शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
2
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
3
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
4
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
5
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
6
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
7
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
8
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
9
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
11
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
12
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
13
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
14
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
15
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
16
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
17
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
18
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
19
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
20
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!

नेरळ-कळंब रस्त्यावर वाहतुकीस धोका, पोशीर रस्त्यावरील विद्युत खांब जैसे थे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 04:11 IST

नेरळ-कळंब रस्त्यावरील वादग्रस्त विद्युत पोल अद्याप काढण्यात न आल्याने ग्रामस्थ व प्रवासी पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

-कांता हाबळेनेरळ : नेरळ-कळंब रस्त्यावरील वादग्रस्त विद्युत पोल अद्याप काढण्यात न आल्याने ग्रामस्थ व प्रवासी पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या बेकायदेशीर कामाच्या परवानग्या व मान्यता आदेश रद्द करण्यात आलेले असताना अद्याप हे अनधिकृत धोकादायक पोलकाढण्यात आलेले नाहीत, यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.नेरळ-कळंब रस्त्यावर काही महिन्यांपूर्वी वरई येथील एका गृहप्रकल्पास विद्युतपुरवठा करण्यासाठी पोल टाकण्याचे काम सुरू होते. अतिविद्युत दाब वाहिनीचे हे पोल बेकायदा साइडपट्टीवर टाकले जात होते. ते प्रवासी, वाहतूकदार सर्वांसाठीच धोकादायक असल्याने ग्रामस्थांनी या कामास आक्षेप घेऊन विरोध केला.ग्रामस्थ व स्थानिक यांच्या तक्र ारीनंतर देखील सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरण या दोन्ही विभागांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ग्रामस्थांना आंदोलन उभारावे लागले, ग्रामस्थांच्या आंदोलनात्मक पवित्र्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने ३ नोव्हेंबर २०१८ रोजी आदेश काढून या बेकायदा कामाची परवानगी व मान्यता आदेश रद्द केले. तसेच हा पोल त्वरित काढून टाकण्याचे आदेश संबंधित कंपनीला दिले आहेत.यानंतर साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटूनही हे अतिक्र मण दूर करण्यात आलेले नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधूनही आतापर्यंत दुर्लक्ष केले आहे.हो पोल लवकरात लवकर काढण्यात येईल - घुळेसार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अजयकुमार सर्वगौड, महावितरणचे उप अभियंता आनंद घुळे यांनी हा पोल आम्ही लवकरात लवकर काढून टाकतो, असे वारंवार सांगितले होते. कार्यकारी अभियंता पनवेल यांची भेट घेतली असता आम्ही अनधिकृत काम काढून टाकण्याबाबत आदेश पाठवतो, असे अभियंता यांनीदेखील सांगितले होते. मात्र, अद्याप कु ठलीही कारवाई झाली नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त के ली आहे.पोशीर रस्त्यावरील पोलसंदर्भात आमचे उप अभियंता यांच्याशी चर्चा केली असून तशी उपकरणे तयार करण्यात येणार आहेत व ते डिव्हिजन आॅफिसला सादर करण्यात येणार आहेत. ते मंजूर झाल्यास लवकर पोल काढण्यात येणार आहेत. कारण रुं दीकरण करताना ते पोल अडथळा ठरणार आहेत, तसेच पोशीरमधील काही ग्रामस्थांनी हे पोल टाकण्यास काही हरकत नाही, या कामास परवानगी देण्यात यावी, असे पत्र दिले आहे; परंतु त्यांना पत्र देण्याचा कोणताही अधिकार नाही.- आर. एम. वेलदोडे, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग-कर्जतपोशीर रस्त्यावरील पोल टाकण्याच्या परवानग्या रद्द झाल्या आहेत. पोल काढण्यासाठी प्रोसेस सुरू केली आहे. आठवडाभरात पोल काढण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.- आनंद घुळे, उप अभियंता, महावितरण, कर्जतफोडलेला रस्ता करणार कधी?नेरळ : नेरळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मोहचीवाडी येथून खांडा विभागापर्यंत पाण्याच्या लाइनचे काम नेरळ ग्रामपंचायतीकडून सुरू करण्यात आले होते. हे काम करत असताना ठेकेदाराने पाण्याच्या पाइपलाइनसाठी रस्ताचा भाग खोदला. मात्र, या कामाला मोहचीवाडी ग्रामस्थांनी विरोध दर्शविल्यामुळे ते काम ग्रामपंचायतीने थांबविले. दरम्यान, काम थांबविल्यानंतर खोदलेला रस्ता आम्हाला पूर्ववत करून द्या, या मागणीला एक महिना उलटूनही रस्ता केला नसल्याने करणार कधी? हा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील अनेक भागात कमी दाबाने पाणी जाते. परिणामी, ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. असेच खांडा भागात पाण्याचे नियोजन करण्यासाठी मोहाचीवाडी येथून टाकीवरून नवीन ४ इंची लाइन टाकून पाणी देण्यात येणार होते. यासाठी मोहाचीवाडी येथील मुख्य रस्त्याचा काही भाग ठेकेदाराने खोदला होता. मात्र, आम्हालापण पाणी कमी येते आणि आम्हाला विश्वासात न घेता ग्रामपंचात नेरळने हा घाट कसा घातला, असा प्रश्न उपस्थित करत मोहाचीवाडी ग्रामस्थांनी ते काम थांबविले होते. ग्रामपंचायत नेरळमध्ये या विषयी चर्चा झाल्यानंतर ते काम थांबून रस्ता पूर्ववत करून देऊ, असे आश्वासन प्रशासनाकडून दिले होते. मात्र, महिना उलटूनही ते काम न झाल्यामुळे ग्रामस्थांना त्रास होत आहे.नेरळ- खांडा व अन्य भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामपंचायतच्या वतीने नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू केले होते, ते काम येथील ग्रामस्थांनी अडवले असल्याने रस्त्याचे काम करण्यात आले नाही, पाइपलाइन टाकून झाल्यास रस्ता तयार करण्यात येणार आहे. - अंकुश शेळके, उपसरपंच, नेरळ ग्रापंचायतनेरळ ग्रामपंचायतने मोहाचीवाडी येथे जाणार रस्ता महिना भरापासून खोदून ठेवल्याने ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे, चार दिवसांत रस्ता तयार करून दिला जाईल, असे सांगण्यात आले; परंतु महिना उलटूनही रस्ता चांगल्या दर्जाचा केला नाही, रस्ता झाला नाही तर पावसाळ्यात वाहने चालवणे धोक्याचे होणार आहे, त्यामुळे हा रस्ता तत्काळ करावा अन्यथा या रस्त्यांसाठी आंदोलन करावे लागेल.- भगवान चव्हाण, ग्रामस्थ, नेरळ, मोहाचीवाडीरस्ता न झाल्यास आंदोलनहा रस्ता चार दिवसांत करून देतो, असे ग्रामपंचायत प्रशासनाने सांगूनही आजवर तो न झाल्यामुळे तो होणार तरी कधी? हा प्रश्न उपस्थित करत लवकर रस्ता न झाल्यास आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.तर रस्ता करण्याच्या बाबीवर विचार सुरू आहे. लवकरच मोहचीवाडी येथील रस्ता पूर्ववत करू, असे जरी ग्रामपंचायतीने सांगितले.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा