शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

CoronaVirus News in Raigad : कोविड योद्धांच्या मदतीसाठी शिक्षक; रायगड जिल्ह्यातील सुमारे चार हजार जणांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 00:02 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : जिल्ह्याच्या सीमांवर असणारे चेकपोस्ट आणि प्रत्येक गावात आता या शिक्षकांची ड्युटी लावण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात दाखल होणाऱ्या नागरिकांच्या नोंदी घेतल्या जात आहेत.

- निखिल म्हात्रेअलिबाग : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रायगड जिल्ह्याला सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन अहोरात्र कोरोनाशी युद्ध करत आहे. या योद्धांच्या मदतीसाठी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक विभाग आता कोरोना विरुद्धच्या या लढ्यात सहभागी झाला आहे. रायगड जिल्ह्यात मुख्याध्यापक आणि प्राथमिक शिक्षक असे सुमारे चार हजार जण कोरोना वॉरियर्सची भूमिका निभावत आहेत.जिल्ह्याच्या सीमांवर असणारे चेकपोस्ट आणि प्रत्येक गावात आता या शिक्षकांची ड्युटी लावण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात दाखल होणाऱ्या नागरिकांच्या नोंदी घेतल्या जात आहेत. रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. लॉकडाउन संपून आपण आपल्या घरी जाऊ शकू, या आशेवर असणाºया मुंबई व परिसरातील; परंतु मूळचे रायगड जिल्ह्यातील असलेल्या चाकरमान्यांच्या आशेवर पाणी पडले आहे. दुकाने, हॉटेल, खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरळीतपणे कधी सुरू होतील, याबाबत निश्चितता नाही. जवळ असलेला पैसा संपत चाललेला आहे. यावर उपाय म्हणून ‘गड्या आपला गाव बरा’ या भावनेने मुंबई व उपनगरांमध्ये नोकरी-कामानिमित्त राहत असलेल्या या चाकरमान्यांची पावले आपल्या मूळ गावाकडे वळली आहेत.रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात खारपाडा मार्गे प्रवेश करणाºया या नागरिकांची व्यवस्थितपणे नोंद व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांच्या एकत्रित पुढाकारातून पेण तालुक्यातील खारपाडा, खोपोली, वरंध, पोलादपूर, कर्जत, ताम्हिणी येथे विशेष कक्ष उभारण्यात आले आहेत.मुंबई, ठाणे येथून चालत येणाºया किंवा वाहनातून येणाºया प्रत्येक नागरिकाची या ठिकाणी नोंद घेतली जात आहे. त्यांची थर्मल स्कॅनरने तपासणी करीत संबंधित नागरिक कुठून आले आहेत, कुठे चालले आहेत, त्यांचा वाहन क्र मांक, मोबाइल क्र मांक अशी सर्व माहिती नोंदवून घेतली जात आहे. तर नोंद होणाºया प्रत्येक नागरिकाच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारल्यानंतरच त्यांना येथून पुढे सोडण्यात येत आहे.रायगडमध्ये येणाऱ्यांची होतेय नोंदशिक्षकांकडून नोंदविल्या जाणाºया माहितीमुळे जिल्हा प्रशासनाला दररोज रायगड जिल्ह्यात किती नागरिक नव्याने प्रवेश करीत आहेत याची माहिती उपलब्ध होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आलेल्या या नागरिकांच्या व्यवस्थापनाबाबत योग्य ते निर्णय घेणे, उपाययोजना राबविणे, यासाठी प्रशासनाला मोलाचे सहकार्य होत आहे. ग्रामीण स्तरावर ज्या कोरोना नियंत्रण समिती कार्यान्वित झाली असून, त्या समित्यांमध्ये हे शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.तीन शिफ्टमध्ये ड्युटीया मोहिमेसाठी या चेकपोस्टवर महसूल, पोलीस, आरोग्य यंत्रणेसोबत आता प्राथमिक शिक्षकदेखील कोविड योद्धा म्हणून या लढाईत उतरले आहेत. खारपाडा, खोपोली, वरंध, पोलादपूर, कर्जत, ताम्हिणी चेकपोस्टवर हे शिक्षक सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत, दु. ३ ते रात्री ११ वाजेपर्यंत, रात्री ११ ते स. ७ वाजेपर्यंत अशा तीन शिफ्टमध्ये ड्युटी करणार

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसalibaugअलिबाग