शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

बाळगंगाच्या बांधावर शेतकऱ्यांसोबत चर्चा; पुनर्वसन प्राधिकरणाच्या उपाध्यक्षांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 00:57 IST

पेण तालुक्यातील रखडलेल्या बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांबरोबर धरणाच्या बांधावर चर्चा करून पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या.

वडखळ : पेण तालुक्यातील रखडलेल्या बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांबरोबर धरणाच्या बांधावर चर्चा करून पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या.या वेळी स्थानिक आमदार धैर्यशील पाटील यांसह जलसधांरण विभागाच्या राजभोज, प्रातांधिकारी प्रतिमा पुदलवाड, अविनाश पाटील, शिवाजी पाटील, सुनील जाधव, भूमाता सघंटनेच्या कमल सावंत, शंकर धोंडे-पाटीलसह अनेक धरणग्रत शेतकरी उपस्थित होते.पेण तालुक्यातील वरसई विभागात जलसंधारण विभागामार्फत होऊ घातलेल्या सिडकोसाठीचे बाळगंगा धरण हे वेगवेगळ्या कारणाने नेहमीच चर्चेत राहिले आहे. निविदा प्रक्रि या, ठेकेदारी, प्रस्तावित रक्कम ते मंजूर रक्कम हे नेहमीच वादाचे विषय असले तरी धरणामध्ये बाधित होणारे शेतकरी, शेतजमीन, गावे, शेती यांच्या पुनर्वसनाबाबतीत अनेक मुद्दे प्रलंबित आहेत. चुकीच्या पद्धतीने पुनर्वसन धोरण राबविले जात असल्याने अनेक शेतकरी हवालदिल झालेत. अखेर पुनर्वसनाचे पुढील धोरण ठरवायला पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी थेट धरणाला भेट देऊन धरणाच्या बाधांवरच शेतकºयांशी चर्चा केली.रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पूर्व भागात खोपोली-अलिबाग रस्त्यालगत असलेल्या वरसई परिसरातील सहा ग्रामपंचायतींमधील नऊ गावे १३ वाड्यांमधील १४०० हेक्टरवर साकारणाºया या प्रकल्पातील ३४४३ कुटुबांच्या घरांचे, शेतजमिनीसह वेगवेगळ्या प्रस्तावित जागांबाबत शासनाच्या वेगवेगळ्या विभागांमार्फत करण्यात आलेले मूल्यांकन, सीमांकन करण्यात आले आहे. मात्र ते चुकीच्या पद्धतीने राबविले गेल्याने २००९ पासून हा प्रकल्प सुरू होऊनही अपूर्णावस्थेत आहे. याच शेतकºयांशी यांच्या पुनर्वसनाबाबत मंत्रालय तसेच संबंधित विभागातील मंत्र्यांकडे बैठाकांचे सत्र मागील एका वर्षापासून चालूच होते; परंतु थेट शेतकºयांशी चर्चा करण्यासाठी पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष व भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी धरणाला भेट देत बाधांवरच शेतकºयांशी चर्चा केली.प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींना सरसकट भाव द्यावा, पुनर्वसन धोरणात बदल करून या सिडको वापरणार असलेल्या पाण्याचा सेस प्रकल्पग्रस्तांना मिळावा.- आ. धैर्यशील पाटीलमालमत्तेचे योग्य मूल्यांकन व मोजणी झाली नसल्याची प्रकल्पग्रस्तांची तक्र ार आहे, त्यांच्या शंकांचे निरसन होणे गरजेचे आहे.- माधव भंडारी, उपाध्यक्ष - पुनर्वसन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य

टॅग्स :Raigadरायगड