शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

‘यशाचे खरे श्रेय कार्यकर्त्यांनाच’

By admin | Updated: February 14, 2017 04:57 IST

शिक्षक मतदार संघावर एका विशिष्ट पक्षाची मक्तेदारी होती. गेल्या दीड वर्षापूर्वी बाळाराम पाटील यांना विधान परिषद कोकण शिक्षक मतदार संघाचे

अलिबाग : शिक्षक मतदार संघावर एका विशिष्ट पक्षाची मक्तेदारी होती. गेल्या दीड वर्षापूर्वी बाळाराम पाटील यांना विधान परिषद कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बनवायचे असा निर्णय घेतला. सर्व कार्यकर्त्यांनी खुप मेहनत घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचा पाठींबा मिळाला. सर्वांच्या परिश्रमामुळे बाळाराम पाटील आमदार म्हणून निवडून आले. या यशाचे खरे श्रेय कार्यकर्त्यांचेच आहे, असे प्रतिपादन शेतकरी कामागार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केले आहे.शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने अलिबागेत शुक्रवारी कोकण शिक्षक मतदार संघाचे नविनर्वाचित आ. बाळाराम पाटील तसेच सर्व निरीक्षकांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ. जयंत पाटील बोलत होते. याप्रसंगी आ.जयंत पाटील म्हणाले, राज्यात विधीमंडळात काम करीत असताना कौटुंबिक नाते जपणारे विकास सावंत यांच्यासारखी विविध पक्षातील अनेक मंडळी भेटली. त्यांच्या सहकार्यामुळे व पाठींब्यामुळे विधान परिषद कोकण शिक्षक मतदार संघातील निवडणूक लढण्याची ताकद मिळाली. त्यात कार्यकर्त्यांनी देखील झोकून देऊन काम केले. बाळाराम पाटील यांच्या विजयामुळे पनवेलकरांना एक वेगळी उर्जा मिळाली आहे. माझ्या आयुष्यातील हा दुसरा विजय आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत आणखी वेगळ्या तऱ्हेने काम करायचे आहे. ज्यांना आपण खासदार म्हणून निवडून दिले. त्या गद्दारांना त्यांची जागा दाखवायची आहे. त्यामुळे अधिक जिद्दीने काम करु न शेतकरी कामगार पक्षाची सत्ता पनवेल महानगरपालिकेवर आणण्यासाठी मेहनत घ्या असे आवाहन आ. जयंत पाटील यांनी केले. नवनिवार्चित आ. बाळाराम पाटील सत्काराला उत्तर देताना म्हणाले,आ. जयंत पाटील, विवेक भाई यांनी शिक्षक मतदार संघाची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी पाठींबा दिला. गेली ३६ वर्षे शिक्षक मतदार संघावर भारतीय जनता पार्टीच्या शिक्षक परिषदेचा पगडा होता. त्यामुळे हे काम कठीण होते. परंतु त्यानंतर कामाला लागलो. सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी, पालघर व रायगड जिल्हयात ठिकठिकाणी मतदारांशी संवाद साधण्यास सुरु वात केली. कोकणात शेतकरी कामगार पक्षाबरोबरच राष्ट्रवादी, काँग्रेस व अन्य संस्थांच्या असलेल्या शिक्षण संस्थेशी संपर्क साधून प्रत्येक शाळेत जाऊन नियोजनबध्द काम केले असे आ. बाळाराम पाटील यांनी नमुद केले.यावेळी माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील आदीं उपस्थित होते.