शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

coronavirus: कोरोनामुळे पावसाळी पर्यटनावर पाणी, सुरक्षिततेसाठी सर्व पर्यटनस्थळे बंदच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 23:58 IST

या वर्षी कोरोनामुळे साडेतीन महिन्यांपासून सर्व पर्यटनस्थळे बंद आहेत. पावसाळ्यातही ती बंदच राहण्याची शक्यता आहे. यामुळे या वर्षीच्या पर्यटन हंगामावर पाणी फिरणार असून, स्थानिकांचा रोजगारही बुडणार आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : पावसाळी पर्यटनासाठी मुंबईकरांकडून सर्वाधिक पसंती पनवेलला मिळत असते. कर्नाळा किल्ला, अभयारण्य, कलावंतीन दुर्ग, प्रबळगड, इरशाळगड व या परिसरातील निसर्गासह धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात. परंतु, या वर्षी कोरोनामुळे साडेतीन महिन्यांपासून सर्व पर्यटनस्थळे बंद आहेत. पावसाळ्यातही ती बंदच राहण्याची शक्यता आहे. यामुळे या वर्षीच्या पर्यटन हंगामावर पाणी फिरणार असून, स्थानिकांचा रोजगारही बुडणार आहे.राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळे असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये रायगडचा अग्रक्रमांक लागतो. गडकिल्ले, धार्मिक स्थळे, नैसर्गिक पर्यटनस्थळांचे वैभव या परिसराला लाभले आहे. पावसाळी पर्यटनासाठी जिल्ह्यात सर्वाधिक पसंती पनवेल तालुक्याला लाभत असते. पावसाळा सुरू झाला की कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांची सर्वाधिक गर्दी होते. जूनपासून पावसाळा संपेपर्यंत अभयारण्य व कर्नाळा किल्ला पाहण्यासाठी प्रत्येक महिन्याला १0 ते १५ हजार पर्यटक भेट देत असतात. येथून काही अंतरावर असणा-या इरशाळगड, कलावंतीन दुर्ग व प्रबळगड किल्ल्यांवरही प्रत्येक आठवड्यात सरासरी २ ते ५ हजार पर्यटक भेट देत असतात. गाढेश्वर धरण परिसर, मोरबे धरण, पांडवकडा व या डोंगररांगांतील इतर धबधबे पाहण्यासाठीही मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.

कर्नाळा, प्रबळगड, इरशाळगड परिसरातील स्थानिक गावांची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. प्रत्येक घरातील किमान एकतरी व्यक्ती हॉटेल, चहाची टपरी व इतर व्यवसाय करून उदरनिर्वाह करत आहे. प्रबळगडमाची या संपूर्ण गावचा रोजगार पर्यटनावर अवलंबून आहे. कर्नाळा अभयारण्यातही बचतगटाच्या माध्यमातून हॉटेल चालविण्यात येत आहे. वनव्यवस्थापन समितीमध्येही स्थानिकांना नोकरी देण्यात आली आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्व पर्यटनस्थळे बंद ठेवली असल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.काजव्यांचा हंगामही गेला : कलावंतीन दुर्ग व प्रबळगडाला वर्षभर पर्यटक भेट देत असतात. कलावंतीन सुळका सर करण्यासाठी देश, विदेशातून पर्यटक येत असतात. पावसाळा सुरू झाला की या परिसरात रात्री लाखो काजवे दिसू लागतात. येथील वृक्षांवर चांदण्यांप्रमाणे काजवे चमकत असतात. ते मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मुक्कामासाठी प्रबळगड माचीवर जात असतात. या वर्षी तो हंगामही वाया गेला आहे.कर्नाळा परिसरातही पसरली शांततापावसाळ्यात सर्वाधिक गर्दी कर्नाळा अभयारण्य व कर्नाळा किल्ला पाहण्यासाठी होते. १२ चौरस किलोमीटर परिसरावरील या अभयारण्यात ६४२ प्रकारचे वृक्ष, १३४ प्रजातींचे स्थानिक व ३४ प्रजातींचे विदेशी पक्षी पाहावयास मिळतात.गडावरील ऐतिहासिक अवशेष व वरून दिसणारा निसर्गरम्य परिसर यामुळे येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. परंतु कोरोनामुळे साडेतीन महिने या परिसरातही शांतता पसरली आहे.

कर्नाळा अभयारण्यात गतवर्षी (२०१९) आलेल्या पर्यटकांची आकडेवारीमार्च ७,५५१एप्रिल ३,८९३मे ३,९३८जून १0,२८१कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कर्नाळा अभयारण्य व किल्ला परिसरात पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे. सर्व परिस्थिती सुरळीत झाल्यानंतरच पर्यटकांना परवानगी दिली जाणार आहे. सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला आहे.- प्रदीप चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्नाळाकलावंतीन दुर्ग व प्रबळगड परिसर प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाला आहे. पर्यटन उद्योगावर येथील अर्थव्यवस्थाही अवलंबून आहे. परंतु सुरक्षेला प्राधान्य देत सद्य:स्थितीमध्ये पर्यटकांना या परिसरात मनाई केली आहे.- एन. एन. कुप्ते, साहाय्यक वनसंरक्षक, पनवेल.गवळीदेव धबधब्यावरही बंदी : नवी मुंबईमधील गवळीदेव धबधबा मागील काही वर्षांत पर्यटकांना आकर्षित करीत आहे. मुंबई, ठाणे, पनवेल परिसरातूनही पर्यटक येथे येतात. या वर्षी गवळीदेव धबधब्यावरही सुरक्षेसाठी पर्यटकांना मनाई केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगडtourismपर्यटन