शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

बिरवाडी येथे काळ नदीत मृत माशांचा खच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:31 IST

महाड तालुक्यातील बिरवाडी काळ नदीपात्रात मासे मृत्युमुखी पडल्याची घटना गुरुवारी सकाळी निदर्शनास आली.

बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी काळ नदीपात्रात मासे मृत्युमुखी पडल्याची घटना गुरुवारी सकाळी निदर्शनास आली. या घटनेनंतर बिरवाडीमधील नागरिकांनी संताप व्यक्त करीत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने मात्र या घटनेकडे दुर्लक्ष केले आहे.बिरवाडी काळ नदीपात्रामध्ये प्रदूषित पाण्यामुळे शेकडो मासे मृत्युमुखी पडल्याची घटना कुंभारवाडा येथील नागरिक दीपक स्वाई यांच्या निदर्शनास आली. या घटनेमुळे गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच नदीवर अवलंबून पाणी योजनाही अडचणीत सापडल्या आहेत. अशा प्रकारांमुळे बिरवाडी काळ नदीपात्रातील मासेमारी धोक्यात आल्याने आदिवासी भोई बांधवांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप किनारा कुंभारवाडा येथील कल्पेश उर्फ राजू लक्ष्मण पवार यांनी केला. या घटनेनंतर असनपोई ग्रामस्थ हनुमंत पवार यांनी पाण्याचे नमुने ताब्यात घेऊन तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठवले. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कार्यालयाकडून प्रतिसाद न मिळाल्याने बिरवाडीमधील नागरिक आक्रमक झाले.औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांना पाठीशी घालण्याचे काम प्रदूषण नियंत्रण मंडळ करीत असल्याचा आरोप बिरवाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सचिन बागडे यांनी केला आहे. वारंवार नदीपात्रात उद्भवणाऱ्या प्रदूषणाच्या समस्येवर संताप व्यक्त करीत ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणWaterपाणी