शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी खुर्ची वाचवण्यासाठी मिसेस रश्मी ठाकरे यांच्याशी गद्दारी केलीय का?, किरीट सोमय्यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 16:06 IST

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज कोर्लई गावात ग्रामपंचायतीला भेट दिली आणि त्यानंतर रेवदांडा पोलीस ठाण्यात जाऊन रश्मी ठाकरे यांच्या १९ बंगल्यांसंदर्भातील नेमकी माहिती काय आहे ती सर्वासमोर आणावी अशी मागणी केली.

अलिबाग

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज कोर्लई गावात ग्रामपंचायतीला भेट दिली आणि त्यानंतर रेवदांडा पोलीस ठाण्यात जाऊन रश्मी ठाकरे यांच्या १९ बंगल्यांसंदर्भातील नेमकी माहिती काय आहे ती सर्वासमोर आणावी अशी मागणी केली. किरीट सोमय्या यांनी कालच आपण कोर्लई गावाला भेट देऊन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार आज ते कोर्लई गावात येताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली होती. भाजपा आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्यानं ग्रामपंचायत परिसरात काहीकाळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी आधीच मोठा बंदोबस्त संपूर्ण परिसरात ठेवला होता. ग्रामपंचायतीला भेट देऊन किरीट सोमय्यांनी एक पत्रक ग्रामसेवकांना दिलं आणि ते रेवदांडा पोलीस ठाण्याच्या दिशेने निगाले. रेवदांडा पोलिसांशी चर्चा केल्यानंतर किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली. 

"सरपंच म्हणतात बंगले अस्तित्वात नाहीत. पण मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे म्हणतात बंगले आहेत. मग नेमकं खरं काय? हे जाणून घेण्यासाठी पोलीस ठाण्यात आलो. यासंपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी आम्ही पोलिसांकडे केली आहे. चर्चा एकदम व्यवस्थित झाली आहे. शिवसैनिक जमले होते. पण पुण्यासारखा प्रसंग इथं घडलेला नाही", असं किरीट सोमय्या म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर उपस्थित केला सवाल"ग्रामपंचायत ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिनिधीत्व करत आहे. ग्रामपंचायत म्हणते की सदरहू जागेवर बंगले अस्तित्वात नाहीत. पण मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे म्हणतात बंगले आहेत. नेमकं खरं काय आहे ते कळायला हवं. आम्ही ग्रामसेवकाला कागदपत्रे दिली. त्यावर आजची स्थिती दोन दिवसात कळवतो असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. दोन चार तासांमध्ये बंगले कसे गायब होतात. सकाळी म्हणतात बंगले आहेत आणि दुपारी म्हणतात बंगले नाहीत. आता दोन-तासांत उद्धव ठाकरेंनी येऊन बंगले तोडले असतील तर पोलिसांनी चौकशी करावी. महाराष्ट्राच्या जनतेला मिसेस मुख्यमंत्री रश्मी उद्धव ठाकरे यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. आम्ही रश्मी ठाकरे यांच्यासोबत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचविण्यासाठी मिसेस रश्मी ठाकरे यांच्याशी गद्दारी केली का? हे सर्वांना कळू द्या", असं किरीट सोमय्या म्हणाले. 

सोमय्या निघून जाताच ग्रामपंचायतीचं शुद्धीकरणकिरीट सोमय्या ग्रामपंचायतीमध्ये आल्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. पंचायत कार्यालयात सोमय्या गेले आणि पाचच मिनिटांत ते बाहेर आले. सोमय्या यांनी सरपंच मिसाळ यांना नमस्कार केला आणि खुर्चीत बसले. त्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी एक पत्रक ग्रामपंचायतीला दिलं. त्यानंतर किरीट सोमय्या आणि प्रशांत ठाकूर कार्यालयाबाहेर आले. सोमय्यांनी ग्रामपंचायतशी एकाशब्दानंही चर्चा केली नाही किंवा कोणत्याही माहितीची विचारपूस केली नाही. ते केवळ ड्रामेबाजीसाठी आले होते, अशी टीका सरपंच प्रशांत मिसळ यांनी केली आहे. किरीट सोमय्या तिथून निघून जाताच शिवसैनिकांनी ग्रामपंचायतीचं गोमूत्र आणि दूध शिंपडून शुद्धीकरण केल्याचंही मिसाळ यांनी सांगितलं.

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना