शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पोशीर नदीपूल वाहतुकीस धोकादायक, लोखंडी सळ्या बाहेर आल्याने अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 2:51 AM

नेरळ : कर्जत-मुरबाड राज्य मार्गावरील पोशीर नदीवरील पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे. पुलावरील लोखंडी सळ्या बाहेर निघाल्याने अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कांता हाबळेनेरळ : कर्जत-मुरबाड राज्य मार्गावरील पोशीर नदीवरील पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे. पुलावरील लोखंडी सळ्या बाहेर निघाल्याने अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने एखादा मोठा अपघात घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न चालक व प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.कर्जत-मुरबाड हा महत्त्वाचा राज्य मार्ग असून, दुचाकी, चारचाकी वाहनांबरोबरच दिवसरात्र अवजड वजनाची वाहतूक सुरू असते. या रस्त्यावरील कळंब गावाजवळ पोशीर नदीवरील पुलावर लोखंडी सळ्या बाहेर निघाल्या आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुलावरील निघालेल्या सळ्या टायरमध्ये घुसून वाहनांचा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहन भरधाव वेगात असल्यास ते नदीतही पडू शकते. अशी दुर्घटना घटना घडू नये यासाठी बांधकाम विभागाने वेळीस यावर उपाययोजना कराव्यात. पुलाचे संरक्षण कठडेही कमकुवत झाले असून त्याचीही दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.अनेक महिन्यांपासून पुलावरील रस्त्यावर असलेल्या सळ्या उखडल्या आहेत. शिवाय खड्ड्यांमुळे वाहन उसळत असल्याने आरोग्याच्या व्याधीही उद्भवत असल्याचे प्रवासी सांगतात. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी रस्ता दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी प्रवासी वाहनचालकांकडून केली जात आहे. यासंदर्भात कर्जत बांधकाम विभागाचे प्रभारी उपअभियंता अनिल करपे यांच्याशी या कर्जत-मुरबाड रस्त्यावरील नादुरुस्त रस्त्यासंदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.कर्जत-मुरबाड राज्यमार्गावरील पोशीर नदीवरील पुलावर अनेक महिन्यांपासून लोखंडी सळ्या बाहेर निघाल्या आहेत. असे असताना बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येथे अपघात घडण्याआधी मार्गाची दुरु स्ती करावी. अन्यथा येथे अपघात घडल्यास बांधकाम विभागाला जबाबदार धरले जाईल. - धनेश राणे, सामाजिक कार्यकर्ते.पोशीर नदीवरील मार्गावर वाहन चालवणे म्हणजे एक प्रकारे कसरत झाली आहे. लोखंडी सळ्या टायरला लागून किंवा रस्त्यावर निघालेल्या सळ्या चुकवताना जोरदार अपघात होऊ शकतो, त्यामुळे लवकरात लवकर रस्त्याची दुरु स्ती होणे अवश्यक आहे.- मच्छींद्र मसणे, वाहनचालक.