शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

Coronavirus : रायगड जिल्ह्यातील एक हजार शाळांना सुट्टी, ग्रामीण भाग सध्या सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 02:03 IST

कोरोनाच्या भीतीने जगभरात चांगलीच खळबळ माजली आहे. आतापर्यंत राज्यामध्ये ३१ रुग्ण आढळले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकाने शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग : कोरोनाच्या भीतीने जगभरात चांगलीच खळबळ माजली आहे. आतापर्यंत राज्यामध्ये ३१ रुग्ण आढळले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकाने शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातील तब्बल एक हजार १०० शाळा बंद राहणार आहेत. त्यामुळे शाळांची घंटा पुढील १५ दिवस वाजणार नसल्याने साडेपाच लाख विद्यार्थी सुट्टीवर जाणार आहेत.महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायती क्षेत्रातील खासगी व्यस्थापनाच्या सर्व अनुदानित, अंशत: अनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयं अर्थ साहाय्यित माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचा समावेश आहे. सरकारने केवळ शहरी भागातील शाळांबाबत हा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागांमध्ये सध्या कोरोनाची दहशत पोहोचली नसल्याने ग्रामीण भागातील नागरिक सुरक्षित असल्याचे त्यानिमित्ताने अधोरेखित होेते.कोरोनाच्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीची ठिकाणे असलेल्या जत्रा, मॉल्स, स्विमिंग पूल, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, व्यायामशाळांवर बंदी घातली आहे. त्यापाठोपाठ सरकारने शाळा-महाविद्यालयांच्या बाबतीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे सूतोवाचही सरकारने केले आहे. पुढील २० दिवस अतिशय महत्त्वाचे असल्याने सरकारकडून कडक उपाययोजना करण्यात येत आहेत.रायगड जिल्ह्यामध्ये एक हजार १०० शाळा आहेत. सुमारे साडेपाच लाख विद्यार्थीसंख्या आहे. अशा ठिकाणी कोरोनाचा प्रसार होण्याची जास्त शक्यता आहे. याच कारणाने सरकारने शाळा, महाविद्यालये ३१ मार्च २०२० पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बंदी आदेश हा शहरी आणि निमशहरी भागांसाठी लागू करण्यात आला आहे. तर रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या तब्बल दोन हजार ७०० शाळा सुरूच राहणार आहेत. या ठिकाणी शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या सुमारे एक लाखाच्या आसपास आहे. शहरी भागामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे अशा ठिकाणी अधिक खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. कोचिंग क्लासेसही बंद ठेवण्याचे निर्देश सरकारने दिलेले आहेत.कडक कारवाईसाथरोग प्रतिबंधात्मक कायदा १९९७ नुसार सरकारने बंदी आदेश लागू केले आहेत. त्यामुळे सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे.

टॅग्स :SchoolशाळाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस