शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

दिघी बंदर रस्ता अडकला वनखात्याच्या कचाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 03:09 IST

श्रीवर्धन तालुक्यातील दिघी पोर्टकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे, परंतु वेळास ते दिघी या सुमारे ७ किमीच्या मार्गाच्या डागडुजीकडे गेल्या सहा वर्षांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

- अभय पाटीलबोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी पोर्टकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे, परंतु वेळास ते दिघी या सुमारे ७ किमीच्या मार्गाच्या डागडुजीकडे गेल्या सहा वर्षांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या मार्गावरून सतत दिघी पोर्टमधील अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे मार्ग पूर्णत: खड्डेमय झाला आहे.सध्या वेळास ते दिघी मार्गावरून प्रवास करताना चालकांसह प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या मार्गावर काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. मात्र ३ किमीचा रस्ता वनखात्याच्या लालफितीमध्ये अडकल्याने मार्गाचे काम अद्याप सुरूच झालेले नाही.वेळास-दिघी रस्त्याची डागडुजी होत नसल्याने हा रस्ता बंद करावा, अशी उपरोधिक मागणी आता स्थानिक करू लागले आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील दिघी पोर्टमधून सध्या मालाची वाहतूक सुरू आहे. बंदराकडे जाणाºया माणगाव - साई- म्हसळा- मेंदडी- वडवली- वेळास- कुडगाव- दिघी हा ५५ किलोमीटर लांबीचा रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. यातील अंदाजे ३० किमीच्या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, तर काही भागांत कामाला अद्याप कामाला सुरुवातही झालेली नाही.श्रीवर्धन तालुक्यातील वेळास - कुडगाव-दिघी या सुमारे ७ किमी मार्गाच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. गेल्या ६ वर्षांपासून नवीन रस्ता होईल, या आशेने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने या रस्याची डागडुजी केली नाही. आता रस्त्यावरील डांबर पूर्णत: निघाले असून, खड्डेमय रस्त्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मालवाहतूक करणा-या चालकांकडून वेगाने वाहने चालविण्यात येत असल्याने दुचाकी, चारचाकी चालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागते.मुरुड अलिबागकडे जाणाºया पर्यटकांसाठी हा रस्ता सोयीचा असल्याने वर्दळही अधिक असते. त्यामुळे काँक्रिटीकरणास विलंब होणार असेल, तर तात्पुरत्या स्वरूपात रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. रस्त्याच्या मागणीसाठी या आधीही अनेकदा आंदोलने करण्यात आली आहेत. मात्र, अद्याप रस्ता जैसे थे आहे.३ किमीचा रस्ता वनविभागाकडे वेळास दिघी मार्गावर ३ किमीचा रस्ता राखीव वने भागामध्ये येतो. या मार्गामध्ये रस्ता बांधकामाची आवश्यक परवानगी न आल्याने रस्त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही.वेळास दिघी मार्गाचे काँक्रिटीकरण होईपर्यंत तरी रस्त्याची तात्पुरती डागडुजी करावी, अशी मागणी जोर धरत आहे व तेही प्रशासनाला जमत नसेल तर हा मार्ग प्रवासासाठी बंद करावा, अशी उपरोधिक संतप्त मागणी जनतेमधून होत आहेवेळास - दिघी वनखात्याच्या अखत्यारित ३ किमीवरील भागाची परवानगी घेण्याचे काम सुरू आहे. पुढील १५ दिवसांमध्ये ही परवानगी मिळेल, शिवाय अन्य भागतील परवानगी मिळविणेची प्रक्रिया सुरू आहे व परवानगी मिळाल्यावर कामास सुरुवात होईल. तत्पूर्वी रस्त्याच्या डागडुजीसाठीही निधीची मागणी करणार आहोत.- सचिन निफाडे, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ

टॅग्स :Raigadरायगड