शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

पेणमध्ये शेतीचे ९००० हेक्टर क्षेत्र नष्ट; शेतकऱ्यांचे मोेठे आर्थिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 23:53 IST

अतिवृष्टीमुळे पेण, माणगाव, महाडमधील भातशेती गेली वाहून; पुरामुळे शेतात साचला गाळ

- दत्ता म्हात्रेपेण : तालुक्यात रविवारपासून पावसाने कहर केला. सतत तीन दिवस पुराचे थैमान, जनजीवन विस्कळीत, भातशेती पुराच्या पाण्याखाली आली. सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण होऊन अनेक संसार उघड्यावर पडले. बुधवार, गुरुवार दोन दिवस पुराचे पाणी ओसरल्यावर शेतीचे जे चित्र नजरेसमोर आले आहे, ते पाहून शेतकऱ्यांना अश्रुधारा आवरणे कठीण झाले. पेणमधील शेती शिवारात पुराचा तडाखा व वाहून आलेला गाळ पिकांवर बसून शेती कुजली आहे.पेणमधील लागवड केलेल्या भातशेतीपैकी ९००० हेक्टर क्षेत्रातील शेती नैसर्गिक आपत्तीत नामशेष झाली आहे. शेतकºयांच्या हातून खरीप हंगाम गेला आहे. राज्य सरकार आता कशाप्रकारे मदत सहकार्य करते याकडे शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे. बाधित गावे, उघड्यावरचे संसार, शेती, शेतीपूरक व्यवसाय, मत्स्यपालन व्यवसाय, भाजीपाला शेती, फळबागा लागवड, झाडांची पडझड, लघुउद्योग, कुटीर उद्योग, गणेशमूर्ती कारखान्याचे मूर्तीचे नुकसान, घरातील सामान, धान्य, कडधान्य, कपडे, घरांतील खतांच्या गोणी, औषधे, मुलांचे दप्तर, पुस्तके, भांडी, इलेक्ट्रिकल साधने शीतकपाट,टीव्ही, दुकानातील सामान, घरांची पडझड, ग्रामीण भागातील रस्ते, खारभूमी संरक्षक बंधारे, विहिरी, गावातील तलावांच्या संरक्षक भिंती, गुरे, दूध व्यवसाय, पोल्ट्री व्यवसाय, शेततळ्यातील मासे, फुलशेती, पाणी स्रोत शाळा, अंगणवाड्या, समाज सभागृह, धान्याची कमतरता आदी गोष्टी लक्षात घेतल्यास पेणमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.५०० कोटींच्यावर नुकसानीचा आकडा -धैर्यशील पाटीलगेले पाच दिवस पुराचे थैमान सबंध पेणमध्ये होते. कणे, बोर्झे, वाशी, वढावकर ते भाल विठ्ठलवाडीपर्यंत पूर परिस्थिती गंभीर होती. कणे खाडीचे बांध फुटल्याने या पाण्याने सर्व ठिकाणी थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले. भातशेती पाण्याखाली गेली. पाच दिवस हेच चित्र जोहे, कळवे, तांबडशेत, दादर या गावामध्ये होते.येथील गणेशमूर्ती कारखान्याचे मूर्तींचे नुकसान झाले आहे. शिर्की,मसद, गडब आमटेम, पाबळ,यासह जिते, दुष्मी,करोनी, दुरशेत अशा सर्व ठिकाणी व पूरपरिस्थितीचा ग्रामस्थांनी एकजुटीने सामना केला आहे. परिस्थिती भयानक आहे. आर्थिक नुकसानीची मोजदाद करता येणार नाही. तरीही सर्व स्तरांवर ५०० कोटी रुपयांच्यावर आर्थिक नुकसानीचा आकडा आहे. यामध्ये प्रामुख्याने शेती, गणपती कारखाने, शेतीपूरक व्यवसाय, पाळीव दुभती जनावरे, भाजीपाला, फळबागा, व्यापारी, ग्रामीण इन्फास्ट्रक्चर, पाणी योजना, रस्ते, शाळा, समाज मंदिर, धान्य, कपडे,व इतर गोष्टी लक्षात घेतल्यास ही आर्थिक नुकसानी फार मोठी आहे. पेणसाठी राज्य सरकारकडून विशेष आर्थिक मदतीची मागणी मी करणार आहे. सरकार आता कशाप्रकारे मदत सहकार्य करते याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. या पत्रकार परिषदेप्रसंगी शेकापचे चिटणीस दिनेश पाटील आदी उपस्थित होते.