शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पेणमध्ये शेतीचे ९००० हेक्टर क्षेत्र नष्ट; शेतकऱ्यांचे मोेठे आर्थिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 23:53 IST

अतिवृष्टीमुळे पेण, माणगाव, महाडमधील भातशेती गेली वाहून; पुरामुळे शेतात साचला गाळ

- दत्ता म्हात्रेपेण : तालुक्यात रविवारपासून पावसाने कहर केला. सतत तीन दिवस पुराचे थैमान, जनजीवन विस्कळीत, भातशेती पुराच्या पाण्याखाली आली. सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण होऊन अनेक संसार उघड्यावर पडले. बुधवार, गुरुवार दोन दिवस पुराचे पाणी ओसरल्यावर शेतीचे जे चित्र नजरेसमोर आले आहे, ते पाहून शेतकऱ्यांना अश्रुधारा आवरणे कठीण झाले. पेणमधील शेती शिवारात पुराचा तडाखा व वाहून आलेला गाळ पिकांवर बसून शेती कुजली आहे.पेणमधील लागवड केलेल्या भातशेतीपैकी ९००० हेक्टर क्षेत्रातील शेती नैसर्गिक आपत्तीत नामशेष झाली आहे. शेतकºयांच्या हातून खरीप हंगाम गेला आहे. राज्य सरकार आता कशाप्रकारे मदत सहकार्य करते याकडे शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे. बाधित गावे, उघड्यावरचे संसार, शेती, शेतीपूरक व्यवसाय, मत्स्यपालन व्यवसाय, भाजीपाला शेती, फळबागा लागवड, झाडांची पडझड, लघुउद्योग, कुटीर उद्योग, गणेशमूर्ती कारखान्याचे मूर्तीचे नुकसान, घरातील सामान, धान्य, कडधान्य, कपडे, घरांतील खतांच्या गोणी, औषधे, मुलांचे दप्तर, पुस्तके, भांडी, इलेक्ट्रिकल साधने शीतकपाट,टीव्ही, दुकानातील सामान, घरांची पडझड, ग्रामीण भागातील रस्ते, खारभूमी संरक्षक बंधारे, विहिरी, गावातील तलावांच्या संरक्षक भिंती, गुरे, दूध व्यवसाय, पोल्ट्री व्यवसाय, शेततळ्यातील मासे, फुलशेती, पाणी स्रोत शाळा, अंगणवाड्या, समाज सभागृह, धान्याची कमतरता आदी गोष्टी लक्षात घेतल्यास पेणमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.५०० कोटींच्यावर नुकसानीचा आकडा -धैर्यशील पाटीलगेले पाच दिवस पुराचे थैमान सबंध पेणमध्ये होते. कणे, बोर्झे, वाशी, वढावकर ते भाल विठ्ठलवाडीपर्यंत पूर परिस्थिती गंभीर होती. कणे खाडीचे बांध फुटल्याने या पाण्याने सर्व ठिकाणी थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले. भातशेती पाण्याखाली गेली. पाच दिवस हेच चित्र जोहे, कळवे, तांबडशेत, दादर या गावामध्ये होते.येथील गणेशमूर्ती कारखान्याचे मूर्तींचे नुकसान झाले आहे. शिर्की,मसद, गडब आमटेम, पाबळ,यासह जिते, दुष्मी,करोनी, दुरशेत अशा सर्व ठिकाणी व पूरपरिस्थितीचा ग्रामस्थांनी एकजुटीने सामना केला आहे. परिस्थिती भयानक आहे. आर्थिक नुकसानीची मोजदाद करता येणार नाही. तरीही सर्व स्तरांवर ५०० कोटी रुपयांच्यावर आर्थिक नुकसानीचा आकडा आहे. यामध्ये प्रामुख्याने शेती, गणपती कारखाने, शेतीपूरक व्यवसाय, पाळीव दुभती जनावरे, भाजीपाला, फळबागा, व्यापारी, ग्रामीण इन्फास्ट्रक्चर, पाणी योजना, रस्ते, शाळा, समाज मंदिर, धान्य, कपडे,व इतर गोष्टी लक्षात घेतल्यास ही आर्थिक नुकसानी फार मोठी आहे. पेणसाठी राज्य सरकारकडून विशेष आर्थिक मदतीची मागणी मी करणार आहे. सरकार आता कशाप्रकारे मदत सहकार्य करते याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. या पत्रकार परिषदेप्रसंगी शेकापचे चिटणीस दिनेश पाटील आदी उपस्थित होते.पूर ओसरला; मात्र शेतकऱ्यांचे डोळे पाणावले- सिकंदर अनवारेदासगाव : महाड तालुक्यात २४ जुलैपासून सातत्याने पाऊस पडत आहे, यामुळे नदीकाठची भातशेती सलग सातव्या दिवशीही पाण्याखाली गेली आहे. त्यातच मंगळवारी आलेल्या पुराने या नुकसानीत भर पडली आहे. महाडमध्ये आलेल्या पुराने शेतात मोठ्या प्रमाणात आलेल्या चिखलाने भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाच्या कृषी विभागाकडून याबाबत तत्काळ दखल घेऊन शेतकºयांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.महाड तालुक्यात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे तालुक्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडत शेजारील भात शेती आणि शहरात प्रवेश केला. यामुळे पुराच्या पाण्याबरोबर आलेला चिखल, कचरा मोठ्या प्रमाणात भातशेतात साचून राहिला आहे. शिवाय, गेले सात दिवस महाड आणि परिसरात सतत पुराचे पाणी शेतात दाखल होत असल्याने भात रोपे पाण्याखाली राहिली होती. त्यातच मंगळवारी अचानक प्रचंड वेगाने महाड तालुक्यातील वाळण, बिरवाडी, रायगड परिसर, खाडीपट्टा, दासगाव, महाड शहर या भागात पुराचे पाणी शिरले. यामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. शेकडो एकर भातशेती पाण्याखाली आली. यामुळे भात रोपे आता कुजण्याची शक्यता आहे. काही भागातील भातशेती पाण्याच्या प्रवाहात नष्ट झाली आहे. जी भातशेती नदीकिनारी आहे त्या शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. महाडमध्ये २४ जुलैपासून सातत्याने नदीकिनाºयावरील भातशेती पाण्याखाली जात आहे. किमान दोन आठवडे महाड तालुक्यातील भातशेती सतत पाण्याखाली राहिल्याने अनेक भागातील भाताची रोपे पिवळी पडण्यास सुरुवात झाली आहे. तर काही भागातील शेती कुजली आहे. मंगळवारी आलेल्या पुराने तर हाहाकार माजवला. महाड आणि परिसरात पाण्याची पातळी वाढली. प्रचंड वेगात पुराचे पाणी आल्याने भात रोपे वाहून गेली आहेत.शेतात चिखल आणि काही भागात जमीन खचल्यानेही नुकसान झाले आहे. दासगाव खाडी पट्ट्यातील दासगाव, वहूर, केंबुर्ली, जुई, तुडील, चिंभावे आदी भागातील सावित्री नदी आणि खाडीकिनारी असलेल्या भातशेतीला या पुराचा फटका बसला आहे. आधीच विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या शेतकºयाला पुन्हा या पुराचा फटका बसल्याने महाड तालुक्यातील शेतकरी चिंतातूर झाला आहे.बागायतदार धास्तावलेरेवदंडा : मागील आठवड्यापासून पावसाने कहर केला असून पाऊस अद्यापि न थांबल्याने आता भातशेतीची लावणीची कामे शेतात पाणी साठल्याने ठप्प आहेत. सुपारी बागायतदार पडत असलेल्या पावसाने सुपारी पिकावर कोळे रोग येण्याची भीती व्यक्त करताना दिसत आहे.अद्यापि परिसरातील जनजीवन विस्कळीत असून सर्वच रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. अनेक अंतर्गत रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून आंबा,नारळ व सुपारी झाडे बागायतीत मोठ्या संख्येने उन्मळून पडलेली दिसत आहेत. बागायतदार वृक्षतोड करणाºया पाडेकºयांच्या शोधात दिसत आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी