शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

पीक कर्जात यंदा २०३ कोटींचे उद्दिष्ट, खरीप हंगामात भातपीक वृद्धीवर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 02:32 IST

अलिबाग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी कर्ज योजनेचा लाभ घेऊन भाताचे उत्पादन वाढविण्याची गरज आहे.

अलिबाग - जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी कर्ज योजनेचा लाभ घेऊन भाताचे उत्पादन वाढविण्याची गरज आहे. भाताचे व्यावसायिक उत्पादन घेण्याकरिता शेतकऱ्यांनी कृषी विभाग व सर्व बँकांनी प्रयत्न करून, यंदाच्या खरीप हंगामाकरिता ठेवण्यात आलेले २०३ कोटींचे खरीप पीक कर्ज वितरणाचा लक्षांक साध्य करावा अशा सूचना रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी खरीप हंगामपूर्व जिल्हास्तरीय बैठकीत केल्या आहेत.रायगड जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आपल्या कुटुंबाला वर्षाला पुरेल इतक्याच भाताचे उत्पादन घेण्याच्या मानसिकतेचे आहेत. तसेच जिल्ह्यातील एकूण शेतक-यांपैकी ७१ टक्के शेतकरी अल्प व अत्यल्प भूधारक आहेत. त्यामुळे भातशेतीकरिता कर्ज घेणाºया शेतकºयांचे प्रमाण कमी आहे.जिल्ह्यात २०१९ च्या खरीप हंगामात संकरित व सुधारित भाताचा कर्जदर गतवेळच्या ४० हजार रुपये वरून वाढवून ५५ हजार रुपये प्रति हेक्टरी करण्यात आला आहे. जिल्ह्यात जमीन धारणेनुसार शेतकºयांची संख्या एकूण ३ लाख ११ हजार ६४८ आहे. त्यातील सर्वाधिक ७१ टक्के म्हणजे २ लाख २१ हजार ५८७ शेतकरी अत्यल्प भूधारक आहेत. १५ टक्के म्हणजे ४८ हजार २३९ शेतकरी अल्प भूधारक म्हणजे १ ते २ हेक्टर जमीनधारक आहेत. केवळ १३ टक्के म्हणजे ४१ हजार ८२२ शेतकरी हे सर्वसाधारण म्हणजे दोन हेक्टरपेक्षा अधिक जमीनधारक आहेत.जवळपास २ लाख २१ हजार ५८७ शेतकरी हे अत्यल्प भूधारक असून या शेतकºयांकडे एकूण भूक्षेत्रापैकी २४ टक्के क्षेत्र आहे. परिणामी भातपिकासाठी कर्ज घेण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. जे शेतकरी भात पीक विक्रीकरिता घेतात त्याच शेतकºयांना पीक कर्ज घेणे परवडत असल्याने या बैठकीत सांगण्यात आले.यंदा दीड लाख शेतकरी घेणार कर्जाचा लाभयंदाच्या खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात एकूण १ लाख १८ हजार ३९५ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड होणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत प्राप्त माहितीनुसार, सुमारे दीड लाख शेतकरी पाच एकरपेक्षा कमी क्षेत्र असलेले आहेत. २०१९ च्या खरीप हंगामात किमान दीड लाख शेतकरी पीक कर्जाचा लाभ घेतील, अशी अपेक्षा आहे. त्या दृष्टीने जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी पुढाकार घेऊन पीक कर्ज लक्षांक साध्य होईल याकरिता आवश्यक ती कार्यवाही करावी अशा सूचना डॉ.सूर्यवंशी यांनी केल्या.शेतक-यांच्या पारंपरिक मानसिकतेचा भातपिकाच्या उत्पादनावर परिणामजमीनधारणेनुसार, जिल्ह्यात एकूण ३ लाख ११ हजार ६४८ शेतकरीखरीप हंगामात संकरित व सुधारित भाताचा कर्जदर ४० हजारांवरून ५५ हजार रुपये प्रति हेक्टरी

टॅग्स :Crop Loanपीक कर्जRaigadरायगड