शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

‘यशाचे खरे श्रेय कार्यकर्त्यांनाच’

By admin | Updated: February 14, 2017 04:57 IST

शिक्षक मतदार संघावर एका विशिष्ट पक्षाची मक्तेदारी होती. गेल्या दीड वर्षापूर्वी बाळाराम पाटील यांना विधान परिषद कोकण शिक्षक मतदार संघाचे

अलिबाग : शिक्षक मतदार संघावर एका विशिष्ट पक्षाची मक्तेदारी होती. गेल्या दीड वर्षापूर्वी बाळाराम पाटील यांना विधान परिषद कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बनवायचे असा निर्णय घेतला. सर्व कार्यकर्त्यांनी खुप मेहनत घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचा पाठींबा मिळाला. सर्वांच्या परिश्रमामुळे बाळाराम पाटील आमदार म्हणून निवडून आले. या यशाचे खरे श्रेय कार्यकर्त्यांचेच आहे, असे प्रतिपादन शेतकरी कामागार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केले आहे.शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने अलिबागेत शुक्रवारी कोकण शिक्षक मतदार संघाचे नविनर्वाचित आ. बाळाराम पाटील तसेच सर्व निरीक्षकांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ. जयंत पाटील बोलत होते. याप्रसंगी आ.जयंत पाटील म्हणाले, राज्यात विधीमंडळात काम करीत असताना कौटुंबिक नाते जपणारे विकास सावंत यांच्यासारखी विविध पक्षातील अनेक मंडळी भेटली. त्यांच्या सहकार्यामुळे व पाठींब्यामुळे विधान परिषद कोकण शिक्षक मतदार संघातील निवडणूक लढण्याची ताकद मिळाली. त्यात कार्यकर्त्यांनी देखील झोकून देऊन काम केले. बाळाराम पाटील यांच्या विजयामुळे पनवेलकरांना एक वेगळी उर्जा मिळाली आहे. माझ्या आयुष्यातील हा दुसरा विजय आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत आणखी वेगळ्या तऱ्हेने काम करायचे आहे. ज्यांना आपण खासदार म्हणून निवडून दिले. त्या गद्दारांना त्यांची जागा दाखवायची आहे. त्यामुळे अधिक जिद्दीने काम करु न शेतकरी कामगार पक्षाची सत्ता पनवेल महानगरपालिकेवर आणण्यासाठी मेहनत घ्या असे आवाहन आ. जयंत पाटील यांनी केले. नवनिवार्चित आ. बाळाराम पाटील सत्काराला उत्तर देताना म्हणाले,आ. जयंत पाटील, विवेक भाई यांनी शिक्षक मतदार संघाची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी पाठींबा दिला. गेली ३६ वर्षे शिक्षक मतदार संघावर भारतीय जनता पार्टीच्या शिक्षक परिषदेचा पगडा होता. त्यामुळे हे काम कठीण होते. परंतु त्यानंतर कामाला लागलो. सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी, पालघर व रायगड जिल्हयात ठिकठिकाणी मतदारांशी संवाद साधण्यास सुरु वात केली. कोकणात शेतकरी कामगार पक्षाबरोबरच राष्ट्रवादी, काँग्रेस व अन्य संस्थांच्या असलेल्या शिक्षण संस्थेशी संपर्क साधून प्रत्येक शाळेत जाऊन नियोजनबध्द काम केले असे आ. बाळाराम पाटील यांनी नमुद केले.यावेळी माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील आदीं उपस्थित होते.