शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल इंडियाचा जिल्ह्यात बोजवारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 23:23 IST

कागदपत्रांसह विवाह नोंदणीही रखडली; इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने दिवसाला एक कोटी रुपयांचा फटका

- आविष्कार देसाई अलिबाग : गेल्या काही दिवसांपासून इंटरनेट सेवा सातत्याने विस्कळीत होत असल्याने डिजिटल इंडिया योजनेचा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसून येते. जिल्ह्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या दुय्यम निबंधक विभागात महत्त्वाच्या कागदपत्रांचे रजिस्ट्रेशन होत नाही, तसेच विवाह करणाऱ्यांचीही नोंद होत नसल्याने दिवसाला सुमारे एक कोटी रुपयांचा महसूल बुडत आहे. जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरून कामानिमित्त येणाºयांना हेलपाटे मारावे लागत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने विविध प्रकल्पांच्या माध्यमातून लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. सुरू असणाºया तसेच प्रस्तावित प्रकल्पांमुळे येथील जमिनी, घर, वाडी, फ्लॅट यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहेत; परंतु सातत्याने इंटरनेट सेवा विस्कळीत होत असल्याने विविध कागदपत्र, दस्त यांची नोंदणीच होत नाही. त्यामुळे स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी भरली जात नसल्याने रोजच्या मिळणाºया महसुलात तूट पडत आहे.या कार्यालयांमध्ये विविध प्रकारचे दिवसाला सुमारे ३० ट्रान्जेक्शन होत असतात. त्यामार्फत सरकारला दिवसाला सुमारे एक कोटी रुपयांपर्यंतचा महसूल मिळतो. कधी-कधी हा आकडा कमीही असतो; परंतु इंटरनेट सेवा सुरळीत नसल्यानेच महसूल मिळण्यावर परिणाम होत आहे. गेल्या दहा दिवसांपासून अशीच परिस्थिती उद्भवत असल्याने आतापर्यंत सुमारे दहा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा ढोबळ अंदाज आहे.इंटरनेट सेवा नसल्याने टायपिंग करणारे, झेरॉक्स सेंटर यांनाही आर्थिक नुकसानीचा फटका सहन करवा लागत आहे. दररोज दस्तनोंदणीसाठी नागरिक येत असतात. मात्र, इंटरेनट सेवा सुरळीत नसल्याने आम्हालाही काम राहत नाही, असे झेरॉक्स आणि टायपिंग करणाºयांनी सांगितले.पर्यायी व्यवस्थेची गरज- राकेश पाटीलप्रभावीपणे आणि हुकमी उत्पन्न देणाºया जिल्हा दुय्यम निबंधक विभागाचे कामकाज सुरळीत पार पडावे, यासाठी सरकारसह जिल्हा प्रशासनाने त्यांना पर्यायी व्यवस्था करून देणे गरजेचे आहे.सरकार डिजिटल इंडियाच्या गप्पा मारत आहे. सर्व व्यवहार पारदर्शक होण्यासाठी आॅनलाइनवर भर दिला जात आहे. मात्र, इंटरनेट सेवेची कनेक्टिव्हिटी नसल्याने डिजिटल इंडियाचा बोजवारा उडाला आहे, असे अ‍ॅड. राकेश पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.दस्त नोंदणीसाठी मोठ्या संख्येने नागरिक येतात. मात्र, त्यांची कामे होत नसल्याने त्यांना हात हलवत परत जावे लागत असल्याचे अ‍ॅड. पाटील यांनी स्पष्ट केले.सातत्याने इंटरनेट सेवा विस्कळीत होत असल्याने त्याचा विपरित परिणाम दैनंदिन कामावर होत आहे. कामच ठप्प पडल्याने दररोजच्या महसुली उत्पन्नालाही फटका बसत आहे. इंटरनेट सेवेत अडथळा येत असल्याने पर्यायी व्यवस्था करण्याची तयारी सुरू आहे.- शैलेंद्र साटम,जिल्हा दुय्यम निबंधकच्फ्लॅटची विक्री तसेच फ्लॅट, जमीन भाड्याने देणे, अशा व्यवहारांची रीतसर नोंदणी करण्यासाठी नागरिकांना दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात जावे लागते. त्यामुळे सरकारी फी भरून नोंदणी करण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून इंटरनेट सेवा सातत्याने विस्कळीत होत असल्याने ताटकळत बसावे लागते. वेळेचा आणि पैशाचाही अपव्यय होत असल्याने संबंधित यंत्रणेने याबाबत पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे,

टॅग्स :digitalडिजिटल