शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

पीक कर्जात यंदा २०३ कोटींचे उद्दिष्ट, खरीप हंगामात भातपीक वृद्धीवर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 02:32 IST

अलिबाग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी कर्ज योजनेचा लाभ घेऊन भाताचे उत्पादन वाढविण्याची गरज आहे.

अलिबाग - जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी कर्ज योजनेचा लाभ घेऊन भाताचे उत्पादन वाढविण्याची गरज आहे. भाताचे व्यावसायिक उत्पादन घेण्याकरिता शेतकऱ्यांनी कृषी विभाग व सर्व बँकांनी प्रयत्न करून, यंदाच्या खरीप हंगामाकरिता ठेवण्यात आलेले २०३ कोटींचे खरीप पीक कर्ज वितरणाचा लक्षांक साध्य करावा अशा सूचना रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी खरीप हंगामपूर्व जिल्हास्तरीय बैठकीत केल्या आहेत.रायगड जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आपल्या कुटुंबाला वर्षाला पुरेल इतक्याच भाताचे उत्पादन घेण्याच्या मानसिकतेचे आहेत. तसेच जिल्ह्यातील एकूण शेतक-यांपैकी ७१ टक्के शेतकरी अल्प व अत्यल्प भूधारक आहेत. त्यामुळे भातशेतीकरिता कर्ज घेणाºया शेतकºयांचे प्रमाण कमी आहे.जिल्ह्यात २०१९ च्या खरीप हंगामात संकरित व सुधारित भाताचा कर्जदर गतवेळच्या ४० हजार रुपये वरून वाढवून ५५ हजार रुपये प्रति हेक्टरी करण्यात आला आहे. जिल्ह्यात जमीन धारणेनुसार शेतकºयांची संख्या एकूण ३ लाख ११ हजार ६४८ आहे. त्यातील सर्वाधिक ७१ टक्के म्हणजे २ लाख २१ हजार ५८७ शेतकरी अत्यल्प भूधारक आहेत. १५ टक्के म्हणजे ४८ हजार २३९ शेतकरी अल्प भूधारक म्हणजे १ ते २ हेक्टर जमीनधारक आहेत. केवळ १३ टक्के म्हणजे ४१ हजार ८२२ शेतकरी हे सर्वसाधारण म्हणजे दोन हेक्टरपेक्षा अधिक जमीनधारक आहेत.जवळपास २ लाख २१ हजार ५८७ शेतकरी हे अत्यल्प भूधारक असून या शेतकºयांकडे एकूण भूक्षेत्रापैकी २४ टक्के क्षेत्र आहे. परिणामी भातपिकासाठी कर्ज घेण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. जे शेतकरी भात पीक विक्रीकरिता घेतात त्याच शेतकºयांना पीक कर्ज घेणे परवडत असल्याने या बैठकीत सांगण्यात आले.यंदा दीड लाख शेतकरी घेणार कर्जाचा लाभयंदाच्या खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात एकूण १ लाख १८ हजार ३९५ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड होणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत प्राप्त माहितीनुसार, सुमारे दीड लाख शेतकरी पाच एकरपेक्षा कमी क्षेत्र असलेले आहेत. २०१९ च्या खरीप हंगामात किमान दीड लाख शेतकरी पीक कर्जाचा लाभ घेतील, अशी अपेक्षा आहे. त्या दृष्टीने जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी पुढाकार घेऊन पीक कर्ज लक्षांक साध्य होईल याकरिता आवश्यक ती कार्यवाही करावी अशा सूचना डॉ.सूर्यवंशी यांनी केल्या.शेतक-यांच्या पारंपरिक मानसिकतेचा भातपिकाच्या उत्पादनावर परिणामजमीनधारणेनुसार, जिल्ह्यात एकूण ३ लाख ११ हजार ६४८ शेतकरीखरीप हंगामात संकरित व सुधारित भाताचा कर्जदर ४० हजारांवरून ५५ हजार रुपये प्रति हेक्टरी

टॅग्स :Crop Loanपीक कर्जRaigadरायगड