शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

कोरोनाच्या भीतीने लसीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 00:22 IST

महाड तालुक्यात रुग्णसंख्येत वाढ : दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीसाठी रांग 

लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : महाड तालुक्यात सध्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनाच्या भीतीने महाड तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने लसीकरणासाठी प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये धाव घेताना दिसून येत आहेत. मात्र लसीचा तुटवडा असल्याने नागरिकांना विनालस परत जावे लागत आहे.सध्या संपूर्ण महाराष्ट्रात करोनाने हाहाकार माजवला आहे. दर दिवस हा आकडा हजारोंच्या संख्येने वाढत चालला आहे. त्याचप्रमाणे महाड तालुक्यातदेखील दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. सुरवातीला लसीकरणाबाबत कोणीही गांभीर्याने विचार केला नाही. मात्र जसजशी करोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये वाढ होत गेली तशी नागरिकांमध्ये भीती निर्माण झाल्याने, महाड तालुक्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांनी धाव घेण्यास सुरुवात केली आहे.सध्या महाड तालुक्यात लशींचा तुटवडा निर्माण झाला आहे. येणारी लस ही एक तासात संपून जात असल्याचे चित्र दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रावर पहावयास मिळत आहे. लशींचे शंभर डोस असताना सकाळी ७ वाजल्या पासूनच दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शेकडो लोकांच्या रांगाच रांगा लागत आहेत. डॉक्टरांच्या समोर लस किती जणांना द्यायची हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या लसीकरणामध्ये शंभर डोस असताना जवळपास तिनशे लोकांची रांग लागली होती. प्रत्येक जण आपल्याला कशा प्रकारे लस मिळेल या प्रयत्नात होता. लसीकरणासाठी महाड तालुक्यातून आणि शहरातून मोठ्या संख्येने नागरिक आल्याचे दिसून आले.अलिबाग कार्यालयात संपर्क साधला असता सध्या लस उपलबध नाही स्टॉक शून्य आहे. आज महाड तालुक्याला मोठ्या प्रमाणात लसीची गरज आहे. करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. आशा परस्थितीत महाड तालुक्याला मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होणे गरजेचे आहे.  जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याबरोबरच जास्तच जास्त लसीचा साठा महाड तालुक्याला उपलबध करून देणे तेवढेच गरजेचे आहे.दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत २२ गावांचा समावेश आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. या केंद्रावर डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग सक्षम आहे. नेटवर्कचा ही अडथळा येत नाही, लसीकरण वेगाने केले जाते त्यामुळे तालुक्यातील बहुतेक गावातील नागरिक लसीकरणासाठी दासगव प्राथमिक आरोग्य केंद्रावर येतात. महाड शहरातील नागरिकदेखील लसीकरणासाठी मोठ्या संख्येने येतात. मात्र दर वेळी लसींचा तुटवडा निर्माण होत असल्याने शेकडो नागरिकांना परत जावे लागते. सुरुवातीपासून आतापर्यंत दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रावर १३५० नागरिकांना लसीकरण करण्यात आले असले तरी जवळपास ३०००हून जास्त नागरिक या केंद्रावरून लस न घेता परत गेले आहेत. तरी जिल्हा प्रशासनाने या केंद्राचा विचार करत मोठ्या प्रमाणात लस उपलबध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस