शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

खाडीवर दासगाव ते गोठे पूल बांधावा; खासदार सुनील तटकरे यांना दिले निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 23:45 IST

शेकडो वर्षांपासून दासगाव बंदर या ठिकाणी दासगाव आणि गोठे या दोन गावांना जोडणारा सावित्री खाडीवरील पूल बांधण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून जोर धरल्याचे दिसून येत आहे.

दासगाव : शेकडो वर्षांपासून दासगाव बंदर या ठिकाणी दासगाव आणि गोठे या दोन गावांना जोडणारा सावित्री खाडीवरील पूल बांधण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून जोर धरल्याचे दिसून येत आहे. या पुलाच्या उभारणीसाठी महाड खाडीपट्ट्यातील नागरिकांनी खासदार सुनील तटकरे यांनी त्यांच्या सुतारवाडी कार्यालयात जाऊन एक निवेदन दिले.

दासगाव हे पूर्वापारपासून बंदर आहे. इतर राज्यातून येणाऱ्या तसेच जाणाºया नागरिकांचे एक महत्त्वाचे ठिकाण होते. गाडीमार्ग कमी होता, त्या वेळी या बंदरातून मोठ्या प्रमाणात लॉन्चने नागरिक ये-जा करीत असत. बॅ. ए. आर. अंतुले यांनी मंत्रिपदाच्या काळात टोळ, आंबेत आणि दादली या तीन पुलांची उभारणी केली. त्यामुळे खाडीपट्टा आणि रायगड ते रत्नागिरी दोन्ही जिल्हे जोडले गेले आणि या पुलांमुळे एक सोईस्कर मार्ग तयार झाला.

आजही खाडीपट्ट्यात जाण्याचा विषय आला, तर महाडमार्ग आणि आंबेत मार्ग असे महामार्गावरून दोन मार्ग अवलंबावे लागतात. खाडीपट्ट्यातील नागरिकांना हे दोन्ही मार्ग लांबचेच आहेत. खाडीपट्ट्यात आजही शेकडो गावांचा समावेश असून, जवळपास ५० हजारांच्या वरती लोकसंख्या आहे. सध्या खाडीपट्ट्यात जाण्यासाठी महामार्गावरून जवळचा मार्ग दासगाव ते गोठे होडी मार्ग आहे. आजच्या वेळी हा होडी मार्ग कधी बंद तर कधी सुरू असतो.

मात्र, रात्रीच्या वेळी हा मार्ग बंद असतो. त्यामुळे महाड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील नागरिकांची मोठी हेलपाटणी होते. खासदारकीच्या निवडणुकीच्या काळात अनेक नागरिकांनी खा. सुनील तटकरे यांना दासगाव ते गोठे या दोन गावांना जोडण्यासाठी सावित्री खाडीवरील पूल भविष्यात बांधण्यात आला तर त्याचे काय महत्त्व आहे हे निदर्शनास आणून दिले होते.

खाडीपट्ट्यातील प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस रिहान फैरोजखान देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गोठे ग्रामस्थांनी खा सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी कार्यालयात जाऊन निवेदन दिले.

पुलाचे महत्त्व

या पुलाच्या उभारणीनंतर खाडीपट्ट्यातील तसेच रत्नागिरी विभागातील शेकडो गाव मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला येऊन मिळणार आहेत. खाडीपट्ट्यातील नागरिकांना वीर रेल्वे स्थानकही जवळचे स्थानक होईल. तसेच म्हाप्रल-पंढरपूर आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग एकमेकाला जोडले जातील.

रत्नागिरी तसेच कोकणच्या तळापर्यंतच्या नागरिकांना एक जवळचा पर्यायी मार्ग तयार होईल. तर नातूनगर, विन्हेरे, नडगाव रावढल, दासगाव हा एक नवीन पर्यायी मार्ग तयार होणार असून नातूनगर ते दासगाव या पर्यायी मार्गामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरचे २० (वीस) कि.मी.चे अंतर कमी होईल.

बॅ. ए. आर. अंतुले यांच्या मंत्रिपदाच्या काळात बांधलेले दादली, टोळ आणि आंबेत हे तिन्ही पूल कमकुवत झाले आहेत. आज या तिन्ही पुलांची डागडुजी झाली तरी ते खात्रिलायक बनणार नाहीत. त्यामुळे भविष्यात दासगाव ते गोठे सावित्री खाडीवरील पूल हा एक नवीन पर्यायी मार्ग असणार आहे.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसRaigadरायगड