शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

आदिवासी वाड्या सुविधांपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 23:14 IST

कर्जतमधील आदिवासींचे हाल : रु ग्णांना चादरीच्या डोलीतून न्यावे लागते उपचारासाठी

नेरळ : मुंबईपासून हाके च्या अंतरावर असलेल्याकर्जत तालुक्यात विकासाच्या गप्पा मारणाऱ्या नेत्यांचे लक्ष आदिवासी भागातील वाड्या पाड्यापर्यंत जात नसल्याने, तालुक्यात आजही काही ठिकाणी आदिवासी बांधव मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. विकासापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना रस्त्याअभावी आजारी व्यक्तीस डोलीच्या आधाराने रुग्णालयात पोहोचवावे लागत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे.

सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत आहे. नेते कार्यकर्ते गावा गावात, वाड्या-पाड्यात फिरून मतांचा जोगवा मागत आहेत. एरव्ही ढुंकूनही न पाहणारे राजकारणी आत्ता मात्र निवडणूक काळात प्रचारासाठी आदिवासी भागातील रस्त्यावरील खड्ड्यांतून मार्ग काढत त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत. आश्वासनाची खैरात वाटत आहेत. आम्ही हे करू आम्ही ते करू अशा प्रकारे विकासाची स्वप्न दाखवत आहेत. मात्र, स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही आजतागायत या भागांचा विकास झाला नाही. किमान रस्ते, वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधांपासून ही वंचित राहिल्याचे दिसत आहेत. आजही आदिवासी महिलांना पाण्यासाठी दाही दिशा वणवण करावे लागत असून, अनेक ठिकाणी रस्तेच नाहीत, तर असलेल्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. यामुळे आदिवासींचे हाल होत आहेत.मूलभूत सुविधा देण्याची मागणी१काही दिवसांपूर्वी कर्जत तालुक्यातील बेकरेवाडी येथील सखू नारायण पारधी या महिलेला दवाखान्यात उपचारासाठी चादरीची डोली करून नेण्यात आले.२रस्त्या अभावी या वाडीत कोणतेही वाहन पोहोचत नाही, अशीच स्थिती चिंचवाडी, अशेनेवाडी, सागाची वाडी, भूतीवली वाडी, बोरीची वाडी, धामण दांडा या आदिवासी वस्त्यांमध्ये पाहावयास मिळत आहे.३विकास राहिला दूर निदान मूलभूत सुविधा तरी आम्हाला मिळाव्यात अशी माफक अपेक्षा दुर्गम भागातील नागरिक करत आहेत.एक महिन्यापूर्वी माझ्या वडिलांचे रु ग्णालयात निधन झाले, त्यांना घरी अंत्यविधीसाठी नेण्यासाठी आम्हाला डिकसल पाली ते चिंचवाडी हे एक तासभराचे अंतर मृतदेहाला चादरीची डोली करून न्यावे लागले. आमच्या वाडीत जाण्यासाठी रस्ताच नाही. पाणी फक्त पावसाळ्यातच उन्हाळी दिवसात डवरे खोदून पाणी शोधावे लागते.- अरविंद सुतक, ग्रामस्थ चिंचवाडीआमच्या भागातील वाड्यांना पक्के रस्ते नाहीत, त्यामुळे आजारी माणसाला चादरीची झोळी करून न्यावे लागते. कोणतेही वाहन वाडीत जात नाही, मला रोज चालतच कामाला यावे लागते.वाडीजवळच पाली भूतीवली धरण आहे, तरी आमच्या भागात उन्हाळ्यात पाणीटंचाई असते.-बाळू कमळू पारधी,ग्रामस्थ, भूतीवलीवाडी