शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

‘यशाचे खरे श्रेय कार्यकर्त्यांनाच’

By admin | Updated: February 14, 2017 04:57 IST

शिक्षक मतदार संघावर एका विशिष्ट पक्षाची मक्तेदारी होती. गेल्या दीड वर्षापूर्वी बाळाराम पाटील यांना विधान परिषद कोकण शिक्षक मतदार संघाचे

अलिबाग : शिक्षक मतदार संघावर एका विशिष्ट पक्षाची मक्तेदारी होती. गेल्या दीड वर्षापूर्वी बाळाराम पाटील यांना विधान परिषद कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बनवायचे असा निर्णय घेतला. सर्व कार्यकर्त्यांनी खुप मेहनत घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचा पाठींबा मिळाला. सर्वांच्या परिश्रमामुळे बाळाराम पाटील आमदार म्हणून निवडून आले. या यशाचे खरे श्रेय कार्यकर्त्यांचेच आहे, असे प्रतिपादन शेतकरी कामागार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केले आहे.शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने अलिबागेत शुक्रवारी कोकण शिक्षक मतदार संघाचे नविनर्वाचित आ. बाळाराम पाटील तसेच सर्व निरीक्षकांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ. जयंत पाटील बोलत होते. याप्रसंगी आ.जयंत पाटील म्हणाले, राज्यात विधीमंडळात काम करीत असताना कौटुंबिक नाते जपणारे विकास सावंत यांच्यासारखी विविध पक्षातील अनेक मंडळी भेटली. त्यांच्या सहकार्यामुळे व पाठींब्यामुळे विधान परिषद कोकण शिक्षक मतदार संघातील निवडणूक लढण्याची ताकद मिळाली. त्यात कार्यकर्त्यांनी देखील झोकून देऊन काम केले. बाळाराम पाटील यांच्या विजयामुळे पनवेलकरांना एक वेगळी उर्जा मिळाली आहे. माझ्या आयुष्यातील हा दुसरा विजय आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत आणखी वेगळ्या तऱ्हेने काम करायचे आहे. ज्यांना आपण खासदार म्हणून निवडून दिले. त्या गद्दारांना त्यांची जागा दाखवायची आहे. त्यामुळे अधिक जिद्दीने काम करु न शेतकरी कामगार पक्षाची सत्ता पनवेल महानगरपालिकेवर आणण्यासाठी मेहनत घ्या असे आवाहन आ. जयंत पाटील यांनी केले. नवनिवार्चित आ. बाळाराम पाटील सत्काराला उत्तर देताना म्हणाले,आ. जयंत पाटील, विवेक भाई यांनी शिक्षक मतदार संघाची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी पाठींबा दिला. गेली ३६ वर्षे शिक्षक मतदार संघावर भारतीय जनता पार्टीच्या शिक्षक परिषदेचा पगडा होता. त्यामुळे हे काम कठीण होते. परंतु त्यानंतर कामाला लागलो. सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी, पालघर व रायगड जिल्हयात ठिकठिकाणी मतदारांशी संवाद साधण्यास सुरु वात केली. कोकणात शेतकरी कामगार पक्षाबरोबरच राष्ट्रवादी, काँग्रेस व अन्य संस्थांच्या असलेल्या शिक्षण संस्थेशी संपर्क साधून प्रत्येक शाळेत जाऊन नियोजनबध्द काम केले असे आ. बाळाराम पाटील यांनी नमुद केले.यावेळी माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील आदीं उपस्थित होते.