शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

Coronavirus : रायगड जिल्ह्यातील एक हजार शाळांना सुट्टी, ग्रामीण भाग सध्या सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 2:01 AM

कोरोनाच्या भीतीने जगभरात चांगलीच खळबळ माजली आहे. आतापर्यंत राज्यामध्ये ३१ रुग्ण आढळले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकाने शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग : कोरोनाच्या भीतीने जगभरात चांगलीच खळबळ माजली आहे. आतापर्यंत राज्यामध्ये ३१ रुग्ण आढळले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकाने शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातील तब्बल एक हजार १०० शाळा बंद राहणार आहेत. त्यामुळे शाळांची घंटा पुढील १५ दिवस वाजणार नसल्याने साडेपाच लाख विद्यार्थी सुट्टीवर जाणार आहेत.महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायती क्षेत्रातील खासगी व्यस्थापनाच्या सर्व अनुदानित, अंशत: अनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयं अर्थ साहाय्यित माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचा समावेश आहे. सरकारने केवळ शहरी भागातील शाळांबाबत हा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागांमध्ये सध्या कोरोनाची दहशत पोहोचली नसल्याने ग्रामीण भागातील नागरिक सुरक्षित असल्याचे त्यानिमित्ताने अधोरेखित होेते.कोरोनाच्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीची ठिकाणे असलेल्या जत्रा, मॉल्स, स्विमिंग पूल, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, व्यायामशाळांवर बंदी घातली आहे. त्यापाठोपाठ सरकारने शाळा-महाविद्यालयांच्या बाबतीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे सूतोवाचही सरकारने केले आहे. पुढील २० दिवस अतिशय महत्त्वाचे असल्याने सरकारकडून कडक उपाययोजना करण्यात येत आहेत.रायगड जिल्ह्यामध्ये एक हजार १०० शाळा आहेत. सुमारे साडेपाच लाख विद्यार्थीसंख्या आहे. अशा ठिकाणी कोरोनाचा प्रसार होण्याची जास्त शक्यता आहे. याच कारणाने सरकारने शाळा, महाविद्यालये ३१ मार्च २०२० पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बंदी आदेश हा शहरी आणि निमशहरी भागांसाठी लागू करण्यात आला आहे. तर रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या तब्बल दोन हजार ७०० शाळा सुरूच राहणार आहेत. या ठिकाणी शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या सुमारे एक लाखाच्या आसपास आहे. शहरी भागामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे अशा ठिकाणी अधिक खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. कोचिंग क्लासेसही बंद ठेवण्याचे निर्देश सरकारने दिलेले आहेत.कडक कारवाईसाथरोग प्रतिबंधात्मक कायदा १९९७ नुसार सरकारने बंदी आदेश लागू केले आहेत. त्यामुळे सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे.

टॅग्स :SchoolशाळाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस