शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

coronavirus: निसर्ग चक्रिवादळात नुकसान झालेल्यांना झाडाप्रमाणे भरपाईचा अध्यादेश लवकरच, सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 1:15 AM

येत्या मंगळवारपर्यंत याबाबतचा शासकीय अध्यादेश निघणार आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना मोठी मदत प्राप्त होणार असल्याचे प्रतिपादन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केले आहे.

मुरुड : निसर्ग चक्रीवादळामुळेरायगड जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. नारळ-सुपारीच्या झाडांचेही मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्याच्या इच्छेप्रमाणे सुपारी व नारळाच्या प्रत्येक झाडामागे मोठे आर्थिक साहाय्य करण्याचा राज्य शासनाचा प्रामाणिक हेतू असून, येत्या मंगळवारपर्यंत याबाबतचा शासकीय अध्यादेश निघणार आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना मोठी मदत प्राप्त होणार असल्याचे प्रतिपादन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केले आहे.नांदगाव ग्रामपंचायतमध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे प्राप्त झालेली रक्कम नागरिकांच्या बँक खात्यामध्ये जमा झाली की नाही, याबाबतचा आढावा घेण्यासाठी खा.सुनील तटकरे आले होते. यावेळी नांदगाव ग्रामपंचायत सरपंच वैशाली पवार, उपसरपंच अस्लम हलडे, काँग्रेस आयचे तालुका अध्यक्ष सुभाष महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तटकरे यांनी कृषी विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे एक हेक्टरमध्ये नारळाची १५० झाडे तर सुपारीची १,३५० झाडे असतात, असे निकष आहेत, परंतु आम्ही हा निकष पाळणार नाही. शेतकºयांनी झाडांची सांगितलेली संख्याच आम्ही विचारात घेणार आहोत. जास्तीतजास्त रक्कम वादळग्रस्तांना मिळावी, यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. नारळ-सुपारी व कोकम या पिकाचा रोजगार भूमी लागवड योजनेत समावेश केल्याने शेतकºयांना लागवडीसाठी येणारा खर्च व नवीन रोपेसुद्धा प्राप्त होणार आहेत. वादळग्रस्त भागात जेवढ्या दिवस वी ज नाही, तिथे सरासरी बिल स्वीकारले जाणार नाही. जेवढा वापर तेवढेच बिल ग्राहकाला गेले पाहिजे, या भूमिकेवर आपण ठाम असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.तहसीलदारांनी तातडीने कार्यवाही करावीखा.सुनील तटकरे यांनी नांदगाव ग्रामपंचायत हद्दीमधील नुकसानग्रस्त नागरिकांच्या बँक खात्यात त्वरित रक्कम जमा झाली पाहिजे यासाठी तहसीलदारांनी तातडीने कार्यवाही करावी, असे आदेश दिले आहेत. केंद्र शासन राज्य शासनाला मदत करीत नाही, केंद्राची महाराष्ट्राकडे नेहमीच वक्रदृष्टी असते, अशी टीका यावेळी त्यांनी केली आहे. तीन महिन्यांचे वीजबिल एकदाच आल्याने लोकांना खूप त्रास झाला आहे. यासाठी सदरची रक्कम हप्त्याहप्त्याने भरण्याची सूट देण्यात आली आहे. वीजबिल मोठ्या रकमेचे आले असेल, तर पाहणी करून बिल त्वरित सुधारून देण्याचे आदेश दिले असल्याचे यावेळी सुनील तटकरे यांनी सांगितले.माध्यमिक हायस्कूलला मदतीचे धोरण : माध्यमिक हायस्कूल अनुदानीत असो वा विना अनुदानित असो, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून अर्थ विभागाकडे प्रस्ताव सादर होताच, जास्तीतजास्त दोन लाख रुपये मदत मिळणार आहे. हे पैसे जिल्हा परिषदेमार्फत वितरित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळRaigadरायगडsunil tatkareसुनील तटकरे