पूर ओसरला; मात्र शेतकऱ्यांचे डोळे पाणावले- सिकंदर अनवारेदासगाव : महाड तालुक्यात २४ जुलैपासून सातत्याने पाऊस पडत आहे, यामुळे नदीकाठची भातशेती सलग सातव्या दिवशीही पाण्याखाली गेली आहे. त्यातच मंगळवारी आलेल्या पुराने या नुकसानीत भर पडली आहे. महाडमध्ये आलेल्या पुराने शेतात मोठ्या प्रमाणात आलेल्या चिखलाने भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाच्या कृषी विभागाकडून याबाबत तत्काळ दखल घेऊन शेतकºयांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.महाड तालुक्यात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे तालुक्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडत शेजारील भात शेती आणि शहरात प्रवेश केला. यामुळे पुराच्या पाण्याबरोबर आलेला चिखल, कचरा मोठ्या प्रमाणात भातशेतात साचून राहिला आहे. शिवाय, गेले सात दिवस महाड आणि परिसरात सतत पुराचे पाणी शेतात दाखल होत असल्याने भात रोपे पाण्याखाली राहिली होती. त्यातच मंगळवारी अचानक प्रचंड वेगाने महाड तालुक्यातील वाळण, बिरवाडी, रायगड परिसर, खाडीपट्टा, दासगाव, महाड शहर या भागात पुराचे पाणी शिरले. यामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. शेकडो एकर भातशेती पाण्याखाली आली. यामुळे भात रोपे आता कुजण्याची शक्यता आहे. काही भागातील भातशेती पाण्याच्या प्रवाहात नष्ट झाली आहे. जी भातशेती नदीकिनारी आहे त्या शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. महाडमध्ये २४ जुलैपासून सातत्याने नदीकिनाºयावरील भातशेती पाण्याखाली जात आहे. किमान दोन आठवडे महाड तालुक्यातील भातशेती सतत पाण्याखाली राहिल्याने अनेक भागातील भाताची रोपे पिवळी पडण्यास सुरुवात झाली आहे. तर काही भागातील शेती कुजली आहे. मंगळवारी आलेल्या पुराने तर हाहाकार माजवला. महाड आणि परिसरात पाण्याची पातळी वाढली. प्रचंड वेगात पुराचे पाणी आल्याने भात रोपे वाहून गेली आहेत.शेतात चिखल आणि काही भागात जमीन खचल्यानेही नुकसान झाले आहे. दासगाव खाडी पट्ट्यातील दासगाव, वहूर, केंबुर्ली, जुई, तुडील, चिंभावे आदी भागातील सावित्री नदी आणि खाडीकिनारी असलेल्या भातशेतीला या पुराचा फटका बसला आहे. आधीच विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या शेतकºयाला पुन्हा या पुराचा फटका बसल्याने महाड तालुक्यातील शेतकरी चिंतातूर झाला आहे.बागायतदार धास्तावलेरेवदंडा : मागील आठवड्यापासून पावसाने कहर केला असून पाऊस अद्यापि न थांबल्याने आता भातशेतीची लावणीची कामे शेतात पाणी साठल्याने ठप्प आहेत. सुपारी बागायतदार पडत असलेल्या पावसाने सुपारी पिकावर कोळे रोग येण्याची भीती व्यक्त करताना दिसत आहे.अद्यापि परिसरातील जनजीवन विस्कळीत असून सर्वच रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. अनेक अंतर्गत रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून आंबा,नारळ व सुपारी झाडे बागायतीत मोठ्या संख्येने उन्मळून पडलेली दिसत आहेत. बागायतदार वृक्षतोड करणाºया पाडेकºयांच्या शोधात दिसत आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी