शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पीक कर्जात यंदा २०३ कोटींचे उद्दिष्ट, खरीप हंगामात भातपीक वृद्धीवर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 02:32 IST

अलिबाग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी कर्ज योजनेचा लाभ घेऊन भाताचे उत्पादन वाढविण्याची गरज आहे.

अलिबाग - जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी कर्ज योजनेचा लाभ घेऊन भाताचे उत्पादन वाढविण्याची गरज आहे. भाताचे व्यावसायिक उत्पादन घेण्याकरिता शेतकऱ्यांनी कृषी विभाग व सर्व बँकांनी प्रयत्न करून, यंदाच्या खरीप हंगामाकरिता ठेवण्यात आलेले २०३ कोटींचे खरीप पीक कर्ज वितरणाचा लक्षांक साध्य करावा अशा सूचना रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी खरीप हंगामपूर्व जिल्हास्तरीय बैठकीत केल्या आहेत.रायगड जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आपल्या कुटुंबाला वर्षाला पुरेल इतक्याच भाताचे उत्पादन घेण्याच्या मानसिकतेचे आहेत. तसेच जिल्ह्यातील एकूण शेतक-यांपैकी ७१ टक्के शेतकरी अल्प व अत्यल्प भूधारक आहेत. त्यामुळे भातशेतीकरिता कर्ज घेणाºया शेतकºयांचे प्रमाण कमी आहे.जिल्ह्यात २०१९ च्या खरीप हंगामात संकरित व सुधारित भाताचा कर्जदर गतवेळच्या ४० हजार रुपये वरून वाढवून ५५ हजार रुपये प्रति हेक्टरी करण्यात आला आहे. जिल्ह्यात जमीन धारणेनुसार शेतकºयांची संख्या एकूण ३ लाख ११ हजार ६४८ आहे. त्यातील सर्वाधिक ७१ टक्के म्हणजे २ लाख २१ हजार ५८७ शेतकरी अत्यल्प भूधारक आहेत. १५ टक्के म्हणजे ४८ हजार २३९ शेतकरी अल्प भूधारक म्हणजे १ ते २ हेक्टर जमीनधारक आहेत. केवळ १३ टक्के म्हणजे ४१ हजार ८२२ शेतकरी हे सर्वसाधारण म्हणजे दोन हेक्टरपेक्षा अधिक जमीनधारक आहेत.जवळपास २ लाख २१ हजार ५८७ शेतकरी हे अत्यल्प भूधारक असून या शेतकºयांकडे एकूण भूक्षेत्रापैकी २४ टक्के क्षेत्र आहे. परिणामी भातपिकासाठी कर्ज घेण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. जे शेतकरी भात पीक विक्रीकरिता घेतात त्याच शेतकºयांना पीक कर्ज घेणे परवडत असल्याने या बैठकीत सांगण्यात आले.यंदा दीड लाख शेतकरी घेणार कर्जाचा लाभयंदाच्या खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात एकूण १ लाख १८ हजार ३९५ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड होणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत प्राप्त माहितीनुसार, सुमारे दीड लाख शेतकरी पाच एकरपेक्षा कमी क्षेत्र असलेले आहेत. २०१९ च्या खरीप हंगामात किमान दीड लाख शेतकरी पीक कर्जाचा लाभ घेतील, अशी अपेक्षा आहे. त्या दृष्टीने जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी पुढाकार घेऊन पीक कर्ज लक्षांक साध्य होईल याकरिता आवश्यक ती कार्यवाही करावी अशा सूचना डॉ.सूर्यवंशी यांनी केल्या.शेतक-यांच्या पारंपरिक मानसिकतेचा भातपिकाच्या उत्पादनावर परिणामजमीनधारणेनुसार, जिल्ह्यात एकूण ३ लाख ११ हजार ६४८ शेतकरीखरीप हंगामात संकरित व सुधारित भाताचा कर्जदर ४० हजारांवरून ५५ हजार रुपये प्रति हेक्टरी

टॅग्स :Crop Loanपीक कर्जRaigadरायगड