग्रस्तांची तक्र ार आहे, त्यांच्या शंकांचे निरसन होणे गरजेचे आहे.- माधव भंडारी, उपाध्यक्ष - पुनर्वसन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य

टॅग्स :Raigadरायगड