शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
3
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
5
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
6
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
7
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
8
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
9
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
11
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
12
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
13
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
14
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
15
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
16
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
17
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
18
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
19
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
20
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?

'काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराने श्रीमंत भारतातील नागरिक गरीब बनले'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 05:33 IST

नितीन गडकरी यांची टीका; अलिबागमध्ये युतीची प्रचारसभा

अलिबाग : देशावर राज्य करण्यासाठी काँग्रेसला ७० वर्षे मिळाली; परंतु काँग्रेसची चुकीची धोरणे आणि भ्रष्ट प्रशासनामुळे श्रीमंत भारत देशाचे नागरिक गरीब बनले; परंतु मोदी सरकारच्या काळात देश बदलत असून, देशाचा विकास होतो आहे. हा विकास असाच पुढे करायचा झाल्यास रायगडमधून महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांना निवडून देण्याचे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी अलिबागमध्ये केले.शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ येथील जयमाला गार्डनमध्ये आयोजित जाहीर सभेत गडकरी बोलत होते. एकमेकांना पाण्यात पाहणारे अनेक नेते या निवडणुकीसाठी एकत्र आलेले असून, या संधीसाधू नेत्यांना या निवडणुकीत धडा शिकवा, असे सांगितले. कोकणातील पिण्याचे पाणी, रस्ते, रोजगार आणि पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी पावले टाकलेली असून, कोकणातील उर्वरित विकासाची कामेही निवडणुकीनंतर हाती घेण्यात येतील, असे गडकरी म्हणाले.कोकणातील सव्वालाख बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी जेएनपीटीचा विकासही करण्यात येणार असून, जलवाहतुकीच्या विकासाकडेही लक्ष देण्यात येणार आहे. कोकणचा विकास करण्यासाठी विकासाची दूरदृष्टी असणारा नेता हवा असल्याने अनंत गीते यांना मतदान करा, असेही गडकरी यांनी आवाहन केले. युतीचे उमेदवार अनंत गीते यांनी आपल्या भाषणात राजकारणामुळे रायगडमधील गोरेगाव अर्बन बँक, रोह्यातील रोहा अष्टमी अर्बन बँक आणि पेणमधील पेण अर्बन बँक बुडाल्या, असे सांगितले.उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नागोठणे ते अलिबाग या दरम्यानच्या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी एमआयडीसी संचालक मंडळाला प्रस्ताव करून घेतला असून, त्यासाठी १०० कोटींचा निधी मंजूर केल्याचेही सांगितले.धेरंड येथे टाटाने भूसंपादन केले होते. तेथे वीज प्रकल्प उभा न राहिल्याने ही जमीन शासन परत ताब्यात घेऊन तेथे पेपर मील उभारून सहा हजार बेरोजगारांना रोजगार दिला जाणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले. या वेळी शिवसेनानेते विजय कवळे, भाजप आमदार प्रवीण दरेकर, रायगड भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, आरपीआयचे रायगड जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड यांनीही आपले विचार मांडले.शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तरकाँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने त्यांच्या काळात ७० कोटींची विमाने घेतली. त्यात काय घोटाळा झाला हे माहीत नाही; परंतु याच निधीने देशातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडविला असता, तर पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीलाही सुगीचे दिवस आले असते, अशी टीका त्यांनी केली. दहशतवादांसमोर गुडघे टेकणारा पंतप्रधान हवा की त्याला उखडून फेकणारा पंतप्रधान हवा, हे मतदारांनी ठरवायचे आहे, असेही गडकरी म्हणाले. शरद पवार यांनी अलिबागच्या सभेत, अनंत गीते हे संसदेत आवाज न उठविता फक्त जांभई देण्याचे काम करतात, त्याचा गडकरी यांनी समाचार घेताना, पवारसाहेब खोट बोलतात असे सांगतानाच अनंत गीते कोकणातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी मला तब्बल २५ वेळा भेटल्याचे गडकरी म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगडNitin Gadkariनितीन गडकरीcongressकाँग्रेस