शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
5
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
7
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
8
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
9
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
10
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
11
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
12
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
13
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
14
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
15
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
16
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
17
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
18
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
19
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
20
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

खाडीवर दासगाव ते गोठे पूल बांधावा; खासदार सुनील तटकरे यांना दिले निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 23:45 IST

शेकडो वर्षांपासून दासगाव बंदर या ठिकाणी दासगाव आणि गोठे या दोन गावांना जोडणारा सावित्री खाडीवरील पूल बांधण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून जोर धरल्याचे दिसून येत आहे.

दासगाव : शेकडो वर्षांपासून दासगाव बंदर या ठिकाणी दासगाव आणि गोठे या दोन गावांना जोडणारा सावित्री खाडीवरील पूल बांधण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून जोर धरल्याचे दिसून येत आहे. या पुलाच्या उभारणीसाठी महाड खाडीपट्ट्यातील नागरिकांनी खासदार सुनील तटकरे यांनी त्यांच्या सुतारवाडी कार्यालयात जाऊन एक निवेदन दिले.

दासगाव हे पूर्वापारपासून बंदर आहे. इतर राज्यातून येणाऱ्या तसेच जाणाºया नागरिकांचे एक महत्त्वाचे ठिकाण होते. गाडीमार्ग कमी होता, त्या वेळी या बंदरातून मोठ्या प्रमाणात लॉन्चने नागरिक ये-जा करीत असत. बॅ. ए. आर. अंतुले यांनी मंत्रिपदाच्या काळात टोळ, आंबेत आणि दादली या तीन पुलांची उभारणी केली. त्यामुळे खाडीपट्टा आणि रायगड ते रत्नागिरी दोन्ही जिल्हे जोडले गेले आणि या पुलांमुळे एक सोईस्कर मार्ग तयार झाला.

आजही खाडीपट्ट्यात जाण्याचा विषय आला, तर महाडमार्ग आणि आंबेत मार्ग असे महामार्गावरून दोन मार्ग अवलंबावे लागतात. खाडीपट्ट्यातील नागरिकांना हे दोन्ही मार्ग लांबचेच आहेत. खाडीपट्ट्यात आजही शेकडो गावांचा समावेश असून, जवळपास ५० हजारांच्या वरती लोकसंख्या आहे. सध्या खाडीपट्ट्यात जाण्यासाठी महामार्गावरून जवळचा मार्ग दासगाव ते गोठे होडी मार्ग आहे. आजच्या वेळी हा होडी मार्ग कधी बंद तर कधी सुरू असतो.

मात्र, रात्रीच्या वेळी हा मार्ग बंद असतो. त्यामुळे महाड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील नागरिकांची मोठी हेलपाटणी होते. खासदारकीच्या निवडणुकीच्या काळात अनेक नागरिकांनी खा. सुनील तटकरे यांना दासगाव ते गोठे या दोन गावांना जोडण्यासाठी सावित्री खाडीवरील पूल भविष्यात बांधण्यात आला तर त्याचे काय महत्त्व आहे हे निदर्शनास आणून दिले होते.

खाडीपट्ट्यातील प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस रिहान फैरोजखान देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गोठे ग्रामस्थांनी खा सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी कार्यालयात जाऊन निवेदन दिले.

पुलाचे महत्त्व

या पुलाच्या उभारणीनंतर खाडीपट्ट्यातील तसेच रत्नागिरी विभागातील शेकडो गाव मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला येऊन मिळणार आहेत. खाडीपट्ट्यातील नागरिकांना वीर रेल्वे स्थानकही जवळचे स्थानक होईल. तसेच म्हाप्रल-पंढरपूर आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग एकमेकाला जोडले जातील.

रत्नागिरी तसेच कोकणच्या तळापर्यंतच्या नागरिकांना एक जवळचा पर्यायी मार्ग तयार होईल. तर नातूनगर, विन्हेरे, नडगाव रावढल, दासगाव हा एक नवीन पर्यायी मार्ग तयार होणार असून नातूनगर ते दासगाव या पर्यायी मार्गामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरचे २० (वीस) कि.मी.चे अंतर कमी होईल.

बॅ. ए. आर. अंतुले यांच्या मंत्रिपदाच्या काळात बांधलेले दादली, टोळ आणि आंबेत हे तिन्ही पूल कमकुवत झाले आहेत. आज या तिन्ही पुलांची डागडुजी झाली तरी ते खात्रिलायक बनणार नाहीत. त्यामुळे भविष्यात दासगाव ते गोठे सावित्री खाडीवरील पूल हा एक नवीन पर्यायी मार्ग असणार आहे.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसRaigadरायगड