शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

बिरवाडी येथे काळ नदीत मृत माशांचा खच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:31 IST

महाड तालुक्यातील बिरवाडी काळ नदीपात्रात मासे मृत्युमुखी पडल्याची घटना गुरुवारी सकाळी निदर्शनास आली.

बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी काळ नदीपात्रात मासे मृत्युमुखी पडल्याची घटना गुरुवारी सकाळी निदर्शनास आली. या घटनेनंतर बिरवाडीमधील नागरिकांनी संताप व्यक्त करीत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने मात्र या घटनेकडे दुर्लक्ष केले आहे.बिरवाडी काळ नदीपात्रामध्ये प्रदूषित पाण्यामुळे शेकडो मासे मृत्युमुखी पडल्याची घटना कुंभारवाडा येथील नागरिक दीपक स्वाई यांच्या निदर्शनास आली. या घटनेमुळे गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच नदीवर अवलंबून पाणी योजनाही अडचणीत सापडल्या आहेत. अशा प्रकारांमुळे बिरवाडी काळ नदीपात्रातील मासेमारी धोक्यात आल्याने आदिवासी भोई बांधवांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप किनारा कुंभारवाडा येथील कल्पेश उर्फ राजू लक्ष्मण पवार यांनी केला. या घटनेनंतर असनपोई ग्रामस्थ हनुमंत पवार यांनी पाण्याचे नमुने ताब्यात घेऊन तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठवले. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कार्यालयाकडून प्रतिसाद न मिळाल्याने बिरवाडीमधील नागरिक आक्रमक झाले.औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांना पाठीशी घालण्याचे काम प्रदूषण नियंत्रण मंडळ करीत असल्याचा आरोप बिरवाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सचिन बागडे यांनी केला आहे. वारंवार नदीपात्रात उद्भवणाऱ्या प्रदूषणाच्या समस्येवर संताप व्यक्त करीत ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणWaterपाणी